शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात चौथ्यांदा होतेय लक्षवेधी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 10:17 IST

बारा लढती झाल्या दुरंगी : सुशीलकुमार शिंदे, आंबेडकर, जयसिध्देश्वरांच्या प्रचाराला गती

ठळक मुद्देसोलापूर मतदारसंघात आजवर झालेल्या तिरंगी लढतींमध्ये तुल्यबळ उमेदवार आमने-सामने होतेसन २००३ (पोटनिवडणूक), २००४ ,२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत दुरंगी सामना झालालोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत जनता दलाच्या वतीने रविकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही तिरंगी लढत अधिक रंगतदार झाली.

रवींद्र देशमुख

सोलापूर : स्वातंत्र्यानंतर सोलापूर मतदारसंघात झालेल्या अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला असता येथे चौथ्यांदा तिरंगी लढत होत आहे. १९८०, १९९६, १९९९ नंतर यंदाच्या २०१९ च्या निवडणुकीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर यांच्यातील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. आजवरच्या पंधरा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात १२ दुरंगी लढती; तर दोन चौरंगी लढती झाल्या.

लोकसभेची आठवी अर्थात १९८० साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे (इंदिरा) गंगाधरपंत कुचन, जनता पार्टीचे पन्नालाल सुराणा आणि अर्स काँग्रेसच्या प्रभाताई झाडबुके यांच्यात तिरंगी लढत झाली. सुराणा आणि झाडबुके हे दोन बार्शीकर एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होती. इंदिरा गांधी यांच्या हयातीत ही निवडणूक झाली. त्यांचा करिष्मा संपूर्ण देशावर होता. त्यामुळे कुचन यांनी ५४ टक्के मत घेऊन ही निवडणूक आरामात जिंकली. सुराणा यांना ९९ हजार ४२१; तर प्रभातार्इंना ६५ हजार ७७ मतांवर समाधान मानावे लागले.

लोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत जनता दलाच्या वतीने रविकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही तिरंगी लढत अधिक रंगतदार झाली. काँग्रेसतर्फे धर्मण्णा सादूल आणि भाजपतर्फे लिंगराज वल्याळ हे निवडणूक रिंगणात उतरले होते. या तिरंगी लढतीचा लाभ भाजपला झाला. वल्याळ हे १,८४,०७५ मते घेऊन विजयी झाले. विशेष म्हणजे पाटील यांनी १,६६,९८८ मते घेऊन दुसरे स्थान पटकाविले; तर सादूल हे तिसºया स्थानावर फेकले गेले. त्यांना १,६२,९७८ मते मिळाली.

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून १० जून १९९९ रोजी राष्टÑवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावर्षी झालेल्या लोकसभेच्या तेराव्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. सोलापुरात राष्टÑवादी काँग्रेसकडून डॉ. मुकेश तथा अरळप्पा गंगप्पा अबदुलपूरकर यांनी निवडणूक लढविली. या तिरंगी लढतीत काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या वतीने लिंगराज वल्याळ सहभागी होते. शिंदे यांनी ४७.४९ टक्के अर्थात २,८६,५७८ मते घेऊन विजय संपादन केला होता; तर वल्याळ यांना २,०९,५८३ मते मिळाली. डॉ. अबदुलपूरकर यांना केवळ १,०२,८०३ मते मिळू शकली.

सन २००३ (पोटनिवडणूक), २००४ ,२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत दुरंगी सामना झाला. सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे २००३ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी थेट लढतीत काँग्रेसचे आनंदराव देवकते यांचा पराभव केला होता. २००४ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव करून विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिंकला होता. २००९ मध्ये भाजपने चित्रपट अभिनेते अ‍ॅड. शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक सुशीलकुमार शिंदे यांनी जिंकली; तर २०१४ मध्ये अ‍ॅड. बनसोडे यांनी शिंदे यांचा पराभव केला होता.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी- सोलापूर मतदारसंघात आजवर झालेल्या तिरंगी लढतींमध्ये तुल्यबळ उमेदवार आमने-सामने होते. यंदाच्या निवडणुकीतही अशीच लढत होत आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी सुरूवातीचा वैयक्तिक भेटीगाठींचा टप्पा पूर्ण करून प्रत्यक्षात प्रचाराला प्रारंभ केला. आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तिसºयाच दिवशी जिल्ह्यात सभांचा धडाका लावला आहे; तर भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर यांनी वैयक्तिक भेटीगाठी पूर्ण करून रविवारपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथून प्रचार सभांना प्रारंभ केला.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर