शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

यशोगाथा; मात्रा सेंद्रिय खताची, यशोगाथा भरगच्च शेवग्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 13:05 IST

रासायनिक खते टाळली; बोरगाव (दे़) येथील उच्चशिक्षित मलकप्पा कल्याणी यांची यशोगाथा

ठळक मुद्देशेतात ४ बाय ८ व अडीच फूट खोलीचा गांडूळ बेड तयार केलागाईचे शेण, गोमूत्र ,बेसन ,गूळ ,पाणी यांचे योग्य प्रमाण घालून जीवामृत तयार केलेआठ दिवसांनंतर ते तांब्याने किंवा ड्रीपने शेवगा आणि फळझाडांना दिले

शंभूलिंग अकतनाळ 

चपळगाव : शिक्षण घेतले, परंतु नोकरी नाही़़. मुंबई, पुणे येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शैक्षणिक खर्चाला आर्थिक पाठबळ नाही. अनेक ठिकाणी मुलाखत देऊनही पदरी निराशाच़़. नोकरी मिळते, पण मनासारखी नसल्यामुळे मन लागत नाही. अशातून आशेचा किरण लाभला आणि शेवग्याची प्रयोगशील शेती केली. क़मी पाण्यावर, कमी खर्चात लाखो रुपयांचे पीक देणारे ठरले.

ही किमया साधली आहे. बोरगाव (दे.) (ता़ अक्कलकोट) येथील मलकप्पा परमेश्वर कल्याणी या तरुण शेतकºयाने़ त्यांनी स्वत:ची प्रयोगशील शेती म्हणून ओळख निर्माण केली आहे. उच्चशिक्षित मलकप्पा यांना नोकरी मिळू शकली नाही.  जिद्द व चिकाटीने उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करत. शेतीतून आयुष्य फुलविले आहे़ वडील परमेश्वर यांची पाच एकर शेती अशी शेती की जिथे कुसळ सोडून कोणतेच पीक येत नव्हते. दहावी शिक्षण झाल्यानंतर मलकप्पांचे वडीलछत्र हरपले. त्यापाठोपाठ मोठ्या भावाचेही छत्र हरपले. आता काय करावे? या विवंचनेत असताना मलकप्पा यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केल़े पाच एकर डोंगर फोडून काढले. जमीन सपाटीकरण करून घेतले. सुरुवातीला केशर व हापूस आंब्याची ४० रोपे लावली. 

दुसºया वर्षात १५० आंब्याची रोपे लावली. त्यानंतर शेतात बोअर घेतले. ठिबक सिंचन योजना राबवली़ त्याच जोरावर शेवग्या (ओडीसा वाण)ची शंभर झाडं लावली़ हे पीक घेत असताना एकदाही रासायनिक खतांचा वापर केला नाही. 

शेतात ४ बाय ८ व अडीच फूट खोलीचा गांडूळ बेड तयार केला़ त्यात शेण, काडीकचरा टाकून व्हर्मीवॉश, कम्पोस्ट खत निघतो तोच खत या फळबागांसाठी आणि शेवग्यासाठी वापरले़ गाईचे शेण, गोमूत्र ,बेसन ,गूळ ,पाणी यांचे योग्य प्रमाण घालून जीवामृत तयार केले़ आठ दिवसांनंतर ते तांब्याने किंवा ड्रीपने शेवगा आणि फळझाडांना दिले़ सात महिन्यांत हे पीक हाती आले़ 

आंतरपिकांचा आधार - फळबागेत आंतरपीक म्हणून हरभरा, टोमॅटो,मिरची, हळद, गहू, कांदा ही पिके घेतली. फळबागेसाठी कीटकनाशके म्हणून ब्रह्मास्त्र, निमास्त्र तर फुलांसाठी बाजारातील जैविक औषधे यांची मात्रा दिली. पावसाचे पाणी वाहून जाता कामा नये म्हणून शेतात ओटे बांधले आहेत. मलकप्पा यांना त्यांची आई रत्नाबाई, पत्नी शोभा व त्यांची मुलंसुद्धा शेतीकामात हातभार लावतात. 

शेतकºयांनी पारंपरिक पिके न घेता कमी खर्चातील जास्त उत्पन्न देणारे पीक घ्यायला हवे. त्यापैकीच शेवगा एक असून, याला स्थानिक आणि बाहेरही बाजारपेठ सहज उपलब्ध आहे़ यात आंतरपीक घेता आले़ अशा प्रकारच्या शेतीतून खरोखरच प्रयोग करता आले़ आर्थिक बळही मिळाले़.

-मलकप्पा कल्याणी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी