शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गरिबांचा फ्रीज कुंभारांनाच आता परवडेना, आकर्षक माठात पाणी गारच होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:58 IST

माठातील पाण्याला एक प्रकारची वेगळी गोडी असल्याने अनेकजण माठातीलच पाणी पिणे पसंद करतात

सोलापूर/वैराग : फिरत्या चाकावर स्वत:लासुद्धा चक्कर येईल एवढं गरगर चाक फिरवून तयार होणारा गरिबांचा फ्रिज आता घेणाऱ्यांपेक्षा बनवणाऱ्यांनाच परवडेनासा झालाय, अशी खंत तडवळे (ता. बार्शी) येथील बापू कुंभार या माठ बनवणाऱ्या व्यावसायिकांनी मांडली. कारण, पूर्वी नदीकडेची माती फुकट मिळत होती. परंतु आता ती विकत आणावी लागत आहे.

माठातील पाण्याला एक प्रकारची वेगळी गोडी असल्याने अनेकजण माठातीलच पाणी पिणे पसंद करतात. या माठाला गरिबाचा फ्रीज म्हणून संबोधले जाते; पण हाच फ्रीज आता घेणाऱ्यांपेक्षा बनवणाऱ्यांना परवडेनासा झाला आहे. कारण पूर्वी नदीकडेची माती फुकट मिळत होती; परंतु आता ती विकत आणावी लागतेय. तसेच पूर्वी गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी घोडे असायचे त्याची लीदही मोफत मिळत असे. आता घोडेच कमी झाल्यामुळे ती लीदपण दुरापास्त झाली आहे. त्याच्या जागी लाकडाचा भुसा मातीत मिसळण्यासाठी आणावा लागत आहे. लाकडे कापण्याच्या मिलमध्ये अगदी थोड्याच असल्याने भुसाही महाग मिळत आहे; परंतु ग्राहक आमच्या मुद्दलापेक्षाही कमी दरात वस्तूची मागतो. त्यामुळे मनाला खूप वाईट वाटते, अशी व्यथा बापू कुंभार यांनी व्यक्त केली.

गुजरात, राजस्थानमधून माठ

सध्या गुजरात आणि राजस्थान येथून आकर्षक बनवलेले माठ बाजारात येत आहेत; परंतु यामध्ये पाणी थंड होत नाही तसेच यातील पाणी महाराष्ट्रीयन माठासारखे निरोगी गुणधर्माप्रमाणे राहत नाही.

रक्तदाबाच्या त्रासापासून सुटका

महाराष्ट्रीयन माठातील पाणी प्याल्याने टॉन्सिल, सर्दी, घसा याचा त्रास होत नाही. गॅसच्या समस्या उद्भवत नाहीत. पोटाला नैसर्गिक थंडावा मिळून उष्णतेपासून सुटका होते. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून रक्तदाबाच्या त्रासापासून काही प्रमाणात दूर राहता येते चेहऱ्यावर फोड, मुरूम न येता चेहरा चमकदार राहतो. आणि विशेष म्हणजे ही माती विषारी गुणधर्म शोषूण घेणारी असल्याने आपल्याला निरोगी पाणी मिळते, असे डाॅ. सचिन पाटील यांनी सांगितले.

सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे. त्यातच भारनियमानामुळे फ्रीजमध्ये पाणी थंड राहत नाही. तसेच माठासारखी त्या पाण्याला चव येत नाही; परंतु माठांच्या किमतीही वाढलेल्या आहेत. महागाई खूप झाली आहे. कुंभारांच्या कष्टाचा विचार करता महिलांनीही योग्य किंमत देऊन माठ खरेदी करण्यास काही हरकत नाही.

-राणी आदमाने, नगरसेविका

लहान मुलाबाळांसह कुठल्याही यंत्राचा वापर न करता दिवसरात्र खूप कष्ट करतो. आमच्या मुलांबाळांना वेळेवर जेवणही मिळत नाही. सर्व कच्चा माल वाढत्या महागाईमुळे स्वस्त मिळत नाही. याचादेखील सहानुभूतीने ग्राहकांनी विचार करून आम्हाला जास्त तर नकोच, पण योग्य दाम द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे.

-सुनंदा कुंभार, माठ विक्रेते, वैराग

टॅग्स :WaterपाणीSummer Specialसमर स्पेशल