शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

थरथरते हात राबतात १२ तास; भरघोस उत्पन्न घेण्याचा कयास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST

सीताबाई चव्हाण या सध्या शिवाजीनगर तांडा येथे एका छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहतात. त्यांच्या पतीला अक्कलकोट संस्थानाकडून १९७० च्या दशकात ...

सीताबाई चव्हाण या सध्या शिवाजीनगर तांडा येथे एका छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहतात. त्यांच्या पतीला अक्कलकोट संस्थानाकडून १९७० च्या दशकात पाच एकर जमीन बक्षीसपत्राद्वारे मिळाली होती. त्यापूर्वी सीताबाईंनी कोणतेही काम पतीबरोबर खांद्याला खांदा लावून केले; पण ३० वर्षांपूर्वी ते संसाराचा अर्धा डाव सोडून निघून गेले. त्यांच्यासोबत एक चित्रपट पाहिल्याची आवठणही त्या न विसरता सांगता. त्यानंतर हिमतीने दोन मुले, एक मुलगी अशा तिघांना थोडेफार शिकवले. नंतर त्यांचे लग्न केले. त्यांचा संसार सुखाचा आहे. त्यांच्या संसारात ढवळाढवळ न करता, माझे वय झाले असले तरी कष्ट करण्यात कणखर आहे, असे त्या सांगतात.

या माउली संस्थानकडून मिळालेली बॅगहळ्ळी रोडवरील पाच एक शेतजमीन स्वत: कसतात. सध्या पहाटे थंडी असली तरी पहाटेच उठून स्वयंपाक करून भाजी-भाकरी बांधून पाच किलोमीटर चालत शेतात जातात. आल्याबरोबर न्याहरी म्हणून एक भाकर खाणार. नंतर सलगपणे तूर कापणीचे काम करतात. दुपारी अर्धा तास जेवण व विश्रांतीसाठी थांबतात. नंतर काम करून दिवस मावळायला लागला की पुन्हा चालतच घराकडे जातात. पाच किमी जाणे व पाच किमी येणे अशा १० किमीचा पायी प्रवास अन् सुमारे १२ तास काम याही वयात त्या आनंदाने करतात. तुम्ही मजूर का लावत नाही, असे विचारले असता, त्या म्हणाल्या, स्वतः काम केल्यामुळे पिकांची नासाडी कमी होते व पैशाची बचत होते. तुरीची पेरणी केल्यानंतर खुरपणीचे काम एकटीनेच केले. सध्या कापणी करून पेंडी बांधण्याचेही काम मीच करीत असल्याचे त्या सांगत होत्या.

तळीरामांची अशी जीरवली...

काही वर्षांपूर्वी शेतात कोणही येऊन रोज दारू पिऊन पिकांची नासाडी करीत होते. एकदा, दोनदा सांगून पाहिले, पण न ऐकल्याने एकेकाला गच्ची धरून कानशीलात लगावली. तेव्हापासून कोणीही शेतीकडे फिरकत नाही. मात्र जनावरे चारायला येणारे गुराखी त्रास वृद्धेला त्रास देतात, असे वाटसरूंनी सांगितले. जिवात जीव असेपर्यंत शेती व्यवसाय करत राहणार असे सीताबाई चव्हाण यांनी सांगितले.

फोटो

१३अक्कलकोट स्टोरी फोटो

ओळी

बॅगेहळ्ळी, ता. अक्कलकोट रोडवरील शेतात तूर काढणीचे काम करताना सीताबाई चव्हाण.