शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पतंगराव कदमांनी चांगली साथ दिली - सुशिलकुमार शिंदे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 14:13 IST

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. पतंगराव कदम यांच्याशी माझा गेल्या काही वर्षापासूनचा सहवास आहे. काँग्रेसचे नेते नामदेवराव जगताप यांनी त्यांच्यासोबत माझी पहिली ओळख करून दिली होती. त्यानंतर दुसरी ओळख म्हणजे मी मुख्यमंत्री असताना ते राज्यमंत्री होते. १९८३ च्या नंतर त्यांनी व मी एकदम जवळून काम केलेले आहे. मी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो ते उपाध्यक्ष होते. त्यांना मी सहकारी म्हणून अनेक ठिकाणी अडचणीच्या काळात निरनिराळ्या ठिकाणी पाठवत असे पतंगराव ते काम संपवून यशस्वी होऊन येत असत. राज्यात मंत्री म्हणूनही त्यांनी अगदी यशस्वी काम केलं. शेवटी मी मुख्यमंत्री असताना त्यांनी मला चांगली साथ दिली. ज्या ज्या वेळी अडचणी काळात सहकार्य करण्यासाठी ते माझ्याबरोबर सतत असत. त्यांचा स्वभाव सोज्वळ, मऊ होता पण शक्य तेथे कणखर भूमिका घेऊन काम पूर्ण करीत असत. पतंगराव कदम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम ग्रेट म्हणावे लागेल. त्यांच्या निधन झाले आहे यावर माझा विश्वासच बसत नाही, अशी भावना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

योद्धा हरपलापतंगराव हे केवळ राजकारणी नव्हते तर ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक हस्तक्षेप करून परिवर्तन घडवू पाहणारे एक योद्धा होते. एक सामान्य कुटुंबातील मुलगा ते भारती विद्यापीठाचे कुलपती ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास होता. विधानसभेत आम्ही एकाच रांगेत बसायचो, त्यांच्या रिकाम्या जागेकडे बघून आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल. - जयंत पाटील, आमदार, राष्ट्रवादी 

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय  पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. 1964 साली वयाच्या 19 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. असा होता राजकीय प्रवास 

  • जून 1991 -मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री
  • मे 1992 - 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
  • ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
  • नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
  • प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
  • डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण
  • मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते
  • नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग
  • 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन 

 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदम