शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरच्या सिध्देश्वर तलावात बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:47 IST

सिद्धेश्वर तलावातील मृत्यूचे सत्र सुरूच; सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार घडतात घटना

ठळक मुद्देसिद्धेश्वर तलावातील गणपती घाटाजवळ, गणेश विसर्जन कुंडाच्या बाजूला असलेल्या पाण्यात मृत्यूचे सत्र सुरूचसुरक्षारक्षक नसल्याने वारंवार अशा घटना घडत असून, गुरुवारी पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना आढळून आलेगेल्या महिन्यात याच ठिकाणी निखिल उगाडे आणि सौरभ सरवदे या रविवार पेठेतील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता

सोलापूर : सिद्धेश्वर तलावातील गणपती घाटाजवळ, गणेश विसर्जन कुंडाच्या बाजूला असलेल्या पाण्यात मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार अशा घटना घडत असून, गुरुवारी पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना आढळून आले. गेल्या महिन्यात याच ठिकाणी निखिल उगाडे आणि सौरभ सरवदे या रविवार पेठेतील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता.गुरुवारी दुपारी १२ वाजता तलावातील पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना दिसून आले. बघणाºया लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड यांना फोन करून याची माहिती दिली. 

सचिन राठोड यांनी प्रेताची पाहणी करून तत्काळ फौजदार चावडी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली, अ‍ॅम्ब्युलन्सला बोलावून घेतले. स्थानिक तरुणाच्या सहायाने व तलावाची स्वच्छता करणाºया कामगारांच्या मदतीने प्रेतास बाहेर काढण्यात आले. प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पाण्यावर तरंगणारे प्रेत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गणपती घाटाच्या बाजूला असलेले पाणी खोल असून त्यात आजवर अनेक लोक मरण पावले आहेत. 

दिवे, कॅमेरे बसवावेत- कुरेशी- रात्री अनेक लोक गणपती घाटाच्या परिसरात बसतात. काही लोक मद्यपान करतात, या प्रकाराला कोणी आवर घालत नाही. ८ ते १५ दिवसात १ ते २ प्रेत या पाण्यात तरंगताना दिसतात. सुरक्षा व्यवस्था नसल्याने रात्री कोण येतं आणि जातं याचा अंदाज येत नाही. या भागात तलाव दिसेल अशा पद्धतीने मोठे लाईट दिवे लावण्यात यावेत. सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास पाण्यात पडून मरणाºयांची आत्महत्या आहे की आणखी काही प्रकार या ठिकाणी होतो हे लक्षात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने गणपती घाटावर एक सुरक्षारक्षक नेमण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी निहाजअहमद कुरेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. 

आजवर अनेक प्रेते बाहेर काढली, मला पोहता येत नाही. पोलिसांच्या विनंतीवरून मी नावेच्या सहायाने पाण्यात जातो, प्रेताला धरून बाहेर ओढत आणतो. पूर्वी तलाव पूर्ण भरलेला होता तेव्हाही अशीच स्थिती होती. आता डबक्याच्या स्वरूपात असलेल्या पाण्यातही तीच स्थिती आहे. -संजय फुलारे, स्थानिक रहिवासी.

महिन्यातून ४ ते ५ घटनेसाठी मला स्थानिक लोकांकडून फोन येत असतो, पाहणी करून मी पोलिसांना माहिती देत असतो. रात्री-अपरात्री या भागात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे, याला आळा घालण्यासाठी या ठिकाणी २४ तास सिक्युरिटी गार्ड नेमणे गरजेचे आहे. शिवाय या परिसरात फिरण्यासाठी व बसण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही मोठा त्रास होत असतो. टपोºया मुलांमुळे गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाºया लोकांनाही त्रास होतो. -सचिन राठोड, सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसriverनदी