शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपात सोलापूर तर उताऱ्यात कोल्हापूर सरस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 15:23 IST

अडचणी दूर करीत हंगामाने घेतला वेग

सोलापूर :  राज्यात ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला आहे. गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून उताऱ्यात मात्र, कोल्हापूर सरस ठरले आहे.

यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने साखर हंगाम सुरू होण्यासाठी काही जिल्ह्यांत अडचणी आल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडला.  मागील अडीच महिन्यांत ऊस गाळपाने चांगला वेग घेतला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यात गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवारपर्य॔ंत ९६ लाख ३७ हजार ४०२ मेट्रीक टन गाळप झाले आहे तर ८६ लाख २६ हजार ८९६ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी ८.९५ टक्के  इतका पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ८६ लाख ८८ हजार २२९ मेट्रीक टन गाळप तर ९९ लाख ३८ हजार ७९४ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा राज्यात सर्वाधिक ११.४४ टक्के इतका पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २१ साखर कारखान्यांनी ७० लाख ७ हजार तर पुणे जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७१ लाख ३० हजार ७२२ मेट्रीक टन गाळप केले आहे. 

राज्यात सहकारी ९० तर ९२ खासगी असे १८२ साखर कारखाने सुरू असून ५ कोटी ५३ लाख ३८ हजार मेट्रीक टन इतके गाळप झाले आहे. ५४० लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा साखर उतारा ९.७७ टक्के इतका पडला आहे.   राज्यात खासगी ९२ साखर कारखाने सुरू असून त्यापैकी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाअंर्तगत सर्वाधिक २७ तर सोलापूर जिल्ह्यात १८ व उस्मानाबाद जिल्ह्यात ८ कारखान्यांचा समावेश आहे.   साखर उतारा सोलापूर जिल्हा सर्वांत कमी ८.९५ टक्के , उस्मानाबाद ९.५ टक्के, पुणे ९.९ टक्के, सातारा जिल्ह्यात १०.४१ टक्के, सांगली ११.२२ टक्के तर कोल्हापूर ११.४४ टक्के याप्रमाणे आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने