शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाला 'पब्लिक रिलेशन कौन्सिल'चा पुरस्कार

By appasaheb.patil | Updated: November 12, 2022 17:59 IST

राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाला पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेने कोलकाता येथे  11 नोव्हेंबर 2022 रोजी हॉटेल फेअरफिल्ड  मॅरिएट येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ .जी .एस .कांबळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी स्वीकारला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक एम .बी . जयराम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही जनसंपर्क व जाहिरात क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. भारतातीत विविध राज्यात तसेच संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका इत्यादी देशातही या संस्थेच्या शाखा आहेत. या संस्थेतर्फे  चाणक्य ज्युरी पुरस्कारांसाठी देशभरातून विविध प्रस्ताव मागविण्यात आले होते .या संस्थेने नेमलेल्या तज्ञ समितीने आलेल्या प्रस्तावांची छाननी करून विविध निकषांच्या आधारे  निवड केली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाची 'कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी निवड करताना विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी  सुविधा,सुरू केलेले विविध अभ्यासक्रम,विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, विभागातर्फे मागील वर्षभरात आयोजित केलेले  शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन इत्यादी निकषांच्या आधारे या चाणक्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हा पुरस्कार स्वीकारताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की मास कम्युनिकेशन विभाग हा उपक्रमशील विभाग आहे. या विभागांमध्ये उभारण्यात आलेल्या टीव्ही आणि रेडिओ स्टुडिओच्या माध्यमातून विभागात  विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत .सर्व गोष्टींची दखल  पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाने घेऊन राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार देऊन विभागाचा गौरव केला याचा मला आनंद वाटतो. सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ .जी . एस .कांबळे म्हणाले की सामाजिक शास्त्रे संकुलातर्फे सातत्याने सांघिक स्तरावर चांगले कार्य जाते. या पुरस्कारामुळे संकुलाचा आणि विद्यापीठाचाही गौरव झाला आहे.

टॅग्स :Solapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरSolapurसोलापूर