शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चांदणी नदीवर पुलाला भगदाड, बार्शी-भूम वाहतूक झाली ठप्प

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 24, 2024 18:57 IST

पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.  

सोलापूर  : बार्शी तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून आगळगावची ओळख आहे. या गावची लोकसंख्या सुमारे १० हजारांच्या आसपास असून, या गावातून बार्शी-भूम-आगळगाव हा रस्ता तालुक्यास जोडणारा मार्ग आहे. या गावाजवळून जाणाऱ्या चांदणी नदीवरील पुलास मोठे भगदाड पडले असून बार्शी-भूम वाहतूक ठप्प झाली आहे.

 आगळगाव हे आठवडी बाजाराचे गाव असल्याने व आगळगाव बाजाराचे केंद्रबिंदू आहे. याच गावातून चांदणी नदी वाहते याच नदीवरील पुलाला गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठे भगदाड पडले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. चांदणी नदीचा उगम धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथून झाला असून, या नदीला पावसाळ्यात भरपूर पाणी येते. त्यातच पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा तासन् तास वाहतूक खोळंबली जाते. चांदणी नदीवरील पुलाला सुमारे २५ ते ३० वर्षे झाले असून, पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्यातच पुलाला भगदाड पडले आहे.

याच पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.  

चांदणी नदीच्या पुलावरील भगदाड लवकरात लवकर बुजवावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शी यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करु. -पोपट डमरे, माजी सदस्य, जिल्हा परिषद 

टॅग्स :Rainपाऊस