शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

सोलापूर विभागातील गाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी; सोलापुरातील प्रवाशांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:38 IST

लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या एसटीच्या ९० टक्के फेऱ्या सुरू

सोलापूर : कोरोना महामारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध मार्गांवरील एसटीच्या बंद असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात येत आहे. सोलापूर आगारातून जवळपास ९० टक्के फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित फेऱ्या पुढील काही दिवसातच सुरू होणार आहे, असे एसटी अधिकाऱ्यांचे मत आहे.

राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाच्या वतीने बसफेऱ्या सुरू केल्यानंतर सुरुवातील प्रवाशांकडून खूप अल्पप्रतिसाद मिळत होता, पण कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. यामुळे अनेक गावांच्या बंद असलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सोबत शाळा सुरू होत असल्यामुळे ज्या मार्गावर बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी असते त्या मार्गावर गाड्या सुरू करण्यात येत आहे.

कोरोनाच्या अगोदर सोलापूर आगारातून जवळपास पाचशे फेऱ्या सुरू होते. आता जवळपास ४०० गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आलेले आहेत. यामुळे उर्वरित मार्गावर गाड्या सुरू करण्यासाठी आगारांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पण अनेक आगारातील गाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी गेल्यामुळे अनेक मार्ग हे बंद ठेवावे लागत आहे.

ज्या मार्गावर प्रवाश्यांकडून गाड्या सुरू करण्याची मागणी होते त्या मार्गावर आम्ही गाड्या सुरू करतो. सध्या ९० टक्के गाड्या सुरू झालेल्या आहेत. पुढील काही दिवसांत पुणे मार्गावरील १०० टक्के फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.

- प्रमोद शिंदे, स्थानकप्रमुख

तीन लाखांनी उत्पन्न घटले

सध्या सोलापूर आगारातील बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने न धावू लागल्यामुळे आगाराचे दिवसाकाठचे उत्पन्न दोन ते तीन लाखांनी कमी होत आहे. लॉकडाऊनपूर्वी प्रत्येक दिवशी जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत होते. आता जवळपास ११ ते १२ लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत आहे.

या मार्गावर सर्वाधिक प्रवासी

सोलापूर आगारातून पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद या मार्गासाठी जास्त प्रवासी असतात; पण या सर्व मार्गांवर एसटी गाड्यांच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सोडण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेकवेळा प्रवाशांना स्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे. सोबतच कुरूल, अंकोली, येवती या मार्गावरील मुक्कामी गाड्या बंद केल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात दिवसातून तीनफेऱ्या येतात, पण त्या गाड्यांचा वेळ निश्चित नसल्यामुळे अनेकवेळा आम्हाला एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही.

- कुमार नरखेडे, प्रवासी

-------------

लॉकडाऊनमुळे आचेगावमधील फेऱ्या बंद करण्यात आले. पण लॉकडाऊननंतरही या मार्गावरील गाड्या सुरू करण्यात आलेले नाहीत. यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना वळसंगपर्यंत येऊन तेथून प्रवास करावा लागत आहे.

- अमोल ननवरे, प्रवासी

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबईST Strikeएसटी संपtourismपर्यटन