शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उन्हाचा कडाका; सभांना गर्दी जमविण्याचे सर्वच पक्षांना टेन्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:25 IST

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे. 

ठळक मुद्देसोलापुरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवारांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळाल्या.सभा व बैठकांच्या रिकाम्या खुर्च्यांचे विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळा असे सांगितले जात आहे.

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे. 

सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरू लागला आहे. भाजप युती, काँग्रेस आघाडी व बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे; मात्र प्रचाराला येण्यासाठी कार्यकर्ते कमी पडू लागले आहेत. त्याचे कारण उन्हाचा कडाका हा आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी नेमलेले कार्यकर्ते सकाळी अकरा वाजेपर्यंत सक्रिय असतात. त्यानंतर ते गडप होतात ते सायंकाळीच हजर होत आहेत. याबद्दल विचारणा केल्यावर दुपारच्यावेळी लोकही घर बंद करून बसत असल्याने भेटत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. 

उन्हाच्या कडाक्याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारकांचा दौरा मागताना सकाळी किंवा सायंकाळची वेळ मागितली जात आहे. दुपारी उन्हामुळे लोक सभांना येत नसल्याचे सांगितले जात आहे. सभा व बैठकांच्या रिकाम्या खुर्च्यांचे विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळा असे सांगितले जात आहे. शहरात सभा व बैठकांना गर्दी आणण्याची जबाबदारी नगरसेवकांवर दिली जात आहे. याचबरोबरीने बुथ प्रतिनिधींची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते व्यस्त दिसत आहेत. 

बुथ प्रतिनिधींची पळवापळवी- लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवारांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळाल्या. आता अशीच स्थिती मतदान केंद्रापर्यंत आल्याचे चित्र सोलापुरात दिसत आहे. चुरशीच्या लढतीत बुथ प्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रांवर सक्षम बुथ प्रतिनिधी देण्याची व्यवस्था करण्यात प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे. 

आधी पाण्याची व्यवस्था हवी- उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशात सोलापुरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. अकरानंतर घेण्यात येणाºया सभा व बैठकांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी निवडणूक प्रचार प्रमुखांवर आली आहे. त्यामुळे थंड जारला मागणी वाढली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूर