शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोलापूर विभागातील गाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी; सोलापुरातील प्रवाशांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:38 IST

लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या एसटीच्या ९० टक्के फेऱ्या सुरू

सोलापूर : कोरोना महामारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध मार्गांवरील एसटीच्या बंद असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात येत आहे. सोलापूर आगारातून जवळपास ९० टक्के फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित फेऱ्या पुढील काही दिवसातच सुरू होणार आहे, असे एसटी अधिकाऱ्यांचे मत आहे.

राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाच्या वतीने बसफेऱ्या सुरू केल्यानंतर सुरुवातील प्रवाशांकडून खूप अल्पप्रतिसाद मिळत होता, पण कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. यामुळे अनेक गावांच्या बंद असलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सोबत शाळा सुरू होत असल्यामुळे ज्या मार्गावर बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी असते त्या मार्गावर गाड्या सुरू करण्यात येत आहे.

कोरोनाच्या अगोदर सोलापूर आगारातून जवळपास पाचशे फेऱ्या सुरू होते. आता जवळपास ४०० गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आलेले आहेत. यामुळे उर्वरित मार्गावर गाड्या सुरू करण्यासाठी आगारांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पण अनेक आगारातील गाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी गेल्यामुळे अनेक मार्ग हे बंद ठेवावे लागत आहे.

ज्या मार्गावर प्रवाश्यांकडून गाड्या सुरू करण्याची मागणी होते त्या मार्गावर आम्ही गाड्या सुरू करतो. सध्या ९० टक्के गाड्या सुरू झालेल्या आहेत. पुढील काही दिवसांत पुणे मार्गावरील १०० टक्के फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.

- प्रमोद शिंदे, स्थानकप्रमुख

तीन लाखांनी उत्पन्न घटले

सध्या सोलापूर आगारातील बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने न धावू लागल्यामुळे आगाराचे दिवसाकाठचे उत्पन्न दोन ते तीन लाखांनी कमी होत आहे. लॉकडाऊनपूर्वी प्रत्येक दिवशी जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत होते. आता जवळपास ११ ते १२ लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत आहे.

या मार्गावर सर्वाधिक प्रवासी

सोलापूर आगारातून पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद या मार्गासाठी जास्त प्रवासी असतात; पण या सर्व मार्गांवर एसटी गाड्यांच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सोडण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेकवेळा प्रवाशांना स्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे. सोबतच कुरूल, अंकोली, येवती या मार्गावरील मुक्कामी गाड्या बंद केल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात दिवसातून तीनफेऱ्या येतात, पण त्या गाड्यांचा वेळ निश्चित नसल्यामुळे अनेकवेळा आम्हाला एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही.

- कुमार नरखेडे, प्रवासी

-------------

लॉकडाऊनमुळे आचेगावमधील फेऱ्या बंद करण्यात आले. पण लॉकडाऊननंतरही या मार्गावरील गाड्या सुरू करण्यात आलेले नाहीत. यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना वळसंगपर्यंत येऊन तेथून प्रवास करावा लागत आहे.

- अमोल ननवरे, प्रवासी

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबईST Strikeएसटी संपtourismपर्यटन