शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

उन्हाचा कडाका; सभांना गर्दी जमविण्याचे सर्वच पक्षांना टेन्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:25 IST

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे. 

ठळक मुद्देसोलापुरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवारांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळाल्या.सभा व बैठकांच्या रिकाम्या खुर्च्यांचे विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळा असे सांगितले जात आहे.

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे. 

सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरू लागला आहे. भाजप युती, काँग्रेस आघाडी व बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे; मात्र प्रचाराला येण्यासाठी कार्यकर्ते कमी पडू लागले आहेत. त्याचे कारण उन्हाचा कडाका हा आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी नेमलेले कार्यकर्ते सकाळी अकरा वाजेपर्यंत सक्रिय असतात. त्यानंतर ते गडप होतात ते सायंकाळीच हजर होत आहेत. याबद्दल विचारणा केल्यावर दुपारच्यावेळी लोकही घर बंद करून बसत असल्याने भेटत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. 

उन्हाच्या कडाक्याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारकांचा दौरा मागताना सकाळी किंवा सायंकाळची वेळ मागितली जात आहे. दुपारी उन्हामुळे लोक सभांना येत नसल्याचे सांगितले जात आहे. सभा व बैठकांच्या रिकाम्या खुर्च्यांचे विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळा असे सांगितले जात आहे. शहरात सभा व बैठकांना गर्दी आणण्याची जबाबदारी नगरसेवकांवर दिली जात आहे. याचबरोबरीने बुथ प्रतिनिधींची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते व्यस्त दिसत आहेत. 

बुथ प्रतिनिधींची पळवापळवी- लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवारांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळाल्या. आता अशीच स्थिती मतदान केंद्रापर्यंत आल्याचे चित्र सोलापुरात दिसत आहे. चुरशीच्या लढतीत बुथ प्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रांवर सक्षम बुथ प्रतिनिधी देण्याची व्यवस्था करण्यात प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे. 

आधी पाण्याची व्यवस्था हवी- उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशात सोलापुरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. अकरानंतर घेण्यात येणाºया सभा व बैठकांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी निवडणूक प्रचार प्रमुखांवर आली आहे. त्यामुळे थंड जारला मागणी वाढली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूर