शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सोलापूर विभागातील गाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी; सोलापुरातील प्रवाशांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:38 IST

लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या एसटीच्या ९० टक्के फेऱ्या सुरू

सोलापूर : कोरोना महामारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध मार्गांवरील एसटीच्या बंद असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात येत आहे. सोलापूर आगारातून जवळपास ९० टक्के फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित फेऱ्या पुढील काही दिवसातच सुरू होणार आहे, असे एसटी अधिकाऱ्यांचे मत आहे.

राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाच्या वतीने बसफेऱ्या सुरू केल्यानंतर सुरुवातील प्रवाशांकडून खूप अल्पप्रतिसाद मिळत होता, पण कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. यामुळे अनेक गावांच्या बंद असलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सोबत शाळा सुरू होत असल्यामुळे ज्या मार्गावर बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी असते त्या मार्गावर गाड्या सुरू करण्यात येत आहे.

कोरोनाच्या अगोदर सोलापूर आगारातून जवळपास पाचशे फेऱ्या सुरू होते. आता जवळपास ४०० गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आलेले आहेत. यामुळे उर्वरित मार्गावर गाड्या सुरू करण्यासाठी आगारांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पण अनेक आगारातील गाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी गेल्यामुळे अनेक मार्ग हे बंद ठेवावे लागत आहे.

ज्या मार्गावर प्रवाश्यांकडून गाड्या सुरू करण्याची मागणी होते त्या मार्गावर आम्ही गाड्या सुरू करतो. सध्या ९० टक्के गाड्या सुरू झालेल्या आहेत. पुढील काही दिवसांत पुणे मार्गावरील १०० टक्के फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.

- प्रमोद शिंदे, स्थानकप्रमुख

तीन लाखांनी उत्पन्न घटले

सध्या सोलापूर आगारातील बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने न धावू लागल्यामुळे आगाराचे दिवसाकाठचे उत्पन्न दोन ते तीन लाखांनी कमी होत आहे. लॉकडाऊनपूर्वी प्रत्येक दिवशी जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत होते. आता जवळपास ११ ते १२ लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत आहे.

या मार्गावर सर्वाधिक प्रवासी

सोलापूर आगारातून पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद या मार्गासाठी जास्त प्रवासी असतात; पण या सर्व मार्गांवर एसटी गाड्यांच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सोडण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेकवेळा प्रवाशांना स्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे. सोबतच कुरूल, अंकोली, येवती या मार्गावरील मुक्कामी गाड्या बंद केल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात दिवसातून तीनफेऱ्या येतात, पण त्या गाड्यांचा वेळ निश्चित नसल्यामुळे अनेकवेळा आम्हाला एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही.

- कुमार नरखेडे, प्रवासी

-------------

लॉकडाऊनमुळे आचेगावमधील फेऱ्या बंद करण्यात आले. पण लॉकडाऊननंतरही या मार्गावरील गाड्या सुरू करण्यात आलेले नाहीत. यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना वळसंगपर्यंत येऊन तेथून प्रवास करावा लागत आहे.

- अमोल ननवरे, प्रवासी

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबईST Strikeएसटी संपtourismपर्यटन