शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

चांदणी नदीवर पुलाला भगदाड, बार्शी-भूम वाहतूक झाली ठप्प

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 24, 2024 18:57 IST

पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.  

सोलापूर  : बार्शी तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून आगळगावची ओळख आहे. या गावची लोकसंख्या सुमारे १० हजारांच्या आसपास असून, या गावातून बार्शी-भूम-आगळगाव हा रस्ता तालुक्यास जोडणारा मार्ग आहे. या गावाजवळून जाणाऱ्या चांदणी नदीवरील पुलास मोठे भगदाड पडले असून बार्शी-भूम वाहतूक ठप्प झाली आहे.

 आगळगाव हे आठवडी बाजाराचे गाव असल्याने व आगळगाव बाजाराचे केंद्रबिंदू आहे. याच गावातून चांदणी नदी वाहते याच नदीवरील पुलाला गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठे भगदाड पडले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. चांदणी नदीचा उगम धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथून झाला असून, या नदीला पावसाळ्यात भरपूर पाणी येते. त्यातच पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा तासन् तास वाहतूक खोळंबली जाते. चांदणी नदीवरील पुलाला सुमारे २५ ते ३० वर्षे झाले असून, पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्यातच पुलाला भगदाड पडले आहे.

याच पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.  

चांदणी नदीच्या पुलावरील भगदाड लवकरात लवकर बुजवावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शी यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करु. -पोपट डमरे, माजी सदस्य, जिल्हा परिषद 

टॅग्स :Rainपाऊस