शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विकलेल्या वाहनांवरील तुमचे नाव न काढल्यास येणार मोठया अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 17:43 IST

नाव काढले का खात्री करा : वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अनेकजण करीत नाहीत

सोलापूर : वाहन विकल्यानंतर परिवहन विभागातील प्रक्रिया पूर्ण करून ते वाहन संबंधितांच्या नावे करावे लागते. ही वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अनेकजण करीत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांचा अपघात झाला किंवा ते चोरीस गेले तर अडचणी येतात. त्यामुळे वाहन विकले; पण तुमचे नाव काढले का याची खात्री करायला हवी.

जुन्या गाडीची विक्री अथवा ती खरेदी करत असाल तर अनेकदा रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करण्यासाठी त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. कोणतेही जुने वाहन खरेदी केल्यावर आरसी तुमच्या नावावर करून घ्यावे लागते. त्याशिवाय तुम्ही त्या गाडीचे कायदेशीर मालक होत नाही. मोटार वाहन मालकी हस्तांतरण केल्याशिवाय तुम्हाला वाहनावर हक्क सांगता येत नाही. अपघातावेळी तर अनेक क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. तेव्हा भविष्यातील त्रासापासून वाचण्यासाठी वेळीच हा बदल करणे गरजेचे आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात लोक दरवर्षी दुचाकी मोटारसायकल, रिक्षा, चारचाकी कार, मोठी जड वाहने आदी विविध प्रकारची वाहने विक्री करतात. सेकन्ड हॅन्ड वाहन खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय चालतो. मित्र असो किंवा ओळखीच्या लोकांमध्येही असे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात. आरटीओ ऑफिसला जाऊन रितसर ट्रान्सफर करण्यास काही लोक कंटाळा करतात; मात्र हा कंटाळा भविष्यात त्यांना धोकादायक ठरू शकते.

कोणत्या वर्षी किती वाहनांचे झाले ट्रान्सफर?

  • २०१८/१९ १९१२३
  • २०१९/२० १९७१९
  • २०२०/२१ १५६१७
  • २०२१/२२ २१२२०

कोणत्या वर्षी किती वाहनांची चोरी?

  • २०१८ ६७
  • २०१९ ७०
  • २०२० १७
  • २०२१ ८२

कोणत्या वर्षी किती प्राणांतिक अपघात?

  • २०१८ ४९
  • २०१९ ४३
  • २०२० १६
  • २०२१ २१

वाहन ट्रान्सफर करणे सोपे

० वाहन ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या परिवहन कार्यालयात धाव घ्यावी लागेल. थेट अर्ज करून आरसी बुक तुमच्या नावावर करता येईल. गाडीसंबंधीची सर्व कागदपत्रे शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर संबंधित तारखेला कार्यालयात हजर रहावे लागेल. कोणत्याही वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या १४ दिवसानंतर मोटार वाहन मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, असा कायदा सांगतो. ३० दिवसानंतर आरसी ट्रान्सफर होऊन स्मार्ट कार्डच्या रूपात वाहनधारकाच्या पत्त्यावर पाठविली जाते. जर वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करायचे असेल तर अर्ज क्रमांक २८ चा वापर करण्यात येतो.

 

वाहन कोणतेही असो ते विक्री करीत असताना, वाहनाची मालकी कायद्याने दुसऱ्याला देणे आवश्यक आहे. वेळच्या वेळी ही प्रक्रिया पूर्ण केल्यास विकत घेणाऱ्याला अन् विकणाऱ्याला भविष्यात अडचण येत नाही.

- विजय तिराणकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसThiefचोरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस