शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील भीमा पाटबंधारे कार्यालयात शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:23 IST

कुरूल वितरिकेच्या २३ नं. फाट्याला पाणी सोडण्याची मागणी, अधिकाºयांची उडवाउडवीची उत्तरे

ठळक मुद्देउजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडलेमंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाहीशेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला

सोलापूर : कुरूल वितरिकेच्या २३ नंबर फाट्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मंद्रुप येथील शेतकºयांनी बुधवारी दिवसभर होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या भीमा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या मारला तरी शेतकºयांच्या मागणीकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष केले.

उजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडले आहे. मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने हे पाणी बंद करण्यात आले. यात मंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाही. याबाबत संबंधित शेतकºयांनी पाटकºयास विनंती केली तरी त्याने उद्धटपणे उत्तरे देऊन पाणी बंद केले. त्यामुळे संतापलेले शेतकरी अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. शिवानंद झळके, शेतकरी संघटनेचे मेहमूद पटेल, बिळेणसिद्ध सुंटे, पंचायत समिती सदस्य अमृत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा कार्यालयात जमा झाले. या शेतकºयांनी कार्यकारी अभियंता जोशी यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

त्यावर जोशी यांनी या शेतकºयांना जलसंपदा कार्यालय क्र. २ मधील कार्यकारी अभियंता हरसूर यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे हे सर्व शेतकरी होटगी रस्त्यावरील जलसंपदा कार्यालय क्र. २ मध्ये आले, पण कार्यालयात हरसूर नव्हते.  भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावर त्यांनी या खेपेस पाणी सोडणे शक्य नाही, पुढील पाळीस विचार करू, असे उत्तर दिले. त्यावर संबंधित शेतकºयांनी तुम्ही कार्यालयात या आपण चर्चा करू अशी विनंती केल्यावर येतो, असे त्यांनी उत्तर दिले. त्यांची वाट पाहत बुधवार रात्री उशिरापर्यंत शेतकरी कार्यालयात ठाण मांडून होते. 

कर्मचारी कार्यालय बंद करून गेले तरी हे शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. कार्यकारी अभियंता   हरसूर यांनी येऊन निवेदन स्वीकारावे असा त्यांचा हट्ट होता. याची  माहिती मिळाल्यावर विजापूरनाका पोलिसांनी तेथे धाव घेतली.  त्यावेळी शेतकºयांनी निवेदन घेण्यास कोणी आले नसल्याची तक्रार केली. शेवटी पोलिसांनी समजूत काढून रात्री उशिरा त्यांना सोडून दिले. 

शेतकरी संतप्त.......कैफियत ऐकून घेण्यास कोणीच तयार नाही व निवेदन कोणी घेत नाही, असे पाहून शेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला. कोण म्हणतंय देत नाही, पाणी आमच्या हक्काचे, उजनीचे पाणी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, अशी घोषणाबाजी केली. पण शेतकºयांच्या व्यथेकडे कर्मचाºयांनी लक्ष दिले नाही. जलसंपदाच्या अधिकाºयांच्या आडमुठे भूमिकेविषयी शेतकरी सुकुमार साठे, संतोष साठे, रोहित हजारे यांनी तीव्र भावना मांडल्या.

अधीक्षकांचेही दुर्लक्ष- जलसंपदा कार्यालयात शेतकरी ठाण मांडून बसल्यावरही अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पाटबंधारे अधीक्षक शिवाजी चौगुले यांना याबाबत लक्ष घालण्याबाबत सांगतो असा निरोप दिला पण पाटबंधारे कार्यालयाकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूक