शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

स्वामीभक्तांची सुरक्षा रामभरोसे! गर्दी वाढली तरीही मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:44 IST

मागील तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक बरखास्त करण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'वर राहिली आहे.

अक्कलकोट - तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात पूर्वी भक्तांची गर्दी कमी असताना पोलिसांचे सुरक्षा पथक कार्यरत होते मात्र गर्दी तिपटीने वाढलेली असताना पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्वामी भक्तांची सुरक्षा रामभरोसे राहिली असून पुन्हा पोलिसांचे सुरक्षा पथक नेमण्याची मागणी होत आहे.

स्वामी समर्थ दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भक्त येतात. पाच वर्षांपूर्वी भक्तांची संख्या कमी होती. आता मागील तीन वर्षांत भाविकांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी संख्या कमी असताना भक्तांच्या सुरक्षेसाठी सोलापूर येथील पोलिस मुख्यालयातील ६ पोलिस कर्मचारी, २ हवालदार असे मनुष्यबळ कार्यरत होते. प्रत्येकी १२ तासांची मंदिरात ड्युटी राहायची. मागील तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक बरखास्त करण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'वर राहिली आहे. परिणामी चोऱ्या-माऱ्या वाढलेल्या आहेत. याला आवर घालण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त पूर्ववत करण्याची मागणी स्वामी भक्तांमधून होत आहे.

महिला पोलिसांचाही बंदोबस्त द्या

जेव्हा भक्तांची वर्दळ कमी होती, तेव्हा पोलिसांचे सुरक्षा पथक कार्यरत होते. सध्या मनुष्यबळाची संख्या वाढलेली असताना सुरक्षा रक्षक काढून घेण्यात आले आहे. वाढती गर्दी व रोज चोरीला जाणारे मोबाइल, भक्तांना होणारी मारहाण, अरेरावी, उर्मटपणा या सगळ्या गोष्टी बंद करावयाच्या असल्यास पुन्हा सुरक्षा पथक कार्यरत करणे आवश्यक आहे. पूर्वी ६ पोलिस कर्मचारी, २ हवालदार होते. त्यात वाढ करून दिवसभरासाठी महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. या पोलिसांसाठी मंदिरात गार्ड रूम सुद्धा होती.

पूर्वी अनेक वर्ष मंदिरात पोलिस बंदोबस्त होता. मागील तीन-चार वर्षांपासून पोलिस बंदोबस्त काढण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मंदिरासाठी वाढती गर्दी पाहता पोलिस बंदोबस्त आवश्यक असून यासाठी पोलिस विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवल्यास पोलिसांच्या राहण्याची तसेच भोजनाचीही व्यवस्था करू. - महेश इंगळे,चेअरमन, स्वामी समर्थ मंदिर समिती

मी येण्यापूर्वी बंदोबस्त होता, असे सांगण्यात येते. तो बंदोबस्त आता बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. कोणत्या कारणास्तव नेमले आणि बंद केले याची मला काही माहिती नाही. सध्या गरजेचे वाटते. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ही बाब कळविली आहे. ज्या ठिकाणी मंदिर शासन ताब्यात असते, त्या ठिकाणी शासन बंदोबस्त देते. खासगी असेल, तर त्यांच्याकडून नेमणूक होणे आवश्यक असते.- राजेंद्र टाकणे, पोलिस निरीक्षक.

टॅग्स :Policeपोलिस