शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

आठवड्यात टँकर सुरू करा

By admin | Updated: May 6, 2014 20:45 IST

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला.

सांगोला : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला. यासाठी शासन पैसा खर्च करते. पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवकांची असून पाणीटंचाईची एकत्रित पाहणी करून संबंधित अधिकार्‍यांनी टॅँकरचा प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठविल्यानंतर एका आठवड्यात टॅँकर सुरू झाले पाहिजेत, अशा सूचना आमदार गणपतराव देशमुख यांनी टंचाई आढावा बैठकीत प्रशासनाला केल्या. सांगोला येथे पंचायत समिती बचत भवनात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. दीपक साळुंखे, सभापती ताई मिसाळ, उपसभापती पांडुरंग पांढरे, चंद्रकांत देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पं. स. सदस्या यमगर, सूर्यागण, सुनील चौगुले, सुबराव बंडगर, हणमंत बंडगर, नवनाथ पवार, शहाजी नलवडे, पांडुरंग जाधव, कार्यालयीन प्रमुख सुभाष पवार, नगरसेवक नवनाथ पवार, जि. प. सदस्य किसन कोळेकर, बिरा गेजगे, सदस्या सुरेखा सूर्यागण, उपअभियंता महारुद्ध अंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मिलिंद देशपांडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, शिरभावी पाणीपुरवठा उपविभागीय अधिकारी विजय नलवडे उपस्थित होते. जेथे पाणीपुरवठा योजना राबविण्याची आहे त्या गावामध्ये शौचालय योजना प्राधान्याने राबवावी. ग्रामपंचायतीने गावातील पाणंद रस्ते रोजगार हमीतून येत्या पावसाळ्यापर्यंत करून घ्यावेत. जनावरांच्या छावण्या चालविलेल्या छावणी चालकांची आॅगस्ट, सप्टेंबर २०१३ अखेरपर्यंतची बिले सात दिवसांत अदा करावीत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. गावातील रस्त्यांच्या कामाचा आढावा आठ दिवसांत सादर करावा. शिरभावी पाणीपुरवठा योजनेची गळती पाच टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा. विंधन विहिरी बंद आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी पंचायत समिती फंडातून खर्च करावा, असे आ. देशमुख म्हणाले. गावागावांतील पाणीटंचाईवर ग्रामसेवक, तलाठ्यांनी लक्ष देऊन टॅँकर मागणी प्रस्ताव त्वरित सादर करावा. ५० विंधन विहिरी बंद आहेत. त्या सुरू करण्याबाबत नियोजन करावे. इटकी पाणीपुरवठ्याबाबत जीवन प्राधिकरणने लक्ष द्यावे. गारपीट झालेल्या भागातील जे नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत त्या शेतकर्‍यांचा संबंधित अधिकार्‍यांनी विचार करावा, असे आ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. सांगोला नगरपालिका हद्दीतील वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी केली असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. छावणी चालकांची बिले लवकरच अदा केली जातील. अन्न सुरक्षा कायद्याची तालुक्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी प्रयत्न आहेत. अन्नापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, असे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)