शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:52 IST

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली.

प्रसाद पाटील

पानगाव : ‘२६ जुलै’ कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा विजय दिवस ज्या बहादूर जवानांच्या बलिदानामुळे साजरा झाला, त्यातलंच एक नाव होतं बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा़) चे सुपुत्र शहीद जवान शिपाई सुधाकर बब्रुवान जाधव यांच.. त्यांचे शौर्य अन् आठवणी या स्मारक रूपाने गावाने जपल्या आहेत.

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली. जिल्हा हळहळला. सुधाकर जाधव... एक धाडसी, तगडा मुलगा... अशी ओळख होती़ उराशी बाळगलेलं सैन्यदल भरतीचं स्वप्न साकारलं... गावातली जिल्हा परिषद शाळा, साकत प्रशाला, बार्शीचे टेक्निकल हायस्कूल, शिवाजी कॉलेज आदी ठिकाणच्या सर्वांग शिक्षणात त्याची जडणघडण झाली होती.

१९ फेब्रुवारी १९९७ रोजी पुणे येथे सुधाकर ‘मराठा एनफंट्री रेजिमेंट’मध्ये भरती झाला़ बेळगावातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये जम्मू-काश्मीरला पोस्टिंग मिळाली़ त्याच काळात कारगिलच्या युद्धाला तोंड फुटले़ सुधाकर कार्यरत असलेल्या २५ जणांच्या बहादूर तुकडीने ७ एप्रिल ते ८ डिसेंबर १९९८ काळात ‘आॅपरेशन रक्षक’ तर १३ एप्रिल ते २९ आॅगस्ट १९९९ या कालावधीत ‘आॅपरेशन विजय’ यशस्वी राबवून पाकड्यांना कंठस्नान घालत कारगिल विजय साकारला होता. 

यानंतर जम्मू-काश्मीरच्या अतिशय दुर्गम व साडेतेरा हजार फूट उंचीवरील ‘मंडी’ सेक्टरमधील पीर पंजाल पहाडीवर १३ आॅक्टोबर १९९९ पासून २५ जणांची ही तुकडी ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमेवर कार्यरत होती. खाली असणारा दारूगोळा राखण्यासाठी लावलेल्या चौकीवर ५ जून २००० रोजी पहाटे पाक ड्यांनी अचानक हमला केला. ‘बॅटल कॅज्युअल्टी’ झाली होती. जिथे प्राणवायूसाठी झगडावे लागते तिथे या हल्ल्यात पाकड्यांशी निकराचा प्रतिकार करणाºया तुकडीत सुधाकर जाधव यांच्यासह २५ जणांपैकी २२ जण कामी आले होते. उरलेल्या तिघांमार्फ त खबर पोहोचवून मदतकार्य मिळेपर्यंत पार्थिवांची अवस्था जागेवरून हलवण्यासारखी राहिली नव्हती. शेवटी सैन्यदलाने सर्व शहिदांवर लष्करी इतमामात तिथेच अंत्यसंस्कार केले. पाकड्यांचे इरादे तोडण्यासाठी सुधाकरसह २२ जणांचे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आत्मे पीर पंजाल पहाडीवरील चौकीवरच विसावले होते.

ती खंत आयुष्यभर सलत राहिली़..- आल्या. या घटनेने वीरमाता-पित्यांचे काळीज आणखीनच पिळवटून गेले़ २० वर्षांनंतर आजही या आठवणी निघताच त्यांच्या शौर्याने ऊर भरून येतो. मात्र वीरपिता बब्रुवान जाधव आणि वीरमाता सखुबाई जाधव यांचे डोळे पाणावलेले दिसतात. शौर्य गाजविणाºया पुत्राचे पार्थिव पाहणे त्यांच्या नशिबी नव्हते, ही खंत या दोघांना सलत आहे़ या घटनेनंतर १७ वर्षांनी गावामध्ये त्यांचे स्मारक झाले़ त्यांच्या आठवणी स्मारक रूपाने जपल्या आहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन