शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:52 IST

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली.

प्रसाद पाटील

पानगाव : ‘२६ जुलै’ कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा विजय दिवस ज्या बहादूर जवानांच्या बलिदानामुळे साजरा झाला, त्यातलंच एक नाव होतं बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा़) चे सुपुत्र शहीद जवान शिपाई सुधाकर बब्रुवान जाधव यांच.. त्यांचे शौर्य अन् आठवणी या स्मारक रूपाने गावाने जपल्या आहेत.

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली. जिल्हा हळहळला. सुधाकर जाधव... एक धाडसी, तगडा मुलगा... अशी ओळख होती़ उराशी बाळगलेलं सैन्यदल भरतीचं स्वप्न साकारलं... गावातली जिल्हा परिषद शाळा, साकत प्रशाला, बार्शीचे टेक्निकल हायस्कूल, शिवाजी कॉलेज आदी ठिकाणच्या सर्वांग शिक्षणात त्याची जडणघडण झाली होती.

१९ फेब्रुवारी १९९७ रोजी पुणे येथे सुधाकर ‘मराठा एनफंट्री रेजिमेंट’मध्ये भरती झाला़ बेळगावातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये जम्मू-काश्मीरला पोस्टिंग मिळाली़ त्याच काळात कारगिलच्या युद्धाला तोंड फुटले़ सुधाकर कार्यरत असलेल्या २५ जणांच्या बहादूर तुकडीने ७ एप्रिल ते ८ डिसेंबर १९९८ काळात ‘आॅपरेशन रक्षक’ तर १३ एप्रिल ते २९ आॅगस्ट १९९९ या कालावधीत ‘आॅपरेशन विजय’ यशस्वी राबवून पाकड्यांना कंठस्नान घालत कारगिल विजय साकारला होता. 

यानंतर जम्मू-काश्मीरच्या अतिशय दुर्गम व साडेतेरा हजार फूट उंचीवरील ‘मंडी’ सेक्टरमधील पीर पंजाल पहाडीवर १३ आॅक्टोबर १९९९ पासून २५ जणांची ही तुकडी ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमेवर कार्यरत होती. खाली असणारा दारूगोळा राखण्यासाठी लावलेल्या चौकीवर ५ जून २००० रोजी पहाटे पाक ड्यांनी अचानक हमला केला. ‘बॅटल कॅज्युअल्टी’ झाली होती. जिथे प्राणवायूसाठी झगडावे लागते तिथे या हल्ल्यात पाकड्यांशी निकराचा प्रतिकार करणाºया तुकडीत सुधाकर जाधव यांच्यासह २५ जणांपैकी २२ जण कामी आले होते. उरलेल्या तिघांमार्फ त खबर पोहोचवून मदतकार्य मिळेपर्यंत पार्थिवांची अवस्था जागेवरून हलवण्यासारखी राहिली नव्हती. शेवटी सैन्यदलाने सर्व शहिदांवर लष्करी इतमामात तिथेच अंत्यसंस्कार केले. पाकड्यांचे इरादे तोडण्यासाठी सुधाकरसह २२ जणांचे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आत्मे पीर पंजाल पहाडीवरील चौकीवरच विसावले होते.

ती खंत आयुष्यभर सलत राहिली़..- आल्या. या घटनेने वीरमाता-पित्यांचे काळीज आणखीनच पिळवटून गेले़ २० वर्षांनंतर आजही या आठवणी निघताच त्यांच्या शौर्याने ऊर भरून येतो. मात्र वीरपिता बब्रुवान जाधव आणि वीरमाता सखुबाई जाधव यांचे डोळे पाणावलेले दिसतात. शौर्य गाजविणाºया पुत्राचे पार्थिव पाहणे त्यांच्या नशिबी नव्हते, ही खंत या दोघांना सलत आहे़ या घटनेनंतर १७ वर्षांनी गावामध्ये त्यांचे स्मारक झाले़ त्यांच्या आठवणी स्मारक रूपाने जपल्या आहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन