शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या प्रसिद्ध केळी, सफरचंद, डाळिंब अन् माशांना दिल्लीच्या बाजारात भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 11:22 IST

किसान रेलचा शेतकऱ्यांना फायदा - ६५ फेऱ्यातून रेल्वेला मिळाले ४.५ कोटींचे उत्पन्न, रेल्वे मंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कौतुक

सोलापूर: सोलापूरच्या फळपिकांना आता परराज्यासह जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी येऊ लागली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून आतापर्यंत ६५ किसान रेल्वे फेऱ्यातून रेल्वेला ४.५ कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सोलापूर विभागातून किसान रेलला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करून कौतुक केले आहे.

बंगळुरु-आदर्शनगर (दिल्ली) किसान स्पेशल सुरुवातीला मिरज-पुणे मार्गावरुन सुरुवात करण्यात आली. तथापी सांगोला व जेऊर येथील शेतकरी व व्यापाऱ्यांची मागणी विचारात घेऊन ही गाडी मिरज-कुर्डूवाडी-दौंडमार्गे वळविण्यात आली. ही ट्रेन रविवारी आठवड्यातून एकदा धावत आहे. अल्पावधीतच ही रेल्वेगाडी या भागातील शेतक‌ऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली. शेतकऱ्यांचा शेतातील माल अतिशय वेगवान आणि सुरक्षित मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात किसान रेल्वेकडे वळत असल्याचे दिसत आहे. 

शेतकऱ्यांच्या मालाला ५० टक्केच भाडे

अन्न प्रक्रिया मंत्रालय किसान रेल्वेमार्फत अधिसूचित फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान देत आहे. याचा परिणाम रोडवेजच्या तुलनेत रेल्वेने कमी खर्चात वाहतूक होत आहे. सांगोला-दानापूर, सांगोला-शालिमार, बंगळुरु-आदर्शनगर, सांगोला-सिकंदराबाद या चार गाड्या धावत आहेत. यातून सांगोला, जेऊर, करमाळा, पंढरपूर आदी परिसरातील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल किसान रेल्वेने जात असल्याचे सांगण्यात आले.

सफरचंद, मासे, डाळिंब, पेरूचीही होतेय निर्यात...

केळी, पेरू, सीताफळ, बोरं इत्यादी विविध फळांच्या लोडिंगचे जेऊर हे केंद्र बनले आहे. कंदरची प्रसिद्ध केळी दिल्ली बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आतापर्यंत या रेल्वेने जेऊर येथून ४५० टनाहून अधिक फळांची वाहतूक केली आहे. या वाहतुकीतून रेल्वेला २० लाखांहून अधिक कमाई एकट्या जेऊर स्टेशनवरून झाली आहे. सांगोला, जेऊर भागातून सफरचंद, केळी, डाळिंब, पेरू, पपई, लिंबू, मासे, कांदा आदींची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय आतापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेती