शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सोलापूरातील भीमा पाटबंधारे कार्यालयात शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:23 IST

कुरूल वितरिकेच्या २३ नं. फाट्याला पाणी सोडण्याची मागणी, अधिकाºयांची उडवाउडवीची उत्तरे

ठळक मुद्देउजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडलेमंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाहीशेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला

सोलापूर : कुरूल वितरिकेच्या २३ नंबर फाट्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मंद्रुप येथील शेतकºयांनी बुधवारी दिवसभर होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या भीमा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या मारला तरी शेतकºयांच्या मागणीकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष केले.

उजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडले आहे. मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने हे पाणी बंद करण्यात आले. यात मंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाही. याबाबत संबंधित शेतकºयांनी पाटकºयास विनंती केली तरी त्याने उद्धटपणे उत्तरे देऊन पाणी बंद केले. त्यामुळे संतापलेले शेतकरी अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. शिवानंद झळके, शेतकरी संघटनेचे मेहमूद पटेल, बिळेणसिद्ध सुंटे, पंचायत समिती सदस्य अमृत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा कार्यालयात जमा झाले. या शेतकºयांनी कार्यकारी अभियंता जोशी यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

त्यावर जोशी यांनी या शेतकºयांना जलसंपदा कार्यालय क्र. २ मधील कार्यकारी अभियंता हरसूर यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे हे सर्व शेतकरी होटगी रस्त्यावरील जलसंपदा कार्यालय क्र. २ मध्ये आले, पण कार्यालयात हरसूर नव्हते.  भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावर त्यांनी या खेपेस पाणी सोडणे शक्य नाही, पुढील पाळीस विचार करू, असे उत्तर दिले. त्यावर संबंधित शेतकºयांनी तुम्ही कार्यालयात या आपण चर्चा करू अशी विनंती केल्यावर येतो, असे त्यांनी उत्तर दिले. त्यांची वाट पाहत बुधवार रात्री उशिरापर्यंत शेतकरी कार्यालयात ठाण मांडून होते. 

कर्मचारी कार्यालय बंद करून गेले तरी हे शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. कार्यकारी अभियंता   हरसूर यांनी येऊन निवेदन स्वीकारावे असा त्यांचा हट्ट होता. याची  माहिती मिळाल्यावर विजापूरनाका पोलिसांनी तेथे धाव घेतली.  त्यावेळी शेतकºयांनी निवेदन घेण्यास कोणी आले नसल्याची तक्रार केली. शेवटी पोलिसांनी समजूत काढून रात्री उशिरा त्यांना सोडून दिले. 

शेतकरी संतप्त.......कैफियत ऐकून घेण्यास कोणीच तयार नाही व निवेदन कोणी घेत नाही, असे पाहून शेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला. कोण म्हणतंय देत नाही, पाणी आमच्या हक्काचे, उजनीचे पाणी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, अशी घोषणाबाजी केली. पण शेतकºयांच्या व्यथेकडे कर्मचाºयांनी लक्ष दिले नाही. जलसंपदाच्या अधिकाºयांच्या आडमुठे भूमिकेविषयी शेतकरी सुकुमार साठे, संतोष साठे, रोहित हजारे यांनी तीव्र भावना मांडल्या.

अधीक्षकांचेही दुर्लक्ष- जलसंपदा कार्यालयात शेतकरी ठाण मांडून बसल्यावरही अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पाटबंधारे अधीक्षक शिवाजी चौगुले यांना याबाबत लक्ष घालण्याबाबत सांगतो असा निरोप दिला पण पाटबंधारे कार्यालयाकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूक