शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

सोलापूर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाचा कारभार ढिम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 15:36 IST

बच्चू कडूंच्या इशाºयानंतरही महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाºयांमुळे दिव्यांग बांधव वंचित 

ठळक मुद्देआमदार बच्चू कडू यांच्या इशाºयानंतर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाने १४ कलमी कार्यक्रम राबविण्यास गती दिलेली नाहीनिष्क्रिय अधिकाºयांमुळे शहरातील दिव्यांग बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याची टीका कामगार व समाजकल्याण समितीचे सभापती आणि नगरसेवकांनी केली

सोलापूर : आमदार बच्चू कडू यांच्या इशाºयानंतर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाने १४ कलमी कार्यक्रम राबविण्यास गती दिलेली नाही. निष्क्रिय अधिकाºयांमुळे शहरातील दिव्यांग बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याची टीका कामगार व समाजकल्याण समितीचे सभापती आणि नगरसेवकांनी केली आहे. 

महापालिकेने विकलांग सहाय योजने अंतर्गत १४ कलमी कार्यक्रम निश्चित केला होता. त्यासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. वर्ष उलटून गेले तरी यापैकी केवळ ८९ लाख ५० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी १३ मे रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. 

या बैठकीत त्यांनी दिव्यांग विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. त्यावर अधिकाºयांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. सहा महिन्यांनी पुन्हा येईन. तोपर्यंत काम न झाल्यास मनपा आयुक्तांच्या कानपटात लगावेन, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यावरुन बराच गदारोळ झाला. यानंतरही दिव्यांग कल्याण विभागातील कामात सुधारणा झालेली नाही. 

कामगार व समाजकल्याण सभापती राजकुमार हंचाटे म्हणाले, दिव्यांग कल्याण विभागात निष्क्रिय अधिकारी बसविले आहेत. दोन दिवसांपूर्वी या विभागाची बैठक घेतली. 

१४ कलमी कार्यक्रमापैकी केवळ दोन योजनांवर काम झाले. उर्वरित योजना का राबविल्या नाहीत. शहरातील दिव्यांग बांधवांपर्यंत तुम्ही का पोहोचला नाहीत, असे अनेक प्रश्न कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे यांना विचारले. त्यावर वैतागलेल्या कांबळे यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दाखविली. अधिकाºयांना दिव्यांग बांधवांबद्दल सहानुभूती नाही. या विभागाकडे शहरातील दिव्यांग बांधवांची व्यवस्थित नोंद नाही.  नव्याने नोंद करावी, असे यांना वाटत नाही. 

कार्यालयाची जागा अडचणीची - महापालिकेचे दिव्यांग कल्याण कार्यालय इंद्रभुवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. अडथळ्यांची शर्यत पार करीत तिथे जावे लागते. धडधाकट माणसांना तिथे व्यवस्थित पोहोचता येत नाही. मग दिव्यांग बांधव तिथे कसे पोहोचणार?, असा सवाल राजकुमार हंचाटे आणि प्रहार संघटनेचे जमीर शेख यांनी उपस्थित केला. कौन्सिल हॉलच्या तळमजल्यावर जनगणना विभागाचे कार्यालय आहे. हे कार्यालय इंद्रभुवनमध्ये हलवून कामगार कल्याण कार्यालय कौन्सिल हॉलच्या तळमजल्यावर आणावे, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करणार असल्याचे हंचाटे आणि शेख यांनी सांगितले. 

हे ठरविले, पण अंमलबजावणी नाही- दिव्यांग बांधवांच्या बचत गटांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान- दिव्यांग बांधवांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे- व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान- मतिमंद विद्यार्थ्यांच्या संस्थेला प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान- दिव्यांगासाठी स्वतंत्र व्यायामशाळा बांधणे- शहरातील पाच उद्यानांमध्ये दिव्यांगासाठी खेळणी बसविणे

दिव्यांग सहाय योजनेत आखलेला १४ कलमी कार्यक्रम विविध विभागांमार्फत राबविण्यात येत आहे. खेळणी बसविणे, व्यायामशाळा बांधणे यासारखी कामे नगरअभियंता कार्यालयाने केली नाहीत. त्यांना पत्र पाठवूनही उपयोग नाही. स्पर्धा आयोजित करण्याचे काम क्रीडा व शिक्षण विभागाने केलेले नाही. अनुदानाचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. त्यावर निर्णय होईल. इतर विभाग काम करीत नाही. त्याचा दोष आमच्यावर येतो. -विजयकुमार कांबळे, कामगार कल्याण अधिकारी, मनपा.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBacchu Kaduबच्चू कडू