शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सर्वधर्म समभाव हीच भारताची खरी ओळख! देशाला बलवान बनवण्यासाठी एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करा - मुफ्ती सय्यद अहमद घोरी

By संताजी शिंदे | Updated: April 11, 2024 12:32 IST

Solapur News: सर्वधर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून, या देशाला जागतीक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत, जाने निजामी हैद्राबाद येथील असोसिएट प्रोफेसर मुफ्ती सय्यद अहमद घोरी नक्स बंदी यांनी व्यक्त केले.

- संताजी शिंदे सोलापूर - भारत हा असा देश आहे, जेथे हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध यासह अन्य विविध धर्माचे लोक राहतात. सर्वधर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून, या देशाला जागतीक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत, जाने निजामी हैद्राबाद येथील असोसिएट प्रोफेसर मुफ्ती सय्यद अहमद घोरी नक्स बंदी यांनी व्यक्त केले.

पानगल येथील शाही आलमगीर ईदगाह येथे रमजान ईद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नमाज पठणा दरम्यान ते बोलत होते. पानगलच्या मैदानावर सकाळी ८.३० वाजता नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर ते समस्त हिंदू मुस्लिम बांधवांना उद्देशून बोलताना म्हणाले की, सर्व धर्मीय देशाची जी ओळख आहे ती कायम राहिली पाहिजे. सध्याच्या युगात शिक्षणाशिवाय विकास होणे शक्य नाही. जगातील प्रत्येक देशाने शिक्षणावर भर दिला आहे. आपल्या ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. सर्वांसोबत चांगले वागले पाहिजे.

सकाळी ८ वाजताच मैदानावर मुस्लिम बांधवांनी येण्यास सुरूवात केली. चटई, बेडशी खाली आंथरून नमाजाच्या स्थितीत बसत होते. ८.३० वाजता मुफ्ती सय्यद अहमद घोरी यांनी नमाजाला सुरूवात केली. पांढरे शुभ्र कपडे परिधान करून हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

पावसासाठी केली दुवा- नमाज पठना दरम्यान मुफ्ती सय्यद अहमद घेरी यांनी यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडू दे अशी याचना केली. आमच्याकडून काही पाप झाले असल्यास आम्हाला माफ कर, भारतामध्ये सुख समृद्धी निर्माण होऊ दे. शांतता नांदू ने अशी प्रार्थना केली. -  ईद हा शांतता व मानवतेचा संदेश देणारा सण असून हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवत देशाच्या उज्वल भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही योळी केले.   

टॅग्स :Solapurसोलापूर