शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पंढरपुरात वारकरी करणार गनिमी कावा; नाराज वारकऱ्यांचे पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 10:48 IST

गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती.

- बाळासाहेब बोचरेमुंबई : आषाढी वारीसाठी  १० मानाच्या पालख्यांना परवानगी  दिली. त्यासोबत २० ऐवजी ४० जणांना बसने जाण्यास  परवानगी दिली. मात्र वाखरीपासून चालण्यास केवळ दोन वारकऱ्यांना परवानगी देताना लावलेल्या  निकषांवरून वारकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे वातावरण असून आता आपणाला जे हवे ते त्या दिवशी दशमीलाच करायचे, असा ठाम निर्णय विविध पालखी व्यवस्थापनाने घेतला असल्याचे एका विश्वस्तांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती. यंदा ती दुप्पट करण्यात आली असली तरी त्यापैकी ३८ जणांना बसमध्येच बसण्याची अट घातली आहे. दोघांनी देवाच्या पादुका कशा घेऊन जाऊ शकतात? हे शासनानेच पालखी व्यवस्थापनाला पटवून सांगावे. देव जाताना मानकरी, टाळकरी, वादक असा लवाजमा असतो. तो नसेल तर मग पायी वारी तरी कशासाठी करायची? असा सवाल  त्यांनी केला. आता प्रशासनाकडे अर्ज विनंती करण्यापेक्षा जे करायचे ते परंपरेला साजेसेच करायचे. मग प्रशासनाला काय कारवाई करायची ते करु देत असा निर्णय घेतला गेला आहे. प्रसंगी पादुका प्रशासनाकडे सोपवून ४० जणांनी बसनेच पंढरपूरला जाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाखरीला पालख्या पोहोचल्यानंतर तिथून पुढील वाटचाल करताना प्रत्येक पालखी व्यवस्थापन त्यांच्या परंपरेप्रमाणेच सोहळा पुढे नेण्याचा आग्रह धरतील.  सर्व ४० वारकरी हे मानकरी असतात. सेवेसाठी त्यांना देवासोबत चालणे गरजेचे असते. प्रशासनाने विरोध केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. याचा विचार करुन अगोदरच त्याचे नियोजन करावे. २० लोकांना चालण्याची परवानगी असेल तर तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त कशाला? दोघांनाच चालण्याची परवानगी असेल तर मग बस कशाला? मग वारकऱ्यांनी वारीला तरी का यावे? असे सवाल करुन ४०० वारकऱ्यांना पायी वारी नीट करु द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

हजारो भाविक पांडुरंग चरणी लीन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षीही प्रशासनाने आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मानाच्या दहा पालख्या व त्यामध्ये मोजक्याच भाविकांना आषाढी यात्रा एकादशीदिवशी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपुरात कडक संचारबंदी लागू केली आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर