शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 10:58 IST

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे.

ठळक मुद्देराज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी यावर्षी आॅनलाईन गाळप परवाने मागितले होते सोलापूर जिल्ह्याचे २२ लाख १८ हजार ३८९ मे.टन. गाळपकोल्हापूरचे २१ तर अहमदनगरचे १९ कारखाने सुरू

अरुण बारसकर सोलापूर दि २५ : राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे.राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी यावर्षी आॅनलाईन गाळप परवाने मागितले होते. त्रुटी पूर्ण करणाºया सर्वच कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने परवाने दिले असून, गाळपही सुरू केले आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र बºयापैकी असल्याने राज्यभरातील सर्वच सातही विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर व पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आता अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातही उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मागील दोन वर्षे दुष्काळ असल्याने राज्यभरातच उसाचे क्षेत्र घटले होते; मात्र यवर्षी ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागातील ३५ साखर कारखान्यांनी तर पुणे विभागातील ५७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे २२ लाख १८ हजार ३८९ मे.टन. गाळप झाले असून राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे सर्वाधिक गाळप आहे. अहमदनगर विभागातील अहमदनगरच्या १९ व नाशिकच्या दोन अशा २१ साखर कारखान्यांनी १७ लाख १० हजार १६५ मे.टन गाळप केले आहे.  औरंगाबाद विभागातील  नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यातील  १८ साखर कारखान्यांनी ९ लाख ७७ हजार २४० मे.टन गाळप केले आहे. नंदूरबारचे तीन, जळगावचे दोन, औरंगाबादचे तीन, जालन्याचे पाच तर बीडचे पाच कारखाने सुरू झाले आहेत.  नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी १४ लाख १३ हजार १७७  मे.टन ऊस गाळप केले आहे. अमरावती विभागातील यवतमाळच्या दोन कारखान्यांनी एक लाख तर नागपूरचा एक साखर कारखाना सुरू झाला आहे. ----------------------------अहमदनगरचे १९ कारखाने सुरूच्मागील वर्षी संपूर्ण राज्यातच उसाचे क्षेत्र कमी होते. यावर्षी ऊस क्षेत्र वाढल्याने गाळप घेणाºया कारखान्यांची संख्याही वाढली आहे. सोलापूरचे ३० कारखाने गाळप घेत आहेत, कोल्हापूरचे २१ तर अहमदनगरचे १९ कारखाने सुरू झाले आहेत. अहमदनगरचे साखर कारखाने सोलापूरपेक्षा अगोदर सुरू झाले आहेत. जिल्ह्यात २८ कारखाने सुरूच्कोल्हापूर विभागातील कोल्हापूरचे २१ व सांगलीच्या १३ कारखान्यांचे २४ लाख ९५ हजार ७७१  मे.टन गाळप झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील १५, सातारा जिल्ह्यातील १३ व सोलापूर जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांचे ४२ लाख ५९ हजार ९१५ मे.टन गाळप झाले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने