शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

धक्कादायक; मीठापासून तयार केलेल्या बोगस रासायनिक खताचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:05 IST

लॉकडाऊनमध्ये सोलापूर जिल्ह्यात घुसवले बोगस खत; कोल्हापूरची टोळीचा करमाळा पोलिसांनी केला पर्दाफाश

ठळक मुद्देकरमाळा व माढा हे धरणाजवळचे तालुके निवडून या परिसरातील दुकानांना बोगस खताचा पुरवठाज्या कंपनीच्या नावे हे पोटॅश खत पुरविले त्या कंपनीने ९ महिन्यांपासून उत्पादन केलेले नव्हतेपिशवीवरील तारखेवरून कृषी विभागाला संशय वाटल्याने तपास केल्यावर ही बाब समोर आली

राजकुमार सारोळे

सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेला सूट मिळाल्याचा फायदा उचलत मीठापासून तयार केलेल्या बोगस रासायनिक खताचा पुरवठा करणाºया कोल्हापूरच्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

 बनावट रासायनिक खत तयार करणाºया टोळीचा म्होरक्या मोहन सुतार (रा. कागल, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक करून कोल्हापुरातील खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गोदाम व पिशव्याची छपाई करणारी मशीन जप्त केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे. पण खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांकडून होणाºया खताच्या खरेदीचा फायदा उचलत या टोळीने चक्क एका नामांकित कंपनीच्या नावाच्या पिशव्याची नक्कल करून छपाई केली.

करमाळा व माढा हे धरणाजवळचे तालुके निवडून या परिसरातील दुकानांना बोगस खताचा पुरवठा केला. पण या टोळीने ज्या कंपनीच्या नावे हे पोटॅश खत पुरविले त्या कंपनीने ९ महिन्यांपासून उत्पादन केलेले नव्हते. त्यामुळे पिशवीवरील तारखेवरून कृषी विभागाला संशय वाटल्याने तपास केल्यावर ही बाब समोर आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून, आणखी धागेदोरे हाती येणार आहेत. 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कृषी विभागातर्फे बियाणे व खत पुरवठ्याची तयारी केली जाते. याप्रमाणे कृषी विभागाचे नियोजन सुरू असतानाच करमाळा तालुक्यात बोगस खत आल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी सागर बारवकर यांच्या मदतीने कृषी विभागाचे सहायक संचालक रवींद्र माने यांनी कृषी सहायकाच्या मदतीने परिसरात सापळा लावला. त्यावेळी एका शेतकºयाकडे झुआरीच्या पोटॅश खताच्या दोन गोण्या मिळाल्या. त्यातील खत तपासले असता, मीठ असल्याचे दिसून आले. त्या शेतकºयाने खत कोठून घेतले याची चौकशी करून दुकानदारांकडून खत पुरविणारा एजंट अक्षय काशीद याला विश्वासात घेतल्यावर ही बाब उघड झाली. गुन्हा दाखल झाल्यावर बोगस खताबाबत चर्चा झाल्यावर आता अनेक शेतकरी असे खत खरेदी केल्याबाबत पुढे आले आहेत. 

कंपनीचे अधिकारी चक्रावले- पोटॅश खतावर सरकार अनुदान देते. करमाळा भागात विक्री झालेल्या या खताला पावत्या दिल्या गेल्या नव्हत्या. दुकानदारांनीही असे खत घेता येत नाही. त्यांना झुआरीचे खत बंद आहे हे माहीत असतानाही जादा कमिशन मिळण्याच्या आशेपोटी ही खरेदी झाली. झुआरी कंपनीच्या अधिकाºयांना पिशवीची खातरजमा करण्यासाठी बोलाविल्यावर छपाई पाहून तेही चक्रावले. अखेर आॅनलाईनवर ओरिजनल कंपनीच्या पिशवीचे डिझाईन तपासल्यावर बनाव उघड झाला.

अहवाल आल्यावर फुटणार बिंग- पिशवीतील खताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत अशी माहिती गुण नियंत्रण माहिती सागर बारवकर यांनी दिली. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर या टोळीने खत तयार करण्यासाठी काय काय वापरले हे स्पष्ट होणार आहे. पण सकृतदर्शनी ४० टक्के मीठ असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील दुकानात आढळलेले खत बोगस असल्याचे दिसून आले आहे.

शेतीचे होणार वाटोळे- करमाळा, माढा परिसरात बागायती शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खत वापरावर भर देतात. रासायनिक खताच्या अतिवापराने शेतजमिनी क्षारपड होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात असताना या टोळीने चक्क मीठापासून बनविलेले खत पुरवून शेतकºयांना संकटात टाकले आहे. या खताने पिकाचे तर वाटोळे झालेच याशिवाय सुपीक जमिनीला धोका निर्माण झाल्याची भीती अर्जुन गावडे या शेतकºयाने व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfraudधोकेबाजी