शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबी-संत्रा ज्यूसलाच सोलापूरकरांची अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:54 IST

शरीरातील संतुलन राखण्यासाठी रसदार फळे उपयुक्त, ज्यूस सेवनाने उन्हाळ्यातील आजारापासून मिळते मुक्ती

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाने १० दिवसांपूर्वी शहरातील २५ ज्यूस सेंटरची अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आलीज्यूस बनविताना दर्जेदार पाणी वापरणे बंधनकारकउन्हाळ्यात ज्यूसला असणारी मागणी लक्षात घेऊन काही कंपन्या आॅनलाईनद्वारे आॅर्डरी

सोलापूर : रखरखत्या उन्हात फिरताना घामाद्वारे अंगातील पाणी अन् क्षार निघून जाताना एक प्रकारचा अस्वस्थपणा, थकवा जाणवतो. हा अस्वस्थपणा, थकवा घालविण्याबरोबर उन्हाळी आजारांना फाटा देण्यासाठी रसदार फळांच्या ज्यूसचे सेवन करण्याकडे साºयांचाच कल वाढला असून, जारच्या पाण्यावर चालणारे ज्यूस सेंटर हाऊसफुल्ल दिसत आहेत. अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी मोसंबी, संत्र्याच्या ज्यूसला अधिक मागणी आहे. 

गुरुवारी तापमानाने बेचाळीसी गाठली. ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शुक्रवारीही दिसून आली. सकाळी अकरा-साडेअकरानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. रखरखत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना शरीराचे संतुलन बिघडते. 

घामाद्वारे अंगातील पाणी अन् क्षार बाहेर पडत असल्याने थकवा, अस्वस्थपणा जाणवतो. मग अचानक चक्कर येणे, अति तहान लागणे आदी लक्षणे दिसू लागतात. काम करण्याची इच्छाशक्तीच निघून जाते. त्यासाठी रसदार फळे अथवा त्या फळांपासून बनविण्यात आलेल्या ज्यूसचे सेवन केले जाते.  सात रस्ता येथील एका सेंटरमध्ये ज्यूस बनविताना नेमक्या कुठल्या पाण्याचा वापर केला जातो ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ‘लोकमत‘ चमू थेट प्रक्रियास्थळी पोहोचला. तेथे पाण्याचे १० ते १५ जार दिसून आले. अन्य भागातील काही सेंटरमध्येही जारच्या पाण्यावरच भर देण्यात येत होता. 

दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत ज्यूस सेवन करणाºयांची संख्या लक्षणीय असते.  त्यानंतर सायंकाळी ५ नंतर मग पुन्हा ही मंडळी चहा घेण्याकडे वळतात. काही ग्राहक चहा आमच्यासाठी टॉनिक आहे. दुपारची झोप झाल्यावर काही जण ज्यूसऐवजी चहाच घेणे पसंत करतात. आंबा, चिक्कू, पायनापल, खरबूज, कलिंगड, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सफरचंद, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, अंजिर, सीताफळ, रामफळ आदी फळांच्या ज्यूससह बदाम मिल्क शेक, ग्रीन पिस्ता आदी ज्यूस सर्वच सेंटरवर मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

तपासणीत जारचेच पाणी आढळले- अन्न व औषध प्रशासन विभागाने १० दिवसांपूर्वी शहरातील २५ ज्यूस सेंटरची अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. ज्यूस बनविताना दर्जेदार पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र काही ठिकाणी बोअर अथवा इतरत्र आणलेल्या साध्या पाण्याचा वापर होतो का ? हे जाणून घेण्यासाठी विभागातील पथकाने ज्यूस सेंटरची कसून तपासणी केली. त्यावेळी या सर्वच सर्व सेंटरवर जारचेच पाणी वापरण्यात येत होते, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. 

आॅनलाईनद्वारे घरपोच सेवा...- उन्हाळ्यात ज्यूसला असणारी मागणी लक्षात घेऊन काही कंपन्या आॅनलाईनद्वारे आॅर्डरी घेतात. अवघ्या काही मिनिटात ज्यूसची घरपोच सेवा दिली जाते. एका कंपनीने उन्हाळ्यातील तीन महिन्यांसाठी ज्यूसवर ६० टक्के सूट दिल्याने यंदा ज्यूस सेवन करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. घरपोच सेवा देताना कुठलाही दर आकारला जात नाही. निवडणूक अन् ज्यूस सेंटवरही नजर- अन्न व औषध प्रशासन विभागात केवळ ८ कर्मचारी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी हे सर्वच कर्मचारी कामाला लागले आहेत. वास्तविक या विभागात अपुरे कर्मचारी असतानाही लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असताना शहरातील ज्यूस सेंटवरही लक्ष ठेवून आहेत, असे प्रदीप राऊत यांनी सांगितले. 

शहरातील काही ज्यूस सेंटरची अचानक तपासणी केली. तेथे जारच्याच पाण्याचा वापर होत होता. ज्यूस बनविताना दर्जेदार पाण्याचा वापर होत नसेल तर अशांवर कारवाई करु. निवडणुकीचे काम सांभाळताना अधून-मधून ज्यूस सेंटरवर करडी नजर ठेवू.-प्रदीप राऊतसहायक आयुक्त- अन्न व औषध प्रशासन

उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवतात. शरीरातील पाणी, क्षार कमी झाले तर थकवा येतो. यामुळे आमच्याकडे शुद्ध, दर्जेदार असलेल्या जारच्या पाण्याचा वापर करतो. ग्राहकांची विशेष काळजी घेताना अन्न व औषध प्रशासन विभागाने घालून दिलेले नियम अंमलात आणतो. -रफिक बागवान, ज्यूस विक्रेता

आॅनलाईनद्वारे घरपोच ज्यूस मागविणाºयांची संख्या अधिक आहे. विशेषत: घरातील वृद्ध मंडळींसाठी ज्यूस पोहोच करताना त्यांची सेवा करण्याची संधी मिळते. या सेवेचा मोबदला कंपनी स्वत: अदा करते. सेवादर ग्राहकांवर लादला जात नाही. यामुळे मागणी वाढली आहे.- त्रिमूर्ती बल्लाआॅनलाईन ज्यूस पोहोचवणारा कर्मचारी

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान