शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बाह्यवळण रस्त्याअभावी सोलापूर शहरातील वाहतुकीवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:18 IST

चालकांचीही हेळसांड; रोजच खोळंबतात शेकडो वाहने; दिवसा जड वाहनांना बंदी

ठळक मुद्देकुरुल-कामती-मंद्रुप-तेरामैल- वळसंग- तांदूळवाडी या बाह्यवळण रस्त्याचे काम रखडलेदिवसा जड वाहनांना बंदी असल्याने शेकडो वाहने शहराबाहेर थांबल्याचे दृश्य सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दिवसा असंख्य जड वाहने शहराबाहेर थांबलेली दिसून येतात

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादकडे जाण्यासाठी नव्या कुरुल-कामती-मंद्रुप-तेरामैल- वळसंग- तांदूळवाडी या बाह्यवळण रस्त्याचे काम रखडल्याने सोलापूर शहरातील वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. दिवसा जड वाहनांना बंदी असल्याने शेकडो वाहने शहराबाहेर थांबल्याचे दृश्य पाहायला मिळते.

तीन वर्षांपूर्वी २६ फेब्रुवारी २०१६ रोजी जुळे सोलापुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील नव्या रस्त्यांच्या कामांची घोषणा केली होती. त्यातील काही कामांची कोनशीला बसविण्यात आली. मात्र अनेक कामे आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातीलच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ पासून पुढे जाणारा कुरुल- कामती- मंद्रुप- वळसंग- तांदूळवाडीमार्गे हैदराबाद महामार्गाला जोडणारा बाह्यवळण रस्ता आहे. घोषणेनंतर या रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही. विजयपूर-सोलापूर महामार्गावर तसेच सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दिवसा असंख्य जड वाहने शहराबाहेर थांबलेली दिसून येतात. त्यांना रात्री उशिराने शहरात प्रवेश दिला जातो. 

मध्यंतरी झालेल्या अपघातामुळे या जड वाहनांना सोलापूर शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ त्यांना तासंतास शहराबाहेर थांबावे लागते. वाहनचालकांची मोठी कुचंबणा होते. रात्रभर प्रवास करून आल्यानंतर त्यांना दिवसा विश्रांतीसाठी निवारा नसतो. रस्त्यावरच अंथरून टाकावे लागते़ जेवणखाणाची आबाळ होते. मोहोळपासून कुरुल-कामती-मंद्रुपमार्गे सोलापूर-विजापूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता चारपदरी होणार आहे. त्यासाठी आधीच बहुतांश जमीन संपादित करण्यात आलेली आहे.

उर्वरित जमिनीपैकी शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी तुलनेने कमी खर्च आहे़ तर सोलापूर-विजापूर महामार्गापासून औराद- वळसंग-तांदूळवाडीमार्गे हैदराबाद महामार्गाला जोडणारा नवा बाह्यवळण रस्ता दोनपदरी करण्याचे नियोजन आहे. यासाठी मान्यता, निधीची तरतूद आणि भूसंपादन या प्रक्रिया अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे घोषणेनंतर तीन वर्षे उलटून गेली तरी बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. ११० कि़ मी़ लांबीच्या या बाह्यवळण रस्त्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता सोलापूर-पुणे, सोलापूर-विजयपूर आणि सोलापूर-हैदराबाद या रस्त्यांना जोडणारा आहे. त्यामुळे सोलापूर शहरातून होणारी जड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून होेणे शक्य होणार आहे.

कुरुल-कामती-तेरामैल-औराद-वळसंग-तांदूळवाडी हा बाह्यवळण रस्ता जड वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मी स्वत: गेल्या वर्षभरापासून रस्ते विकास महामंडळाकडे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. सोलापूर शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण या बाह्यवळण रस्त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.- संजय पोतदार,कंदलगाव, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक