शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरची ६९२ कोटींची पाणीपुरवठा योजना गतिमान, एनटीपीसी, स्मार्ट सिटी योजनेतील निधीचा होणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:36 IST

शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची  योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

ठळक मुद्देमनपाने यापूर्वी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १२४० कोटींची योजना तयार केली होतीनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्तावशहराला ३१५ एमएलडी पाणी दररोज उपलब्ध होईल. ज्याचा उपयोग शहराची दररोजची गरज भागण्यासाठी होऊ शकणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची  योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी  दिली. मनपाने यापूर्वी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १२४० कोटींची योजना तयार केली होती. यात २०४५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी इतकी मोठी योजना साकार करण्यासाठी निधी देणे शासनाला शक्य नसल्याचे सांगून दोन टप्पे करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने या योजनेतील काही भाग बाजूला ठेवून ६९२ कोटींची योजना तयार केली आहे. ही योजना मार्गी लावावी म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पण आहे त्या परिस्थितीत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ही योजना वेगळ्या पद्धतीने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केला आहे. याबाबत महापौर बनशेट्टी यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच हा प्रस्ताव जानेवारी महिन्याच्या सभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. ६९२ कोटींच्या योजनेतही दोन टप्पे करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कामानुसार खर्चाचे भाग पाडण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जॅकवेल व पंपिंग हाऊसचे काम असेल. त्यानंतर उजनी ते पाकणी व सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम झाल्यावर पाकणी व सोरेगाव येथे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी नवीन फिल्टर बेड तयार करावे लागणार आहेत. जलवाहिनी टाकताना भूमी अधिग्रहणाचा प्रश्न येणार आहे. त्यामुळे यासाठी पैसे लागणार आहेत. पण या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने येत्या तीन वर्षांत या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी जुन्या जलवाहिनीच्यावर नवीन जलवाहिनी टाकता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येत आहे. हे शक्य झाल्यास भूमी अधिग्रहणाचा प्रश्न व पैसे वाचणार आहेत. ------------------अशी असेल खर्चाची तरतूदच्११० एमएलडीची ६९२ कोटींची योजना साकारण्यासाठी पुढीलप्रमाणे तरतूद सुचविण्यात आली आहे. एनटीपीसीने पाणीपुरवठा योजनेसाठी २५० कोटी दिले आहेत. स्मार्ट सिटीत २०० कोटींची तरतूद आहे. असे ४५० कोटी व उर्वरित महापालिका आणि शासन मदतीतून ही योजना यशस्वी होऊ शकते, असा प्रशासनाचा दावा आहे. गरज पडल्यास महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड कंपनीकडून झीरो टक्के व्याजदराने कर्जही घेण्याचा प्रस्ताव आहे. ही योजना साकारण्यासाठी उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांचे पथक काम करीत आहे. -------------------पाणी सोडण्याची कटकट जाणारच्औज बंधाºयासाठी वर्षातून चारवेळा पाणी सोडले जाते. यासाठी दोन टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पण एकावेळेस औज व चिंचपूर बंधारा भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाणी लागते. पण भीमेतून हे पाणी आणण्यासाठी उजनी धरणातून दरवेळेस पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. त्यामुळे पाणी बिलाचा मोठा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागेल. ही जलवाहिनी झाल्यास भीमेत पाणी सोडण्याची मागणी करण्याची दरवेळची कटकट थांबणार आहे. त्याचबरोबर शहरासाठी पाणी वाढणार आहे. सध्याची उजनीची जलवाहिनीची क्षमता: ११० एमएलडी आहे. प्रस्तावित योजना: ११० एमएलडीची आहे. एकरुख योजना: १५ एमएलडीची आहे. टाकळी योजना: ८० एमएलडीची आहे. अशाप्रकारे शहराला ३१५ एमएलडी पाणी दररोज उपलब्ध होईल. ज्याचा उपयोग शहराची दररोजची गरज भागण्यासाठी होऊ शकणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका