शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अपंग चैतन्यसह तिघांनी फडकविला साडेबारा हजार फुटांवर तिरंगा ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 16:06 IST

सोलापूर : एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या ३६० एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनालीजवळ ‘नेगीडुग’ या ठिकाणी १२,५०० फूट चढाई ...

ठळक मुद्दे हिमालयाच्या नेगीडुगवर ३६० एक्सप्लोरर ग्रुपची चढाईअपंगत्व आलेला चैतन्य कुलकर्णी यानेही ही उंची गाठून एक विक्रम प्रस्थापित केला १० फेब्रुवारी रोजी ही मोहीम सुरु होऊन १४ फेब्रुवारी रोजी यशस्वी झाली

सोलापूर : एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या ३६० एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनालीजवळ ‘नेगीडुग’ या ठिकाणी १२,५०० फूट चढाई करून भारताचा तिरंगा फडकविला आहे. १० फेब्रुवारी रोजी ही मोहीम सुरु होऊन १४ फेब्रुवारी रोजी यशस्वी झाली. चार वर्षांपूर्वी झाडावर पडून अपंगत्व आलेला चैतन्य कुलकर्णी यानेही ही उंची गाठून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. 

गेले वर्षभर एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व मानसिक तयारी तो करत होता. मुंबईमध्ये सध्या काम करत असलेले गणेश नारकर व रमेश कलेल यांनीही ही उंची गाठण्यात यश मिळवले आहे. याच काळात मनाली परिसरात हाय-अलर्ट होता व सतत बर्फ पडून सर्व वाट निसरडी झाली होती. 

धोकादायक रस्ता, धुके, पडणारा बर्फ अशा अनेक अडचणींना तोंड देत सर्वांनी ‘नेगीडुग’ हा ट्रेक पूर्ण केला. या मोहिमेत गणेश नारकर व रमेश कलेल हेही सहभागी झाले होते.

अपंगत्वावर मात

  • - कमरेखालील भाग पॅरालाईज झालेला असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर चैतन्य कुलकर्णी याने हिमालयात सलग चार दिवस ट्रेकिंग करून १२,५०० फूट उंच जाऊन भारतीय ध्वज फडकविला. भीतीवर मात आणि आनंद बनसोडे यांचे प्रशिक्षण यामुळे हे यश मिळाल्याचे चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितले. 

हिमालयाच्या १२,५०० फुटांवर पोहोचून सर्व जण भाऊक झाले होते. तिरंगा फडकवताना सर्वांना अभिमान वाटला. येणाºया काळात अशा अनेक मोहिमांद्वारे गिर्यारोहण व निसर्ग भटकंतीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम करणार आहे. - आनंद बनसोडे, एव्हरेस्टवीर

टॅग्स :SolapurसोलापूरEverestएव्हरेस्ट