शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 10:58 IST

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे.

ठळक मुद्देराज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी यावर्षी आॅनलाईन गाळप परवाने मागितले होते सोलापूर जिल्ह्याचे २२ लाख १८ हजार ३८९ मे.टन. गाळपकोल्हापूरचे २१ तर अहमदनगरचे १९ कारखाने सुरू

अरुण बारसकर सोलापूर दि २५ : राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे.राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी यावर्षी आॅनलाईन गाळप परवाने मागितले होते. त्रुटी पूर्ण करणाºया सर्वच कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने परवाने दिले असून, गाळपही सुरू केले आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र बºयापैकी असल्याने राज्यभरातील सर्वच सातही विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर व पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आता अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातही उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मागील दोन वर्षे दुष्काळ असल्याने राज्यभरातच उसाचे क्षेत्र घटले होते; मात्र यवर्षी ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागातील ३५ साखर कारखान्यांनी तर पुणे विभागातील ५७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे २२ लाख १८ हजार ३८९ मे.टन. गाळप झाले असून राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे सर्वाधिक गाळप आहे. अहमदनगर विभागातील अहमदनगरच्या १९ व नाशिकच्या दोन अशा २१ साखर कारखान्यांनी १७ लाख १० हजार १६५ मे.टन गाळप केले आहे.  औरंगाबाद विभागातील  नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यातील  १८ साखर कारखान्यांनी ९ लाख ७७ हजार २४० मे.टन गाळप केले आहे. नंदूरबारचे तीन, जळगावचे दोन, औरंगाबादचे तीन, जालन्याचे पाच तर बीडचे पाच कारखाने सुरू झाले आहेत.  नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी १४ लाख १३ हजार १७७  मे.टन ऊस गाळप केले आहे. अमरावती विभागातील यवतमाळच्या दोन कारखान्यांनी एक लाख तर नागपूरचा एक साखर कारखाना सुरू झाला आहे. ----------------------------अहमदनगरचे १९ कारखाने सुरूच्मागील वर्षी संपूर्ण राज्यातच उसाचे क्षेत्र कमी होते. यावर्षी ऊस क्षेत्र वाढल्याने गाळप घेणाºया कारखान्यांची संख्याही वाढली आहे. सोलापूरचे ३० कारखाने गाळप घेत आहेत, कोल्हापूरचे २१ तर अहमदनगरचे १९ कारखाने सुरू झाले आहेत. अहमदनगरचे साखर कारखाने सोलापूरपेक्षा अगोदर सुरू झाले आहेत. जिल्ह्यात २८ कारखाने सुरूच्कोल्हापूर विभागातील कोल्हापूरचे २१ व सांगलीच्या १३ कारखान्यांचे २४ लाख ९५ हजार ७७१  मे.टन गाळप झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील १५, सातारा जिल्ह्यातील १३ व सोलापूर जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांचे ४२ लाख ५९ हजार ९१५ मे.टन गाळप झाले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने