शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सहा महिन्यात ‘वंदे भारत’ची गती वाढणार; पुण्याला आणखी वीस मिनिटे लवकर पोहोचणार

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 21, 2023 20:14 IST

१० फेब्रुवारीला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली.

सोलापूर :सोलापूर ते पुणे रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशन काम प्रस्तावित असून, अपग्रेडेशननंतर वंदे भारत १३० किलोमीटरने धावणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी ३० ते ४० मिनिटं तर पुण्यासाठी कमीत कमी २० मिनिटं वेळ वाचणार आहे, अशी माहिती सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांनी मंगळवारी दिली.

१० फेब्रुवारीला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. मागील दहा दिवसांत वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला असून, याची माहिती देण्याकरिता नीरजकुमार दोहरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी वरील माहिती दिली. वंदे भारतची गती प्रती तास १६० किमी आहे; परंतु सोलापूर ते पुणे व पुणे ते मुंबई रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशनचे काम प्रस्तावित आहे.

काही ठिकाणी अपग्रेडेशन झाले आहे. सध्या सोलापूर येथून वंदे भारत सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटते. पुणे स्टेशनवर ९ वाजून १५ मिनिटांनी पोहोचते. तर मुंबईला दुपारी साडेबारा वाजता पाेहोचते. साडेसहा तासांत मुंबईला वंदे भारत पोहोचते. पुढील काळात साडेपाच ते पावणेसहा तासात वंदे भारत मुंबईला पोहोचू शकते. त्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस