शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 11:51 IST

जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतवजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नयेजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २०  : जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, चंद्रकांत बागल हे गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करीत आहेत़ त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आले होते़ त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले़ यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, मी शेतकरी संघटनेच्या सूचनेनुसार वजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमले आहे़ मी कारखानदारांना एफआरपीनुसार दर द्यावा यासाठी सूचना करु शकतो; मात्र त्यांना जादा दर द्या, म्हणून दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे  मधला मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची दोन दिवसात बैठक लावून योग्य तो निर्णय जाहीर करु, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले. -----------------मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतउसाला पहिली उचल २७०० रुपये मिळावी, यासाठी बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती़ यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास सांगितले़ त्यांच्या सूचनेनुसार मी आज आपली भेट घेतल्याचे सुभाष देशमुख यांनी दिली.--------------उपचार घेण्यास तयारदोन दिवसात कारखानदार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन ऊसदराविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी केवळ उपचार घेण्यास सहमती दर्शविली आहे; मात्र ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले़ ----------------राज्य व जिल्हा पातळीवर बैठक झाली आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातील उसाच्या दराचा प्रश्न मार्गी लागला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न सुटला नाही. मी जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.- सुभाष देशमुखसहकारमंत्री

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुख