शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले दुपटीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST

बार्शी हा अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो़ तालुक्यात नीलकंठा, भोगावती, नागझरी, चांदणी व रामनदी या चार प्रमुख नद्या ...

बार्शी हा अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो़ तालुक्यात नीलकंठा, भोगावती, नागझरी, चांदणी व रामनदी या चार प्रमुख नद्या आहेत़ तसेच पाच मध्यम प्रकल्प देखील आहेत़ यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील हे सर्व लघू व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत़ तसेच ओढे-नाले, नद्यादेखील जास्त दिवस वाहिल्यामुळे यंदा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे़ तालुक्यातील विहीर व बोअरच्या पाणी पातळीतही वाढ झाली.

दोन वर्षापूर्वी तालुक्यातील उसाचे क्षेत्र अडीच हजार हेक्टरवर होते, मात्र यंदा पावसामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने मागील तीन महिन्यांपासून उसाच्या लागवडी गावोगावी सुरू झाल्या आहेत़ अद्यापदेखील लागवडी या सुरूच आहेत़ या लागवडी मार्च अखेरपर्यंत सुरूच राहतील, असे तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी सांगितले़

आठ हजार हेक्टरपर्यंत वाढू शकते क्षेत्र

२०१८-१९ मध्ये तालुक्यात उसाचे क्षेत्र हे २००० हेक्टर होते़ १९-२० मध्ये ते ३५०० हेक्टर झाले़ यंदा २०२०-२१ मध्ये ते सहा हजार हेक्टरवर गेले़ पुढील दोन महिन्यात त्यात आणखी दोन हजार हेक्टची वाढ होऊन ते ८ हजार हेक्टरवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे़

संतनाथ, आर्यन बंद, इंद्रेश्वर, बबनराव शिंदे कारखाना सुरू

बार्शी तालुक्यात पूर्वी संतनाथ सहकारी साखर कारखाना होता; मात्र तो मागील १० ते १२ वर्षांपासून बंदच आहे़ त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांची मोठी परवड होत होती़ तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढण्याला मर्यादा आल्या़ त्यानंतर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी खामगावला आर्यन शुगरची उभारणी केली़ तो त्यांनी दुस-याला विकला, मात्र तो कारखानादेखील बंदच आहे़ उपळाई ठोंगे येथील माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंद्रेश्वर साखर कारखाना काढला तो सुरू आहे, मात्र त्या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे आसपासच्या पाच-सहा तालुक्यात असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांनादेखील म्हणावा तसा न्याय मिळत नाही़ तांत्रिकदृष्या बार्शी तालुक्यात असलेला रणजित शिंदे यांचा तुर्कपिंपरीचा बबनराव शिंदे साखर कारखान्याचे ऊस गाळपासाठी प्राधान्य हे माढा तालुक्यातील उसालाच आहे़

नऊ कारखान्याला जातो गाळपासाठी ऊस

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी हक्काचा कारखाना नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हे आसपासच्या अनेक कारखान्यांचे सभासद आहेत़ त्यांचा ऊस हा तालुक्यातील उपळाईचा इंद्रेश्वर, तुर्कपिंपरीचा बबनराव शिंदे, म्हैसगावचा विठ्ठल शुगर, अनगरचा लोकनेते शुगर, सोनारी ता़ परांडाचा भैरवनाथ शुगर, इंडा ता परांडाचा बाणगंगा सहकारी, पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे, बीबीदारफळचा लोकमंगल शुगर आणि उस्मानाबाद तालुक्यातील चोराखळीचा धाराशिव शुगर या नऊ कारखान्याला गाळपासाठी जातो़

या गावात आहे सर्वाधिक उसाचे क्षेत्र

तालुक्यातील देवगाव, बाभुळगाव, पांगरी, घारी, चिखर्डे, पानगाव, उंडेगाव, साकत, पिंपळगाव पा., महागाव, यावली, शेंद्री, वांगरवाडी, खांडवी, बावी, घाणेगाव, पिंपरी पा., कळंबवाडी पा., जामगाव पा., कव्हे, कासारवाडी, हत्तीज, हिंगणी आर., चिंचखोपन, सारोळे, भांडेगाव, ज्योतीबाचीवाडी, अंबाबाईचीवाडी, जवळगाव, मानेगाव, भालगाव, उपळेदुमाला, हळदुगे, नांदणी, रुई व धामगाव दुमाला या गावात ५० हेक्टर ते ५०० हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र आहे़ सर्वाधिक क्षेत्र सारोळे, आंबेगाव व नांदणी या गावात आहे़