शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘स्वाभिमानी’ लोकसभेच्या ७ जागा लढण्याच्या तयारीत, रविकांत तुपकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:23 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरपटत जाणार नाही; रविकांत तुपकर याचा दावा

ठळक मुद्देसंघटना आघाडीसाठी कोणासोबत ही फरपटत जाणार नाही - रविकांत तुपकरआम्ही आघाडीसाठी उत्सुक असलो तरी सात लोकसभेच्या जागांची आमची मागणी - रविकांत तुपकरकाँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मानजनक वागणूक दिली तरच त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकेल - रविकांत तुपकर

सोलापूर :  लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सात जागा सोडल्या तरच त्यांच्यासोबत आघाडी होऊ शकेल अन्यथा स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. संघटना आघाडीसाठी कोणासोबत ही फरपटत जाणार नाही, असा दावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोलापुरात बोलताना केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.आठ दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी साखर कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाºयांची गुरुवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी रविकांत तुपकर सोलापुरात आले होते. बैठकीनंतर त्यांनी संघटनेच्या राजकीय वाटचालीची माहिती दिली.  

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देताना तुपकर म्हणाले, आम्ही आघाडीसाठी उत्सुक असलो तरी सात लोकसभेच्या जागांची आमची मागणी आहे. तशी तयारी आम्ही मतदारसंघात सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मानजनक वागणूक दिली तरच त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकेल, अन्यथा हातकणंगले या एका जागेसाठी आम्ही कधीच आघाडी करण्याचा विचार करणार नाही, त्या जागेवर खा. शेट्टी सहज निवडून येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक