शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात टँकर सुरू करा

By admin | Updated: May 6, 2014 20:45 IST

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला.

सांगोला : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला. यासाठी शासन पैसा खर्च करते. पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवकांची असून पाणीटंचाईची एकत्रित पाहणी करून संबंधित अधिकार्‍यांनी टॅँकरचा प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठविल्यानंतर एका आठवड्यात टॅँकर सुरू झाले पाहिजेत, अशा सूचना आमदार गणपतराव देशमुख यांनी टंचाई आढावा बैठकीत प्रशासनाला केल्या. सांगोला येथे पंचायत समिती बचत भवनात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. दीपक साळुंखे, सभापती ताई मिसाळ, उपसभापती पांडुरंग पांढरे, चंद्रकांत देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पं. स. सदस्या यमगर, सूर्यागण, सुनील चौगुले, सुबराव बंडगर, हणमंत बंडगर, नवनाथ पवार, शहाजी नलवडे, पांडुरंग जाधव, कार्यालयीन प्रमुख सुभाष पवार, नगरसेवक नवनाथ पवार, जि. प. सदस्य किसन कोळेकर, बिरा गेजगे, सदस्या सुरेखा सूर्यागण, उपअभियंता महारुद्ध अंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मिलिंद देशपांडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, शिरभावी पाणीपुरवठा उपविभागीय अधिकारी विजय नलवडे उपस्थित होते. जेथे पाणीपुरवठा योजना राबविण्याची आहे त्या गावामध्ये शौचालय योजना प्राधान्याने राबवावी. ग्रामपंचायतीने गावातील पाणंद रस्ते रोजगार हमीतून येत्या पावसाळ्यापर्यंत करून घ्यावेत. जनावरांच्या छावण्या चालविलेल्या छावणी चालकांची आॅगस्ट, सप्टेंबर २०१३ अखेरपर्यंतची बिले सात दिवसांत अदा करावीत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. गावातील रस्त्यांच्या कामाचा आढावा आठ दिवसांत सादर करावा. शिरभावी पाणीपुरवठा योजनेची गळती पाच टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा. विंधन विहिरी बंद आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी पंचायत समिती फंडातून खर्च करावा, असे आ. देशमुख म्हणाले. गावागावांतील पाणीटंचाईवर ग्रामसेवक, तलाठ्यांनी लक्ष देऊन टॅँकर मागणी प्रस्ताव त्वरित सादर करावा. ५० विंधन विहिरी बंद आहेत. त्या सुरू करण्याबाबत नियोजन करावे. इटकी पाणीपुरवठ्याबाबत जीवन प्राधिकरणने लक्ष द्यावे. गारपीट झालेल्या भागातील जे नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत त्या शेतकर्‍यांचा संबंधित अधिकार्‍यांनी विचार करावा, असे आ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. सांगोला नगरपालिका हद्दीतील वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी केली असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. छावणी चालकांची बिले लवकरच अदा केली जातील. अन्न सुरक्षा कायद्याची तालुक्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी प्रयत्न आहेत. अन्नापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, असे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)