शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वीस वर्षांनंतरही कळंबवाडीच्या वीरमाता-पित्यांचे डोळे पाणावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:52 IST

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली.

प्रसाद पाटील

पानगाव : ‘२६ जुलै’ कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा विजय दिवस ज्या बहादूर जवानांच्या बलिदानामुळे साजरा झाला, त्यातलंच एक नाव होतं बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा़) चे सुपुत्र शहीद जवान शिपाई सुधाकर बब्रुवान जाधव यांच.. त्यांचे शौर्य अन् आठवणी या स्मारक रूपाने गावाने जपल्या आहेत.

५ जून २००० रोजी शहीद जवान सुधाकर यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकताच संपूर्र्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली. जिल्हा हळहळला. सुधाकर जाधव... एक धाडसी, तगडा मुलगा... अशी ओळख होती़ उराशी बाळगलेलं सैन्यदल भरतीचं स्वप्न साकारलं... गावातली जिल्हा परिषद शाळा, साकत प्रशाला, बार्शीचे टेक्निकल हायस्कूल, शिवाजी कॉलेज आदी ठिकाणच्या सर्वांग शिक्षणात त्याची जडणघडण झाली होती.

१९ फेब्रुवारी १९९७ रोजी पुणे येथे सुधाकर ‘मराठा एनफंट्री रेजिमेंट’मध्ये भरती झाला़ बेळगावातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये जम्मू-काश्मीरला पोस्टिंग मिळाली़ त्याच काळात कारगिलच्या युद्धाला तोंड फुटले़ सुधाकर कार्यरत असलेल्या २५ जणांच्या बहादूर तुकडीने ७ एप्रिल ते ८ डिसेंबर १९९८ काळात ‘आॅपरेशन रक्षक’ तर १३ एप्रिल ते २९ आॅगस्ट १९९९ या कालावधीत ‘आॅपरेशन विजय’ यशस्वी राबवून पाकड्यांना कंठस्नान घालत कारगिल विजय साकारला होता. 

यानंतर जम्मू-काश्मीरच्या अतिशय दुर्गम व साडेतेरा हजार फूट उंचीवरील ‘मंडी’ सेक्टरमधील पीर पंजाल पहाडीवर १३ आॅक्टोबर १९९९ पासून २५ जणांची ही तुकडी ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमेवर कार्यरत होती. खाली असणारा दारूगोळा राखण्यासाठी लावलेल्या चौकीवर ५ जून २००० रोजी पहाटे पाक ड्यांनी अचानक हमला केला. ‘बॅटल कॅज्युअल्टी’ झाली होती. जिथे प्राणवायूसाठी झगडावे लागते तिथे या हल्ल्यात पाकड्यांशी निकराचा प्रतिकार करणाºया तुकडीत सुधाकर जाधव यांच्यासह २५ जणांपैकी २२ जण कामी आले होते. उरलेल्या तिघांमार्फ त खबर पोहोचवून मदतकार्य मिळेपर्यंत पार्थिवांची अवस्था जागेवरून हलवण्यासारखी राहिली नव्हती. शेवटी सैन्यदलाने सर्व शहिदांवर लष्करी इतमामात तिथेच अंत्यसंस्कार केले. पाकड्यांचे इरादे तोडण्यासाठी सुधाकरसह २२ जणांचे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आत्मे पीर पंजाल पहाडीवरील चौकीवरच विसावले होते.

ती खंत आयुष्यभर सलत राहिली़..- आल्या. या घटनेने वीरमाता-पित्यांचे काळीज आणखीनच पिळवटून गेले़ २० वर्षांनंतर आजही या आठवणी निघताच त्यांच्या शौर्याने ऊर भरून येतो. मात्र वीरपिता बब्रुवान जाधव आणि वीरमाता सखुबाई जाधव यांचे डोळे पाणावलेले दिसतात. शौर्य गाजविणाºया पुत्राचे पार्थिव पाहणे त्यांच्या नशिबी नव्हते, ही खंत या दोघांना सलत आहे़ या घटनेनंतर १७ वर्षांनी गावामध्ये त्यांचे स्मारक झाले़ त्यांच्या आठवणी स्मारक रूपाने जपल्या आहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन