शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर महापालिका भरविणार वृक्ष महोत्सव, मोफत दहा हजार रोपे वाटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:39 IST

अनोखा उपक्रम : पावसाळ्यात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देराज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत महापालिका ३० हजार झाडे लावणारवन विभागाच्या नर्सरीतून दोन ते तीन फूट उंचीची दहा हजार झाडे घेण्यात आलीरामवाडी आणि परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून शहराच्या विविध भागात लावण्याचे काम सुरू होणार

सोलापूर : पावसाळ्यात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आॅगस्टअखेर कृषी महोत्सवाच्या धर्तीवर वृक्ष महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान नागरिकांना दहा हजार रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागप्रमुख निशिकांत कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत महापालिका ३० हजार झाडे लावणार आहे. वन विभागाच्या नर्सरीतून दोन ते तीन फूट उंचीची दहा हजार झाडे घेण्यात आली आहेत. रामवाडी आणि परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून शहराच्या विविध भागात लावण्याचे काम सुरू होणार आहे. याशिवाय उद्यान विभागाने आठ ते दहा फूट उंचीची आणखी १५ हजार झाडे खरेदीची निविदा काढली आहे. १५ आॅगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, शासनाने महापालिकांच्या स्तरांवर वृक्ष महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात वृक्ष महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन उद्यान विभागाने सुरू केले आहे. मनपाच्या जागेत हा महोत्सव होईल.

यात शहर आणि जिल्ह्यातील नर्सरीमधील रोपे  ठेवण्यात येणार आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत काम करणाºया संस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना मागणीनुसार आवश्यक ती रोपे अल्प दरात खरेदी करता येतील. या महोत्सवाचा प्रस्ताव मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. पर्यावरण प्रेमी व्यक्तींनी मनपाला दहा हजार रोपे मोफत देण्याची तयारी दाखविली आहे. ही रोपे नागरिकांना भेट देण्यात येणार आहेत. शहरातील इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. उद्यान विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे. 

शहराला हरित आच्छादित प्रदेश करा- उद्यान विभागप्रमुख निशिकांत कांबळे म्हणाले, नागरिकांनी झाडे लावताना संरक्षक भिंतीपासून चार फूट अंतरावर लावावीत. वाहतुकीला अडथळा होऊ नये, वीज वितरण तारांपासून ठराविक अंतर असावे याची काळजी घ्यावी. अंगणात झाड लावणार असाल तर कडूलिंब,  बकूळ, पिवळा चाफा, बहावा, हिरडा, केशर आंबा, जंगली आवळा आदी वृक्षांची लागवड करावी. यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करुन सोलापूर शहराला हरित आच्छादित प्रदेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका