शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

स्वामीभक्तांची सुरक्षा रामभरोसे! गर्दी वाढली तरीही मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:44 IST

मागील तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक बरखास्त करण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'वर राहिली आहे.

अक्कलकोट - तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात पूर्वी भक्तांची गर्दी कमी असताना पोलिसांचे सुरक्षा पथक कार्यरत होते मात्र गर्दी तिपटीने वाढलेली असताना पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्वामी भक्तांची सुरक्षा रामभरोसे राहिली असून पुन्हा पोलिसांचे सुरक्षा पथक नेमण्याची मागणी होत आहे.

स्वामी समर्थ दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भक्त येतात. पाच वर्षांपूर्वी भक्तांची संख्या कमी होती. आता मागील तीन वर्षांत भाविकांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी संख्या कमी असताना भक्तांच्या सुरक्षेसाठी सोलापूर येथील पोलिस मुख्यालयातील ६ पोलिस कर्मचारी, २ हवालदार असे मनुष्यबळ कार्यरत होते. प्रत्येकी १२ तासांची मंदिरात ड्युटी राहायची. मागील तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक बरखास्त करण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'वर राहिली आहे. परिणामी चोऱ्या-माऱ्या वाढलेल्या आहेत. याला आवर घालण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त पूर्ववत करण्याची मागणी स्वामी भक्तांमधून होत आहे.

महिला पोलिसांचाही बंदोबस्त द्या

जेव्हा भक्तांची वर्दळ कमी होती, तेव्हा पोलिसांचे सुरक्षा पथक कार्यरत होते. सध्या मनुष्यबळाची संख्या वाढलेली असताना सुरक्षा रक्षक काढून घेण्यात आले आहे. वाढती गर्दी व रोज चोरीला जाणारे मोबाइल, भक्तांना होणारी मारहाण, अरेरावी, उर्मटपणा या सगळ्या गोष्टी बंद करावयाच्या असल्यास पुन्हा सुरक्षा पथक कार्यरत करणे आवश्यक आहे. पूर्वी ६ पोलिस कर्मचारी, २ हवालदार होते. त्यात वाढ करून दिवसभरासाठी महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. या पोलिसांसाठी मंदिरात गार्ड रूम सुद्धा होती.

पूर्वी अनेक वर्ष मंदिरात पोलिस बंदोबस्त होता. मागील तीन-चार वर्षांपासून पोलिस बंदोबस्त काढण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मंदिरासाठी वाढती गर्दी पाहता पोलिस बंदोबस्त आवश्यक असून यासाठी पोलिस विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवल्यास पोलिसांच्या राहण्याची तसेच भोजनाचीही व्यवस्था करू. - महेश इंगळे,चेअरमन, स्वामी समर्थ मंदिर समिती

मी येण्यापूर्वी बंदोबस्त होता, असे सांगण्यात येते. तो बंदोबस्त आता बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. कोणत्या कारणास्तव नेमले आणि बंद केले याची मला काही माहिती नाही. सध्या गरजेचे वाटते. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ही बाब कळविली आहे. ज्या ठिकाणी मंदिर शासन ताब्यात असते, त्या ठिकाणी शासन बंदोबस्त देते. खासगी असेल, तर त्यांच्याकडून नेमणूक होणे आवश्यक असते.- राजेंद्र टाकणे, पोलिस निरीक्षक.

टॅग्स :Policeपोलिस