शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सोलापूरचा उन्हाळा अन् आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 12:28 IST

अमर्याद जंगलतोड आणि ऊर्जेचा होणारा अतिवापर यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.

काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो दुपारचं लग्न होत.. त्यामुळे उन्हाची दाहकता चांगलीच जाणवत होती. मंगल कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर गाडी लावण्यासाठी पार्किंगकडे गेलो तेव्हा जे समोर चित्र दिसलं ते फारच बोलकं होतं. पार्किंगसाठी प्रशस्त जागा असतानाही सर्वांनी गाड्या एका कोपºयात जशा जमतील तशा एकाच ठिकाणी लावल्या होत्या. कारण त्याच ठिकाणी दोन झाडे होती आणि फक्त तिथेच सावली होती. असेच चित्र दुपारच्या वेळेस सरस्वती चौकातील सिग्नललाही बघायला मिळते. दुपारी सिग्नलच्या इथे न थांबता सिग्नलच्या थोडं आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या सावलीत अनेक जण थांबलेले दिसतात.

दुपारच्या वेळेस घराबाहेर पडल्यानंतर असे अनुभव प्रत्येकाने घेतलेच असतील आणि त्याचबरोबर जर दुपारी गाडी लावायला सावली नाही मिळाली तर एम.एच़ तेराकडून मिळणारा सोलापुरी झटकाही प्रत्येकाने अनुभवला असणारच. एकीकडे माळढोक या पक्ष्यांसाठी जगात असणारी सोलापूरची ओळख ही हळूहळू पुसली जात आहे़परदेशातून येणाºया फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या संख्येतही घट होत चालली आहे तर दुसरीकडे दुष्काळ, वाढते तापमान, प्रदूषण आणि धूळ ही सोलापूरची नवी ओळख बनत आहे. मात्र काही संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांना सोडलं तर याचं कुणाला काहीच पडलेलं दिसत नाही.

उन्हाळा सुरु होताच दरवर्षी फेसबुकच्या पोस्टमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये, चहाच्या टपरीवर, बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, बँकांच्या रांगेत, कॉलेजच्या कट्ट्यांवर, सरकारी कार्यालयांच्या टेबलावर आणि यासारख्या अनेक ठिकाणी उन्हाळा, उन्हाची वाढती तीव्रता, दुपारच्या वेळेस निर्मनुष्य होणारे रस्ते, जिल्ह्यातील लोकांची पाण्यासाठी वाढलेली भटकंती, टँकरवर विसंबून असलेली गावं, पाणी आणि चाºयाविना होणारी जनावरांची होरपळ, पशुपक्ष्यांच्या नष्ट होत जाणाºया प्रजाती याचीच चर्चा सुरु असते, पण चर्चेच्या पुढे कधी कोण जाताना दिसत नाही. बरेच जण तापमान कमी करण्याचे नवनवीन उपायही सुचवत असतात, पण यातील कशालाच कृतीची जोड नसते. त्यामुळे परिस्थितीत कसलाच बदल होताना दिसत नाही. फक्त उन्हाळ्यापुरतंच आपल्याला झाडांचं महत्त्व प्रकर्षाने जाणवते, पण उन्हाळा संपताच ते आपल्याला महत्त्वाचे वाटत नाहीत़ या मानसिकतेत बदल होणे अत्यावश्यक आहे. 

वाढत्या शहरीकरणासाठी, आधुनिकीकरणासाठी, विकासासाठी आणि ऐशोआरामासाठी होणारी अमर्याद जंगलतोड आणि ऊर्जेचा होणारा अतिवापर यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याचाच परिणाम म्हणून उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता आणि पावसाळ्यातील पावसाची अनियमितताही वाढतच चालली आहे़ जागतिक तापमान वाढीची ही सर्व लक्षणे आहेत. सध्या जागतिक तापमान वाढ हे जगासमोरील सर्वात मोठे संकट आहे. ही परिस्थिती उद्भवण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणे हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. आपल्या येणाºया पिढ्यांना आपण नक्की कसला वारसा देणार आहोत, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या परिस्थितीत जर बदल घडवायचा असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे ‘वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन’. 

 चला तर मग येणारे उन्हाळे सुसह्य करण्यासाठी वृक्षारोपणाच्या कृतीसोबतच ऊर्जेचाही अपव्यय टाळून तिचा काटकसरीने वापर करणे, पाणी जपून वापरणे, वाहतुकीसाठी वैयक्तिक वाहनांचा वापर टाळून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, एसी, फ्रीज यासारख्या उपकरणांचा गरजेपुरताच वापर करणे या गोष्टी आत्मसात करू आणि वाढते तापमान, दुष्काळ, प्रदूषण, धूळ नि सोलापूर याचं दृढ होत जाणारं नातं संपवून जगाला सोलापूरच्या नव्या दुनियादारीचे दर्शन घडवू.-प्रा. अमित बनसोडे(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानenvironmentवातावरण