शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

पोळा सण विशेष; शेतकरी सायेब झाला, बैलबारदाना गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:50 IST

शेतीचे यांत्रिकीकरण: पशुधनाकडे दुर्लक्ष; पाऊस नसल्याने पोळा सणाच्या हौसेला मर्यादा

ठळक मुद्दे बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले

बाळासाहेब बोचरेसोलापूर: शेतकºयांची मुलं शिकली, सायेब झाली किंवा शेती सोडून बैलबारदाना गुंडाळून शहराकडे गेल्याने बैलपोळ्याच्या सणाला आज औपचारिकतेचे स्वरूप आले असल्याचे चित्र आहे. 

एक जमाना होता. जमीन नसली तरी शेतमजूर म्हणून काम करणाºयाकडे घरटी एकतरी जनावर असायचं. पण आज मोठ्या शेतकºयाला जनावरं सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात तर छोट्या शेतकºयाला अन् मजुराला बैलबारदाना सांभाळणे परवडेनासे झाल्याने पशुधनातच घट झाल्याचे दिसून येते. बैलपोळ्याचा सण म्हणजे आपल्या शेतात वर्षभर राबणाºया बैलांना मनोभावे सजवून त्यांची पूजा करताना शेतकºयाला मनस्वी आनंद व्हायचा. आज मात्र केवळ दुभत्या गायीला पोसण्याइतपत शेतकºयांचे जनावरांबद्दलचे प्रेम उरले आहे. 

बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फेरफटका मारला असता. बैलपोळा सणाचा व्यवसाय हा ७५ टक्के कमी झाला असल्याची प्रतिक्रिया या व्यवसायात ४० वर्षे असलेले शाम खंडेलवाल यांनी सांगितले. याच व्यवसायात टिकून असलेल्या साखरे यांच्या तिसºया पिढीतील योगेश साखरे सांगतात की, आम्ही लहान असताना बैलपोळा सणाच्या अगोदर १५ दिवस शेतकºयांची इतकी गर्दी असायची की आमच्याशी बोलायलाही आजोबांना वेळ नसायचा. आज मात्र १० टक्केही व्यवसाय नसल्याचे चित्र आहे. 

दरम्यान, दुकानात बैलांचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी राजाराम नारायण गायकवाड म्हणाले, आमच्याकडे कायम ४० ते ५० जनावरे असायची. पण आता जनावरे सांभाळण्यासाठी मजूर मिळेनात, शिवाय ट्रॅक्टर आल्याने जनावरे कमी केली. सध्या शेतकºयाची अवस्था वाईट आहे. पाऊस नाही, पिकाला भाव नाही आणि जो ऊस गेला त्याचे अजून पैसे मिळाले नसल्याने व्याजावर प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे.

आमची पिढी आहे तोपर्यंत जनावरे आहेत. यापुढची शिकलेली पिढी जनावरे पाळेल की नाही, याबद्दल शंकाच आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. थोडीफार शिकलेली शेतकºयांची मुलेही शेतात काम करणे आणि जनावरांची देखभाल करण्यापेक्षा शहरात कारखान्यात काम करण्याकडे वळू लागली आहेत. शिवाय उच्चशिक्षित मुले मोठ्या हुद्यावर गेली आहेत. आम्हाला देशी गायींच्या दुधाशिवाय दुसरं दूध आवडत नाही म्हणून खिलार गायी पाळल्यात. सगळी मिळून १२ जनावरे असल्याचे त्यांनी सांगितले. 

पैसा नाही, हौस कसली?च्पाऊसपाणी नसल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. साखर कारखान्यांकडे शेतकºयांची दीडशे कोटीची येणे बाकी असताना कारखान्यांनी पोळ्यासाठी काहीच जाहीर केले नाही.  त्यामुळे गरजेपुरतेच साहित्य घेतले जात आहे. हौसेला मुरड घातली जात आहे. बैलांच्या गळ्यातील चंगाळी ही उत्तम पितळी धातूपासून बनविली जाते. त्याची जोड किमान तीन ते साडेतीन हजाराला मिळते. पण चायना घुंगराची नवीन चंगाळी केवळ ५०० रुपयात मिळते. त्यामुळे काटकसरीने पोळा करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी