शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘मन और हात में है तिरंगा... हमारी रक्षा कौन करेंगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 10:55 IST

सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात सोलापुरात सलग पाच किलोमीटरची मानवी साखळी 

ठळक मुद्देनागरिकत्व कायद्याच्या विरोधात पाच किलोमीटरची मानवी साखळी करण्यात आली़सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या मानवी साखळीत अनेकांनी हातात झेंडा घेऊन देशाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

सोलापूर : सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात आज सोलापुरात मानवी साखळी करण्यात आली़ स्टेशन रोड येथील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून शेकडो नागरिकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले़ सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करत सरकारविरोधात शाब्दिक हल्लाबोल केला.

या मानवी साखळीत अनेकांनी हातात झेंडा घेऊन देशाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली़ घोषणाबाजीत संविधान बचावाची हाक आंदोलनकर्त्यांनी दिली़ ‘मन और हात में है तिरंगा... हमारी रक्षा कौन करेंगा’ अशा घोषणा देत नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करा, अशी मागणीही करण्यात आली.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पाच किलोमीटरची मानवी साखळी करण्यात आली. तसेच नागरिकत्व सुधारित कायदा रद्द करा, शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांवरील हल्ले रोखा, अशा मागण्यांचे फलक मानवी साखळीत झळकले. सिटूचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जन एकता जन अधिकार आंदोलन करण्यात आले़ सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न मानवी साखळीद्वारे करण्यात आल्याची माहिती यावेळी आडम मास्तर यांनी दिली.

 यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड. एम. एच. शेख, नगरसेविका कामिनी आडम, नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर, इरफान सर, शिवाजी ब्रिगेडचे फारूक शेख, मतीन बागवान, सिद्धप्पा कलशेट्टी, याकूब कांबले, फादर विकास रणशिंगे, शहर काझी अमजद अली काझी, मौलाना इब्राहीम कासिम, महिबूब कुमठे, आरिफ आलमेलकर, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार, अनिल वासम, कुरमय्या म्हेत्रे, सिटूचे जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते, शेवंता देशमुख, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, महादेव घोडके, किशोर मेहता आदी उपस्थित होते.

महापालिकेसमोर जाहीर सभा- मानवी साखळी महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात होऊन भैय्या चौक अण्णाभाऊ साठे पुतळा, महात्मा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चार हुतात्मा पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सलग पाच किलोमीटरची मानवी साखळी करण्यात आली़ दुपारी बारा वाजता मानवी साखळीचे रूपांतर जाहीर सभेत झाले़ आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर सरकारविरोधात निषेध सभा झाली़ यावेळी मास्तर म्हणाले, मोदी सरकार एक एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला सुरुवात करणार आहे़ राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी सरकारला ४ लाख कोटी तर जनतेला २५ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील़ याची जबाबदारी कोण घेणाऱ या मोहिमेत प्रत्येकाला भारतीयत्व सिद्ध करायला तब्बल २५ पुरावे लागतील़ बहुतांश अल्पसंख्याक आणि गरीब, अशिक्षित नागरिकांकडे कमी पुरावे आहेत़ काहींकडे काहीच पुरावे नाहीत़ अशांनी काय करायचे़ सदर कायदा पूर्णपणे रद्द करा, अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहू़

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक