शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

रेडिमेड शेती अवजारांमुळे पारंपरिक लोहार व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:20 IST

तरूणाची कुटुंबासह भटकंती; शिक्षण अर्धवट सोडून स्वीकारला पिढीजात व्यवसाय

ठळक मुद्देनाशिक तालुक्यातील आंबड या गावचे सचिन सोळंखे हे पत्नी, दोन मुली व एक वर्षाचा छोटा मुलगा घेऊन शेकडो किलोमीटर अंतर पार करून सुस्ते (ता. पंढरपूर) या गावी आलेउन्हाळ्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात़ खरीप पेरणीसाठी विविध अवजारे दुरुस्ती करून घेणे किंवा नवीन घेण्याची शेतकºयांची धडपड सुरू असते़

अंबादास वायदंडे 

सुस्ते : आमच्या अनेक पिढ्यांपासून पोटासाठी लोहार हा व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भटकंती करीत आहोत़ पण वर्तमानकाळात रेडिमेड शेती अवजारे मिळत असल्याने आमचा पारंपरिक व्यवसाय संकटात आला आहे़ आज या गावात तर दोन दिवसानंतर दुसºयाच गावात असे किती दिवस भटकंती करायची, असा सवाल सचिन सोळंखे यांनी उपस्थित केला.

नाशिक तालुक्यातील आंबड या गावचे सचिन सोळंखे हे पत्नी, दोन मुली व एक वर्षाचा छोटा मुलगा घेऊन शेकडो किलोमीटर अंतर पार करून सुस्ते (ता. पंढरपूर) या गावी आले आहेत.

उन्हाळ्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात़ खरीप पेरणीसाठी विविध अवजारे दुरुस्ती करून घेणे किंवा नवीन घेण्याची शेतकºयांची धडपड सुरू असते़ त्यामुळे आम्हाला केवळ शेतकºयांकडून चार पैसे मिळतात़ मात्र यंदा पावसाळा लांबला परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ त्यामुळे यावर्षी शेतकºयांबरोबरच आमच्या व्यवसायावरही संकट निर्माण झाले आहे़ शेतकरी सुखी झाला तरच आम्ही सुखी, असे सचिन सोळंखे सांगत होते.

माझे गावीच केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाले़ त्यानंतर पुढील शिक्षण परिस्थितीमुळे बाहेरगावी जाऊन करणे शक्य झाले नाही़ म्हणून शिक्षण सोडून पारंपरिक लोहार व्यवसाय करण्यास सुरुवात केली़ पूर्वी आई-वडिलांसोबत फिरताना चांगला व्यवसाय व्हायचा़ पण कालानुरुप शेतीतही आधुनिक यंत्राचा वापर वाढला़ रेडिमेड अवजारे शेतकरी वापरु लागले, त्यामुळे आमच्या व्यवसायावर संकट आले़ 

तीन मुले व पत्नीला घेऊन लोहार व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून ७ ते ८ महिने बाहेरगावीच असतो़ गावाकडे वयोवृद्ध आई, वडील असतात. त्यांच्या दवाखान्याचा खर्चही आम्हालाच करावा लागतो़ वर्षातून केवळ चार महिने गावांकडे राहतो़ त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोहार व्यवसायात ७० टक्के महिलांचे योगदानगावोगावी फिरत असताना गावाच्या शेजारी रिकामी जागा दिसली की तेथेच पाल टाकून संसार थाटला जातो़ आम्ही पुरुष मंडळी केवळ लोखंड लाल झाल्यानंतर त्याला आकार देण्याचे काम करतो, पण या व्यवसायात ७० टक्के महिलांचेच योगदान आहे़ कारण ज्या गावात उतरलो त्या गावातून कोळसा गोळा करणे, भात्याला हवा मारणे, लोखंड लाल झाल्यानंतर त्यावर हातोड्याचे घाव मारणे, तयार केलेले अवजार पुन्हा गावात फिरून विकणे ही सर्व कामे महिलाच करतात़ सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे़ शिवाय घरोघरी गॅसचा वापर वाढला आहे़ त्यामुळे आता ग्रामीण भागातही सहजासहजी कोळसा मिळत नाही़ तरीही फिरून थोडा का होईना आणतोच, असे सीमा सोळंखे या सांगत होत्या़ 

टॅग्स :SolapurसोलापूरNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी