शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 11:51 IST

जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतवजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नयेजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २०  : जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, चंद्रकांत बागल हे गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करीत आहेत़ त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आले होते़ त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले़ यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, मी शेतकरी संघटनेच्या सूचनेनुसार वजन काट्यामध्ये शेतकºयांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमले आहे़ मी कारखानदारांना एफआरपीनुसार दर द्यावा यासाठी सूचना करु शकतो; मात्र त्यांना जादा दर द्या, म्हणून दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे  मधला मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची दोन दिवसात बैठक लावून योग्य तो निर्णय जाहीर करु, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले. -----------------मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने सहकारमंत्री पंढरीतउसाला पहिली उचल २७०० रुपये मिळावी, यासाठी बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती़ यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास सांगितले़ त्यांच्या सूचनेनुसार मी आज आपली भेट घेतल्याचे सुभाष देशमुख यांनी दिली.--------------उपचार घेण्यास तयारदोन दिवसात कारखानदार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन ऊसदराविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी केवळ उपचार घेण्यास सहमती दर्शविली आहे; मात्र ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले़ ----------------राज्य व जिल्हा पातळीवर बैठक झाली आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातील उसाच्या दराचा प्रश्न मार्गी लागला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न सुटला नाही. मी जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.- सुभाष देशमुखसहकारमंत्री

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुख