शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीत चुरमुºयाची उलाढाल दीड कोटीवर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 16:37 IST

पंढरपुरात ४० हजार पोत्यांची विक्री; पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती

ठळक मुद्देपंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतातएक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़

प्रभू पुजारी

पंढरपूर : वर्षभरात जेवढी चुरमुºयाची उलाढाल होते, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त उलाढाल केवळ आषाढी वारी सोहळ्यादरम्यान होते़ पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती असते़ पालखी सोहळ्यासह दिंड्यांमधून राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक दर्शनानंतर घरी जाताना प्रसाद म्हणून चुरमुरे घेऊन जातात़ त्यामुळे आतापासूनच पंढरपुरातील कारखान्यांत चुरमुरे बनविण्याची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

पंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने आहेत़ त्यांच्याकडूनच येथील जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतात़ ते दुकानदारांना विकतात़ शहर व परिसरात एकूण एक हजार ते बाराशे मेवामिठाईची दुकाने आहेत़ हे दुकानदार भाविकांना प्रसाद म्हणून चुरमुरे विक्री करतात़ चुरमुºयाचे कारखानदार भारत कदम माहिती देताना म्हणाले, काही व्यापारी चुरमुºयाच्या पुड्या बनवून विक्री करतात़ ते चुरमुरे बेळगाव, कोल्हापूर, गुजरात, आंध्रप्रदेश येथील असतात़ मात्र वारकºयांची पसंतीही पंढरपूर चुरमुºयालाच जास्त आहे़ हा चुरमुरा प्रसाद म्हणून वापरला जातोच; पण भेळ, चिवडा, सुसला आदी पदार्थही बनविता येतात़ कच्चा माल म्हणजेच तांदूळ हा मध्यप्रदेश, कर्जत चौक, खालापूर येथून आणला जातो़ आता या व्यवसायातही अत्याधुनिक मशिनरी आल्या आहेत़

अशी आहे उलाढाल- एक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़ त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यातील १५ दिवस वगळता वर्षभरातील ३६५ पैकी ३५० दिवसांत रोज १०० पोत्यांप्रमाणे ३५ हजार पोते होतात़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल होते़ ही वर्षभराची आकडेवारी आहे़ मात्र आषाढी कालावधीत ४० हजार पोत्यांची विक्री होते़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल होते.

अशी आहे चुरमुरे बनविण्याची प्रक्रिया- प्रथम रत्ना भात (तांदूळ) किमान आठ तास शिजविला जातो़ त्यानंतर तो भाजून त्यावर पाणी मारणे, पुन्हा थंड करणे, मग पॉलिश करणे, त्यातून तांब व तांदूळ विभक्त करणे़ नंतर ते तांदूळ सुकण्यासाठी टाकणे़ नंतर मशीनमध्ये टाकणे, त्यात मीठ मिक्स करणे़ मशीनमध्ये (रोष्टर) भाजणे़ त्यानंतर बलोटद्वारे हवेत उडविणे़ नंतर सेंट्री चाळणीने स्वच्छ करणे़ शेवटी ते पोत्यामध्ये भरणे, ही याची प्रक्रिया असते.

पंढरपुरी चुरमुºयाचे वैशिष्ट्य- पंढरपुरी चुरमुरे हे खुसखुशीत असतात़ शिवाय चविष्टही आहेत़ प्रसादाबरोबरच घरात चिवडा, भेळ, सुसला तयार करता येतो़ वृद्धांनाही पंढरपुरी चुरमुरे सहजासहजी खाता येतात़ या वैशिष्ट्यामुळे पंढरीत आलेला प्रत्येक भाविक आवर्जून पंढरपुरी चुरमुरे घेऊन जातोच, असे अनेक व्यापाºयांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा