शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सण विशेष; शेतकरी सायेब झाला, बैलबारदाना गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:50 IST

शेतीचे यांत्रिकीकरण: पशुधनाकडे दुर्लक्ष; पाऊस नसल्याने पोळा सणाच्या हौसेला मर्यादा

ठळक मुद्दे बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले

बाळासाहेब बोचरेसोलापूर: शेतकºयांची मुलं शिकली, सायेब झाली किंवा शेती सोडून बैलबारदाना गुंडाळून शहराकडे गेल्याने बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले असल्याचे चित्र आहे. 

एक जमाना होता. जमीन नसली तरी शेतमजूर म्हणून काम करणाºयाकडे घरटी एकतरी जनावर असायचं. पण आज मोठ्या शेतकºयाला जनावरं सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात तर छोट्या शेतकºयाला अन् मजुराला बैलबारदाना सांभाळणे परवडेनासे झाल्याने पशुधनातच घट झाल्याचे दिसून येते. बैलपोळ्याचा सण म्हणजे आपल्या शेतात वर्षभर राबणाºया बैलांना मनोभावे सजवून त्यांची पूजा करताना शेतकºयाला मनस्वी आनंद व्हायचा. आज मात्र केवळ दुभत्या गायीला पोसण्याइतपत शेतकºयांचे जनावरांबद्दलचे प्रेम उरले आहे. 

बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फेरफटका मारला असता. बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला असल्याची प्रतिक्रिया या व्यवसायात ४० वर्षे असलेले शाम खंडेलवाल यांनी सांगितले. याच व्यवसायात टिकून असलेल्या साखरे यांच्या तिसºया पिढीतील योगेश साखरे सांगतात की, आम्ही लहान असताना बैलपोळा सणाच्या अगोदर १५ दिवस शेतकºयांची इतकी गर्दी असायची की आमच्याशी बोलायलाही आजोबांना वेळ नसायचा. आज मात्र १० टक्केही व्यवसाय नसल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, दुकानात बैलांचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी राजाराम नारायण गायकवाड म्हणाले, आमच्याकडे कायम ४० ते ५० जनावरे असायची. पण आता जनावरे सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात, शिवाय ट्रॅक्टर आल्याने जनावरे कमी केली. सध्या शेतकºयाची अवस्था वाईट आहे. पाऊस नाही, पिकाला भाव नाही आणि जो ऊस गेला त्याचे अजून पैसे मिळाले नसल्याने व्याजावर प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे.

आमची पिढी आहे तोपर्यंत जनावरे आहेत. यापुढची शिकलेली पिढी जनावरे पाळेल की नाही, याबद्दल शंकाच आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. थोडीफार शिकलेली शेतकºयांची मुलेही शेतात काम करणे आणि जनावरांची देखभाल करण्यापेक्षा शहरात कारखान्यात काम करण्याकडे वळू लागली आहेत. शिवाय उच्चशिक्षित मुले मोठ्या हुद्यावर गेली आहेत. आम्हाला देशी गायींच्या दुधाशिवाय दुसरं दूध आवडत नाही म्हणून खिलार गायी पाळल्यात. सगळी मिळून १२ जनावरे असल्याचे त्यांनी सांगितले. 

पैसा नाही, हौस कसली?च्पाऊसपाणी नसल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. साखर कारखान्यांकडे शेतकºयांची दीडशे कोटीची येणे बाकी असताना कारखान्यांनी पोळ्यासाठी काहीच जाहीर केले नाही.  त्यामुळे गरजेपुरतेच साहित्य घेतले जात आहे. हौसेला मुरड घातली जात आहे. बैलांच्या गळ्यातील चंगाळी ही उत्तम पितळी धातूपासून बनविली जाते. त्याची जोड किमान तीन ते साडेतीन हजाराला मिळते. पण चायना घुंगराची नवीन चंगाळी केवळ ५०० रुपयात मिळते. त्यामुळे काटकसरीने पोळा करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी