शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

‘मन और हात में है तिरंगा... हमारी रक्षा कौन करेंगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 10:55 IST

सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात सोलापुरात सलग पाच किलोमीटरची मानवी साखळी 

ठळक मुद्देनागरिकत्व कायद्याच्या विरोधात पाच किलोमीटरची मानवी साखळी करण्यात आली़सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या मानवी साखळीत अनेकांनी हातात झेंडा घेऊन देशाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

सोलापूर : सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात आज सोलापुरात मानवी साखळी करण्यात आली़ स्टेशन रोड येथील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून शेकडो नागरिकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले़ सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करत सरकारविरोधात शाब्दिक हल्लाबोल केला.

या मानवी साखळीत अनेकांनी हातात झेंडा घेऊन देशाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली़ घोषणाबाजीत संविधान बचावाची हाक आंदोलनकर्त्यांनी दिली़ ‘मन और हात में है तिरंगा... हमारी रक्षा कौन करेंगा’ अशा घोषणा देत नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करा, अशी मागणीही करण्यात आली.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पाच किलोमीटरची मानवी साखळी करण्यात आली. तसेच नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करा, शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांवरील हल्ले रोखा, अशा मागण्यांचे फलक मानवी साखळीत झळकले. सिटूचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जन एकता जन अधिकार आंदोलन करण्यात आले़ सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न मानवी साखळीद्वारे करण्यात आल्याची माहिती यावेळी आडम मास्तर यांनी दिली.

 यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड. एम. एच. शेख, नगरसेविका कामिनी आडम, नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर, इरफान सर, शिवाजी ब्रिगेडचे फारूक शेख, मतीन बागवान, सिद्धप्पा कलशेट्टी, याकूब कांबले, फादर विकास रणशिंगे, शहर काझी अमजद अली काझी, मौलाना इब्राहीम कासिम, महिबूब कुमठे, आरिफ आलमेलकर, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार, अनिल वासम, कुरमय्या म्हेत्रे, सिटूचे जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते, शेवंता देशमुख, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, महादेव घोडके, किशोर मेहता आदी उपस्थित होते.

महापालिकेसमोर जाहीर सभा- मानवी साखळी महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात होऊन भैय्या चौक अण्णाभाऊ साठे पुतळा, महात्मा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चार हुतात्मा पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सलग पाच किलोमीटरची मानवी साखळी करण्यात आली़ दुपारी बारा वाजता मानवी साखळीचे रूपांतर जाहीर सभेत झाले़ आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर सरकारविरोधात निषेध सभा झाली़ यावेळी मास्तर म्हणाले, मोदी सरकार एक एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला सुरुवात करणार आहे़ राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी सरकारला ४ लाख कोटी तर जनतेला २५ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील़ याची जबाबदारी कोण घेणाऱ या मोहिमेत प्रत्येकाला भारतीयत्व सिद्ध करायला तब्बल २५ पुरावे लागतील़ बहुतांश अल्पसंख्याक आणि गरीब, अशिक्षित नागरिकांकडे कमी पुरावे आहेत़ काहींकडे काहीच पुरावे नाहीत़ अशांनी काय करायचे़ सदर कायदा पूर्णपणे रद्द करा, अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहू़

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक