शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पिकांअभावी आता शेतात येतोय कोंबड्यांचाच आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:34 IST

पावसाअभावी पिके गेली, शेतकºयांना कुक्कुटपालनाचाच मिळतोय आधार

ठळक मुद्देमाळशिरस तालुका, भाजीपाल्याचेही दर गडगडल्याने शेतकरी संकटातशेतकरी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून संकरित गाई, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन करतात

माळशिरस : सध्या कृषी क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या दुष्काळाची समस्या भेडसावत आहे़ गतवर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला़ त्यामुळे सर्वसामान्य शेतकºयांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे़ परंतु अनेक शेतकºयांना शेतीपूरक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाने मोठा आधार मिळत असल्याचे दिसून येते.

अनेक शेतकरीशेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून संकरित गाई, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन करतात़ यंदा हेच व्यवसाय अर्थकारण सावरताना दिसत आहेत़ सध्या  पोल्ट्री व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला  असून, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या पाळल्या जात आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनिश्चितता सुरू आहे़ त्यामुळे तालुक्यातील ऊस, केळी बारमाही पिकांखालील क्षेत्रात घट झाली आहे़ सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणे अशक्य आहे़ त्यातही सिंचनाखाली केलेल्या मका, ज्वारी आदींवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काही शेतकरी भाजीपाला लागवड करून आर्थिक गणित मांडण्याचे प्रयत्न करतात, पण बाजारात कवडीमोलाने भाजीपाला विकावा लागत आहे़ अशा अनेक प्रकारच्या संकटामुळे कृषीचे अर्थकारण सुधारण्यासाठी शेतकरी शेतीपूरक व्यवसायांना लक्ष्य करीत आहेत.

तालुक्यात अनेक ठिकाणी कुक्कुटपालन व्यवसायाकडे शेतकरी आकर्षित होत आहेत़ यामध्ये ब्रॉयलर, देशी, गिरीराज, वनराज, कडकनाथ अशा वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्यांचे पालन केले जात आहे़ या उद्योगासाठी वेगवेगळ्या कंपन्या शेतकºयांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. मात्र अलीकडील काळात या उद्योगातही वेगवेगळे आजार व बाजार भावाच्या तेजी-मंदीचा फटका बसत आहे़ सध्या तरी अनेक शेतकºयांनी लाखो रुपये गुंतवणूक करून ब्रॉयलर पक्षी पालन सुरू केले आहे.

पाण्याचा तुटवडा असल्यामुळे शेतीत इतर पिके  घेणे शक्य नाही़ त्यामुळे बँक व कोंबड्या पुरविणाºया कंपनीच्या साह्याने शेड उभा करून ब्रॉयलर जातींच्या पक्ष्याचे पालन केले  आहे. यातून शेतीसाठी खत व आर्थिक लाभही मिळत आहे, मात्र वाढते रोग व बाजार भावातील चढ-उतारामुळे या व्यवसायाला शेतकरी फारशी पसंती देत नाहीत.- शहाजी वळकुंदेकुक्कुटपालन शेतकरी, मेडद

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती