शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात वारकरी करणार गनिमी कावा; नाराज वारकऱ्यांचे पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 10:48 IST

गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती.

- बाळासाहेब बोचरेमुंबई : आषाढी वारीसाठी  १० मानाच्या पालख्यांना परवानगी  दिली. त्यासोबत २० ऐवजी ४० जणांना बसने जाण्यास  परवानगी दिली. मात्र वाखरीपासून चालण्यास केवळ दोन वारकऱ्यांना परवानगी देताना लावलेल्या  निकषांवरून वारकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे वातावरण असून आता आपणाला जे हवे ते त्या दिवशी दशमीलाच करायचे, असा ठाम निर्णय विविध पालखी व्यवस्थापनाने घेतला असल्याचे एका विश्वस्तांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती. यंदा ती दुप्पट करण्यात आली असली तरी त्यापैकी ३८ जणांना बसमध्येच बसण्याची अट घातली आहे. दोघांनी देवाच्या पादुका कशा घेऊन जाऊ शकतात? हे शासनानेच पालखी व्यवस्थापनाला पटवून सांगावे. देव जाताना मानकरी, टाळकरी, वादक असा लवाजमा असतो. तो नसेल तर मग पायी वारी तरी कशासाठी करायची? असा सवाल  त्यांनी केला. आता प्रशासनाकडे अर्ज विनंती करण्यापेक्षा जे करायचे ते परंपरेला साजेसेच करायचे. मग प्रशासनाला काय कारवाई करायची ते करु देत असा निर्णय घेतला गेला आहे. प्रसंगी पादुका प्रशासनाकडे सोपवून ४० जणांनी बसनेच पंढरपूरला जाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाखरीला पालख्या पोहोचल्यानंतर तिथून पुढील वाटचाल करताना प्रत्येक पालखी व्यवस्थापन त्यांच्या परंपरेप्रमाणेच सोहळा पुढे नेण्याचा आग्रह धरतील.  सर्व ४० वारकरी हे मानकरी असतात. सेवेसाठी त्यांना देवासोबत चालणे गरजेचे असते. प्रशासनाने विरोध केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. याचा विचार करुन अगोदरच त्याचे नियोजन करावे. २० लोकांना चालण्याची परवानगी असेल तर तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त कशाला? दोघांनाच चालण्याची परवानगी असेल तर मग बस कशाला? मग वारकऱ्यांनी वारीला तरी का यावे? असे सवाल करुन ४०० वारकऱ्यांना पायी वारी नीट करु द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

हजारो भाविक पांडुरंग चरणी लीन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षीही प्रशासनाने आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मानाच्या दहा पालख्या व त्यामध्ये मोजक्याच भाविकांना आषाढी यात्रा एकादशीदिवशी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपुरात कडक संचारबंदी लागू केली आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर