शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

रेडिमेड शेती अवजारांमुळे पारंपरिक लोहार व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:20 IST

तरूणाची कुटुंबासह भटकंती; शिक्षण अर्धवट सोडून स्वीकारला पिढीजात व्यवसाय

ठळक मुद्देनाशिक तालुक्यातील आंबड या गावचे सचिन सोळंखे हे पत्नी, दोन मुली व एक वर्षाचा छोटा मुलगा घेऊन शेकडो किलोमीटर अंतर पार करून सुस्ते (ता. पंढरपूर) या गावी आलेउन्हाळ्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात़ खरीप पेरणीसाठी विविध अवजारे दुरुस्ती करून घेणे किंवा नवीन घेण्याची शेतकºयांची धडपड सुरू असते़

अंबादास वायदंडे 

सुस्ते : आमच्या अनेक पिढ्यांपासून पोटासाठी लोहार हा व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भटकंती करीत आहोत़ पण वर्तमानकाळात रेडिमेड शेती अवजारे मिळत असल्याने आमचा पारंपरिक व्यवसाय संकटात आला आहे़ आज या गावात तर दोन दिवसानंतर दुसºयाच गावात असे किती दिवस भटकंती करायची, असा सवाल सचिन सोळंखे यांनी उपस्थित केला.

नाशिक तालुक्यातील आंबड या गावचे सचिन सोळंखे हे पत्नी, दोन मुली व एक वर्षाचा छोटा मुलगा घेऊन शेकडो किलोमीटर अंतर पार करून सुस्ते (ता. पंढरपूर) या गावी आले आहेत.

उन्हाळ्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात़ खरीप पेरणीसाठी विविध अवजारे दुरुस्ती करून घेणे किंवा नवीन घेण्याची शेतकºयांची धडपड सुरू असते़ त्यामुळे आम्हाला केवळ शेतकºयांकडून चार पैसे मिळतात़ मात्र यंदा पावसाळा लांबला परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ त्यामुळे यावर्षी शेतकºयांबरोबरच आमच्या व्यवसायावरही संकट निर्माण झाले आहे़ शेतकरी सुखी झाला तरच आम्ही सुखी, असे सचिन सोळंखे सांगत होते.

माझे गावीच केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाले़ त्यानंतर पुढील शिक्षण परिस्थितीमुळे बाहेरगावी जाऊन करणे शक्य झाले नाही़ म्हणून शिक्षण सोडून पारंपरिक लोहार व्यवसाय करण्यास सुरुवात केली़ पूर्वी आई-वडिलांसोबत फिरताना चांगला व्यवसाय व्हायचा़ पण कालानुरुप शेतीतही आधुनिक यंत्राचा वापर वाढला़ रेडिमेड अवजारे शेतकरी वापरु लागले, त्यामुळे आमच्या व्यवसायावर संकट आले़ 

तीन मुले व पत्नीला घेऊन लोहार व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून ७ ते ८ महिने बाहेरगावीच असतो़ गावाकडे वयोवृद्ध आई, वडील असतात. त्यांच्या दवाखान्याचा खर्चही आम्हालाच करावा लागतो़ वर्षातून केवळ चार महिने गावांकडे राहतो़ त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोहार व्यवसायात ७० टक्के महिलांचे योगदानगावोगावी फिरत असताना गावाच्या शेजारी रिकामी जागा दिसली की तेथेच पाल टाकून संसार थाटला जातो़ आम्ही पुरुष मंडळी केवळ लोखंड लाल झाल्यानंतर त्याला आकार देण्याचे काम करतो, पण या व्यवसायात ७० टक्के महिलांचेच योगदान आहे़ कारण ज्या गावात उतरलो त्या गावातून कोळसा गोळा करणे, भात्याला हवा मारणे, लोखंड लाल झाल्यानंतर त्यावर हातोड्याचे घाव मारणे, तयार केलेले अवजार पुन्हा गावात फिरून विकणे ही सर्व कामे महिलाच करतात़ सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे़ शिवाय घरोघरी गॅसचा वापर वाढला आहे़ त्यामुळे आता ग्रामीण भागातही सहजासहजी कोळसा मिळत नाही़ तरीही फिरून थोडा का होईना आणतोच, असे सीमा सोळंखे या सांगत होत्या़ 

टॅग्स :SolapurसोलापूरNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी