शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, दीपक साळुंखे, समाधान आवताडेंसह १९४ जणांनी नेले २७७ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:37 IST

विधानसभा निवडणुक; पहिल्यादिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीचे काम सुरूसर्व तहसील कार्यालयात अर्ज देणे व घेण्याची सोय करण्यात आली आहेअक्कलकोट विधानसभेसाठी  गंगाराम कटकधोंड उर्फ व्यंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी २७७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र   भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीत राजेंद्र राऊत, सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील आणि पंढरपुरात समाधान आवताडे, शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज नेले.

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व तहसील कार्यालयात अर्ज देणे व घेण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी १९४ जणांनी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट विधानसभेसाठी  गंगाराम कटकधोंड उर्फ व्यंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर पंढरपूर येथे सुदर्शन खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

विधानसभानिहाय नेण्यात आलेले अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. कंसात अर्ज नेणाºया व्यक्तींची संख्या आहे. करमाळा: १६ (१३), माढा: ९ (७), बार्शी: ३0 (३0), मोहोळ: १४, सोलापूर शहर उत्तर: १९ (१७), सोलापूर शहर मध्य: ३५ (२७), अक्कलकोट: २२ (१५), दक्षिण सोलापूर : ३७ ,(३७), पंढरपूर: ३६ (२0), सांगोला: ४0 (१९), माळशिरस: १९ (९).शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे, महेश निकंबे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनी अर्ज नेले आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिनिधीमार्फत अर्ज नेला आहे. शहर मध्यमध्ये माजी आमदार आडम मास्तर, स्वाभिमानी रिपाइंचे दीपक गवळी, हिंदुस्तान जनता पार्टीचे गौस कुरेशी, भाजपचे नगरसेवक  नागेश वल्याळ, एमआयएमचे इरफान शेख, बसपाचे राहुल सर्वगोड, शिवसंग्रामचे मनीष गायकवाड व पीपीआयचे आनंद जगदने यांनी अर्ज नेले आहेत. 

चोख पोलीस बंदोबस्त- विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज देण्या-घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केल्याने सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात निवडणूक कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून शंभर मीटरच्या अंतरावर सर्व प्रकारची वाहने रोखून धरण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शहर उत्तर व दक्षिण सोलापूर अशी दोन निवडणूक कार्यालये असल्याने प्रवेशद्वारावरच वाहने अडविण्यात आली. यामुळे वाहतूक जामची समस्या निर्माण झाली. निवडणूक कार्यालयाबाहेर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यालयात अर्ज घेणे व देण्यासाठी आलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय