शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

दक्षिण सोलापूरसाठी उजनीचे पाणी फक्त कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST

उजनी धरणापासून १४० किमी अंतर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनीचे पाणी मिळावे यासाठी राजकीय नेत्यांनी लढे उभे केले. शेतकऱ्यांनी ...

उजनी धरणापासून १४० किमी अंतर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनीचे पाणी मिळावे यासाठी राजकीय नेत्यांनी लढे उभे केले. शेतकऱ्यांनी या लढ्यात स्वतःला झोकून दिले. तालुक्यासाठी धरणात आरक्षित ठेवलेले पाणी अजूनही शेतीला मिळाले नाही. पाणी देणाऱ्या योजना रखडल्या. त्यामुळे उजनीचे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी मृगजळ ठरले. या तालुक्याने पाण्यासाठी सर्वाधिक संघर्ष केला. तरीही प्रतीक्षा संपली नाही. कधी योजनेला निधी मिळत नाही तर कधी सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्याचे कारण सांगत पाणी कागदावरच राहिले.

सध्या कुरुल शाखा कालवा आणि बेगमपूर कालव्यातून तालुक्यातील कंदलगाव, वडकबाळ, मंद्रुप, गुंजेगाव आदी भागांना प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी मिळते. मात्र, एकरुख उपसा सिंचन योजना पूर्णत्वास न आल्याने ७२०० हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. ही योजना पूर्ण झाली असली तरी आरक्षित असलेले पाणी पूर्ण क्षमतेने मिळेल, ही आशा आता शेतकऱ्यांना वाटत नाही. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष केला; पण मिळालेले पाणी प्रत्यक्ष शेतात कधी पोहोचणार या प्रश्नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. विशेषतः उजनीचे पाणी मिळेल या भरवशावर तरुण पिढी शेती क्षेत्रात उतरली. मात्र, त्यांचाही भ्रमनिरास झाला आहे.

आठमाहीची ऐतिहासिक घोषणा

उजनीचे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना मिळाले पाहिजे, या मागणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे दिवंगत आनंदराव देवकते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर याच तालुक्यात कंदलगाव येथील पाणी परिषदेत शंकरराव चव्हाणांनी उजनीचे बारमाही धोरण बदलून आठमाही केले. त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्याला झाला. सिंचन क्षेत्रात दुपटीने वाढ झाली; पण ज्या तालुक्याने संघर्ष केल्यामुळे उजनीच्या धोरणात बदल करावा लागला तोच तालुका आजही वंचित आहे.

एकरुख योजना अर्धवटच

१९९६ साली प्रशासकीय मान्यता मिळालेली एकरुख उपसा सिंचन योजना तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील ३४ गावांना उपयुक्त ठरणार आहे. मात्र, योजनेचे काम २५ वर्षांनंतरही अर्धवट स्थितीत राहिल्याने पाणी मिळणार कधी? अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांत आहे. सध्या याच योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील बोरी धरणात सोडण्याची तयारी झाली; पण दक्षिण सोलापूरची कालव्याची कामे अपूर्ण, भूसंपादन नाही, अंतर्गत पाइपलाइनची कामे अपूर्ण या कारणाने येत्या दोन वर्षांत पाणी मिळण्याची शक्यता धूसर दिसते.

दोन्ही योजना अधांतरी

एकरुख योजनेतून दक्षिण सोलापूर तालुक्याला ७,२०० हेक्टर तर देगाव जलद कालव्यातून ३,८६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दोन्ही योजनांचे भवितव्य आज तरी अधांतरीच आहे. एकरुखचे काम रेंगाळत सुरू आहे, तर देगाव कालव्याच्या कामांसाठी आवश्यक निधी मिळत नाही. त्यामुळे ११,०६० हेक्टर क्षेत्राला उजनीच्या पाण्याचे वेध लागले आहेत.

१४ गावांचे स्वप्न अपुरे राहणार

तालुक्यातील बोरामणी, तांदूळवाडी, मुस्तीसह १४ गावांना उजनीचे पाणी मिळावे, यासाठी दिवंगत उमाकांत राठोड यांनी संघर्ष केला. आजी-माजी आमदारांनी या योजनेसाठी राजकीय वजन वापरले; परंतु उजनी प्रकल्पात नव्या योजनांसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने १४ गावांना पाणी देणार कसे, असा सवाल जलसंपदा विभागाचे अधिकारी विचारत आहेत.

फाेटो

२६दक्षिण सोलापूर०१

सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील अर्धवट स्थितीत असलेला देगाव जलद कालव्याचा जलसेतू.

२६दक्षिण सोलापूर०२

उजनीच्या पाण्याचे तालुकानिहाय झालेले नियोजन.