शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या अधीन राहून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याच्या पिशव्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:18 IST

औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा: महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर असोसिएशनची भूमिका

ठळक मुद्देराज्य शासनाकडून २३ मार्च २०१८ रोजी राज्यात कमी घनतेच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होतीपाऊच उत्पादक महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे सचिव जावेद अख्तर सय्यद यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली

सोलापूर: पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांची जाडी, पुनर्वापराची क्षमता आणि विस्तारित उत्पादनाची जबाबदारी याविषयीची अधिसूचना ३० जून २०१८ च्या खंड ४ प्रमाणे सेल तर उत्पादक व्यवसाय करू शकतात. कायदेशीर बाबींचे पालन करत पिशव्यांना परवानगी असेल, असा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या आधारे सोलापूर जिल्ह्यात पाणी पिशव्यांची सोय पुन्हा करण्याची भूमिका महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने घेतली आहे. 

राज्य शासनाकडून २३ मार्च २०१८ रोजी राज्यात कमी घनतेच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामुळे ५० मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. याविरुद्ध पाऊच उत्पादक महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे सचिव जावेद अख्तर सय्यद यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. शासनाने पाण्याच्या प्लास्टिक पिशव्यांवर अचानक बंदी घातली. बंदी घालताना राज्यात किती उत्पादक आहेत. यावर उपजीविका करणारा वर्ग किती आहे, याचा विचार केला नाही. याउलट बिस्किटे व अन्य खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पाऊचवर बंदी घातली नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही, अशी भूमिका असोसिएशनच्या वतीने खंडपीठापुढे घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

ग्रामीण भागात पाऊचमध्ये सहजपणे पाणी उपलब्ध होते. बाटलीबंद पाण्यापेक्षा ते स्वस्त असल्याने ग्राहकांना ते परवडते. त्यामुळे ही बंदी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एम. ढवळे आणि न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी वरीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. या याचिकेवर ६ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर आणि अ‍ॅड. आवटे काम पाहत आहेत.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पाच हजार कामगारांना यामुळे रोजगार मिळणार आहे. नव्याने जे पाण्याचे पाऊच तयार होतील, त्याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे. यासाठी असोसिएशनच्या वतीने यासंबंधी मार्गदर्शनासाठी गो-ग्रीन कंपनीशी सामंजस्य करार केला आहे.- विनायक महिंद्रकरजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असो., सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater transportजलवाहतूकCourtन्यायालय