शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

मोसंबी-संत्रा ज्यूसलाच सोलापूरकरांची अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:54 IST

शरीरातील संतुलन राखण्यासाठी रसदार फळे उपयुक्त, ज्यूस सेवनाने उन्हाळ्यातील आजारापासून मिळते मुक्ती

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाने १० दिवसांपूर्वी शहरातील २५ ज्यूस सेंटरची अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आलीज्यूस बनविताना दर्जेदार पाणी वापरणे बंधनकारकउन्हाळ्यात ज्यूसला असणारी मागणी लक्षात घेऊन काही कंपन्या आॅनलाईनद्वारे आॅर्डरी

सोलापूर : रखरखत्या उन्हात फिरताना घामाद्वारे अंगातील पाणी अन् क्षार निघून जाताना एक प्रकारचा अस्वस्थपणा, थकवा जाणवतो. हा अस्वस्थपणा, थकवा घालविण्याबरोबर उन्हाळी आजारांना फाटा देण्यासाठी रसदार फळांच्या ज्यूसचे सेवन करण्याकडे साºयांचाच कल वाढला असून, जारच्या पाण्यावर चालणारे ज्यूस सेंटर हाऊसफुल्ल दिसत आहेत. अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी मोसंबी, संत्र्याच्या ज्यूसला अधिक मागणी आहे. 

गुरुवारी तापमानाने बेचाळीसी गाठली. ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शुक्रवारीही दिसून आली. सकाळी अकरा-साडेअकरानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. रखरखत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना शरीराचे संतुलन बिघडते. 

घामाद्वारे अंगातील पाणी अन् क्षार बाहेर पडत असल्याने थकवा, अस्वस्थपणा जाणवतो. मग अचानक चक्कर येणे, अति तहान लागणे आदी लक्षणे दिसू लागतात. काम करण्याची इच्छाशक्तीच निघून जाते. त्यासाठी रसदार फळे अथवा त्या फळांपासून बनविण्यात आलेल्या ज्यूसचे सेवन केले जाते.  सात रस्ता येथील एका सेंटरमध्ये ज्यूस बनविताना नेमक्या कुठल्या पाण्याचा वापर केला जातो ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ‘लोकमत‘ चमू थेट प्रक्रियास्थळी पोहोचला. तेथे पाण्याचे १० ते १५ जार दिसून आले. अन्य भागातील काही सेंटरमध्येही जारच्या पाण्यावरच भर देण्यात येत होता. 

दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत ज्यूस सेवन करणाºयांची संख्या लक्षणीय असते.  त्यानंतर सायंकाळी ५ नंतर मग पुन्हा ही मंडळी चहा घेण्याकडे वळतात. काही ग्राहक चहा आमच्यासाठी टॉनिक आहे. दुपारची झोप झाल्यावर काही जण ज्यूसऐवजी चहाच घेणे पसंत करतात. आंबा, चिक्कू, पायनापल, खरबूज, कलिंगड, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सफरचंद, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, अंजिर, सीताफळ, रामफळ आदी फळांच्या ज्यूससह बदाम मिल्क शेक, ग्रीन पिस्ता आदी ज्यूस सर्वच सेंटरवर मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

तपासणीत जारचेच पाणी आढळले- अन्न व औषध प्रशासन विभागाने १० दिवसांपूर्वी शहरातील २५ ज्यूस सेंटरची अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. ज्यूस बनविताना दर्जेदार पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र काही ठिकाणी बोअर अथवा इतरत्र आणलेल्या साध्या पाण्याचा वापर होतो का ? हे जाणून घेण्यासाठी विभागातील पथकाने ज्यूस सेंटरची कसून तपासणी केली. त्यावेळी या सर्वच सर्व सेंटरवर जारचेच पाणी वापरण्यात येत होते, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. 

आॅनलाईनद्वारे घरपोच सेवा...- उन्हाळ्यात ज्यूसला असणारी मागणी लक्षात घेऊन काही कंपन्या आॅनलाईनद्वारे आॅर्डरी घेतात. अवघ्या काही मिनिटात ज्यूसची घरपोच सेवा दिली जाते. एका कंपनीने उन्हाळ्यातील तीन महिन्यांसाठी ज्यूसवर ६० टक्के सूट दिल्याने यंदा ज्यूस सेवन करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. घरपोच सेवा देताना कुठलाही दर आकारला जात नाही. निवडणूक अन् ज्यूस सेंटवरही नजर- अन्न व औषध प्रशासन विभागात केवळ ८ कर्मचारी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी हे सर्वच कर्मचारी कामाला लागले आहेत. वास्तविक या विभागात अपुरे कर्मचारी असतानाही लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असताना शहरातील ज्यूस सेंटवरही लक्ष ठेवून आहेत, असे प्रदीप राऊत यांनी सांगितले. 

शहरातील काही ज्यूस सेंटरची अचानक तपासणी केली. तेथे जारच्याच पाण्याचा वापर होत होता. ज्यूस बनविताना दर्जेदार पाण्याचा वापर होत नसेल तर अशांवर कारवाई करु. निवडणुकीचे काम सांभाळताना अधून-मधून ज्यूस सेंटरवर करडी नजर ठेवू.-प्रदीप राऊतसहायक आयुक्त- अन्न व औषध प्रशासन

उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवतात. शरीरातील पाणी, क्षार कमी झाले तर थकवा येतो. यामुळे आमच्याकडे शुद्ध, दर्जेदार असलेल्या जारच्या पाण्याचा वापर करतो. ग्राहकांची विशेष काळजी घेताना अन्न व औषध प्रशासन विभागाने घालून दिलेले नियम अंमलात आणतो. -रफिक बागवान, ज्यूस विक्रेता

आॅनलाईनद्वारे घरपोच ज्यूस मागविणाºयांची संख्या अधिक आहे. विशेषत: घरातील वृद्ध मंडळींसाठी ज्यूस पोहोच करताना त्यांची सेवा करण्याची संधी मिळते. या सेवेचा मोबदला कंपनी स्वत: अदा करते. सेवादर ग्राहकांवर लादला जात नाही. यामुळे मागणी वाढली आहे.- त्रिमूर्ती बल्लाआॅनलाईन ज्यूस पोहोचवणारा कर्मचारी

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान