शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जरूर दिवाळे निघेल, पण महाराष्ट्राचे नाही! शेतकऱ्यांची दिवाळी होईल; केसीआरनी सर्वच पक्षांवर तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:28 IST

KCR Maharashtra, Pandharpur Visit: आम्ही जेव्हा पंढरपूरला निघालो तेव्हा इथे जरूर या, राजकारण करू नका असे बोलले गेले. मी पंढरपुरात एक शब्द बोललो नाही. पण इथे बोलणार, असे सांगत केसीआर यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले. 

तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले. यानंतर ते सरकोली येथील शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी आले. इथे त्यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यानंतर केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा आम्हाला संधी देऊन पहा, इथे शेतकऱ्यांना विमा का नाही, असा सवाल करत भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांवर तोफ डागली.

मी मराठीत बोलू शकत नाही, परंतू मराठी समजू शकतो. स्वातंत्र्याची लढाई आज पुन्हा एकदा लढावी लागणार आहे. नव्या उदयाच्या दिशेने देशाला चालावे लागणार आहे. जगातील अनेक देश आपल्या समोरच कुठल्याकुठे पोहोचले आहेत. सा. कोरिया, जपान, सिंगापूर, मलेशिया, बाजुला चीन आहे. १९८२ पर्यंत चीन आपल्यापेक्षा गरीब होता. आज कुठे आहे, याचा विचार करावा लागेल. निवडणुका येतात, जातात कोणी ना कोणी जिंकत असतो. आजवर किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रात एक पक्ष सांगा ज्याला तुम्ही संधी दिली नाही. काँग्रेसला ५० वर्षे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाला संधी दिलीत. करायचे असते तर यापैकी कोणीतरी केले असते. तेलंगानाच्या छोट्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही केले जाऊ शकते. भालकेंनी तुम्हाला सर्व योजना सांगितल्यात. जर तेलंगानात या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्रात का नाही. शेतकऱ्यांना विमा का नाही, तेलंगानात जे काही सुरु आहे, ते भुलभुलय्या आहे, ते केले तर महाराष्ट्राचे दिवाळे निघेल असे सांगितले जात आहे, ते खोटे असल्याचे केसीआर म्हणाले. 

जरूर दिवाळे निघेल, पण नेत्यांचे निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल. आम्ही कुठून पैसे आणतोय, लोकांची दिशाभूल केली जातेय. बीआरएस राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही जेव्हा पंढरपूरला निघालो तेव्हा इथे जरूर या, राजकारण करू नका असे बोलले गेले. मी पंढरपुरात एक शब्द बोललो नाही. पण इथे बोलणार, असे सांगत केसीआर यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले. 

महाराष्ट्रात आताच आम्ही सुरुवात केलीय, एवढी धास्ती का आहे या पक्षांमध्ये? एवढे का घाबरलेत हे लोक? आम्हाला तर तीन चार महिनेच झालेत. मला समजतच नाहीय. भाजपा आरोप करतेय, राष्ट्रवादी काँग्रेसने तर आम्हाला भाजपची बी टीम म्हटले आहे. आम्ही कोणाची टीम नाही, तर शेतकऱ्यांची, गरीबांची, दलितांची टीम आहोत, असे केसीआर म्हणाले. कोणत्याही पक्षाने म्हटलेले नाही की अबकी बार किसान की सरकार. का नाही म्हटले. ६०-७० टक्के लोक तर शेतकरी आहेत. हा पक्ष तेलंगाना किंवा महाराष्ट्रापुरती सिमीत पक्ष नाहीय. परिवर्तित भारत हेच सर्व समस्यांचे निराकरण आहे, असे केसीआर म्हणाले. 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर