शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर त्यांना 'गव्हर्नमेंट फ्री' करायचंय! सुब्रम्हण्यम स्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

By रवींद्र देशमुख | Updated: April 27, 2023 19:12 IST

याबाबतची सुनावणी दि. २८ एप्रिल रोजी होणार आहे.

सोलापूर : पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत असलेला कायदा घटनाविरोधी असून मंदिर सरकार मुक्त व्हावे, यासाठीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. याबाबतची सुनावणी दि. २८ एप्रिल रोजी होणार आहे.

डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी पंढरपुरात येऊन सर्व माहिती घेऊन विधिज्ञांशी चर्चा करून ही जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनातील विधी व न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. हिंदूंची मंदिरे हे सरकारमुक्त असावीत, असा युक्तिवाद त्यांनी यापूर्वी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथे न्यायालयात केला. या ठिकाणी न्यायालयाने सरकारचे नियंत्रण हटवले आहे. त्याच धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर शासनाच्या सरकारीकरणातून मुक्त करावे, अशा मागणीची याचिका माजी खा.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ८ मार्च २०२३ रोजी याचिका क्र. ४३६८/२०२३ नुसार याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत केलेला कायदा हा संविधानाला धरून नाही घटनाविरोधी आहे. एका मंदिरासाठी कायदा करता येत नाही. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कायदा हा बेकायदेशीर असून घटनाविरोधी आहे, असे म्हणणे माजी खा डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिकेत मांडले आहे. याची सुनावणी उद्या २८ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीSolapurसोलापूरCourtन्यायालय