शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पंढरपुरात वारकरी करणार गनिमी कावा; नाराज वारकऱ्यांचे पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 10:48 IST

गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती.

- बाळासाहेब बोचरेमुंबई : आषाढी वारीसाठी  १० मानाच्या पालख्यांना परवानगी  दिली. त्यासोबत २० ऐवजी ४० जणांना बसने जाण्यास  परवानगी दिली. मात्र वाखरीपासून चालण्यास केवळ दोन वारकऱ्यांना परवानगी देताना लावलेल्या  निकषांवरून वारकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे वातावरण असून आता आपणाला जे हवे ते त्या दिवशी दशमीलाच करायचे, असा ठाम निर्णय विविध पालखी व्यवस्थापनाने घेतला असल्याचे एका विश्वस्तांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती. यंदा ती दुप्पट करण्यात आली असली तरी त्यापैकी ३८ जणांना बसमध्येच बसण्याची अट घातली आहे. दोघांनी देवाच्या पादुका कशा घेऊन जाऊ शकतात? हे शासनानेच पालखी व्यवस्थापनाला पटवून सांगावे. देव जाताना मानकरी, टाळकरी, वादक असा लवाजमा असतो. तो नसेल तर मग पायी वारी तरी कशासाठी करायची? असा सवाल  त्यांनी केला. आता प्रशासनाकडे अर्ज विनंती करण्यापेक्षा जे करायचे ते परंपरेला साजेसेच करायचे. मग प्रशासनाला काय कारवाई करायची ते करु देत असा निर्णय घेतला गेला आहे. प्रसंगी पादुका प्रशासनाकडे सोपवून ४० जणांनी बसनेच पंढरपूरला जाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाखरीला पालख्या पोहोचल्यानंतर तिथून पुढील वाटचाल करताना प्रत्येक पालखी व्यवस्थापन त्यांच्या परंपरेप्रमाणेच सोहळा पुढे नेण्याचा आग्रह धरतील.  सर्व ४० वारकरी हे मानकरी असतात. सेवेसाठी त्यांना देवासोबत चालणे गरजेचे असते. प्रशासनाने विरोध केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. याचा विचार करुन अगोदरच त्याचे नियोजन करावे. २० लोकांना चालण्याची परवानगी असेल तर तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त कशाला? दोघांनाच चालण्याची परवानगी असेल तर मग बस कशाला? मग वारकऱ्यांनी वारीला तरी का यावे? असे सवाल करुन ४०० वारकऱ्यांना पायी वारी नीट करु द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

हजारो भाविक पांडुरंग चरणी लीन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षीही प्रशासनाने आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मानाच्या दहा पालख्या व त्यामध्ये मोजक्याच भाविकांना आषाढी यात्रा एकादशीदिवशी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपुरात कडक संचारबंदी लागू केली आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर