शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

लाड-पागे शिफारशीच्या नोकरभरतीची स्थगिती उठवली! महाराष्ट्र राज्य मनपा, नपा फेडरेशन संघटनेच्या पाठपुराव्याला यश

By संताजी शिंदे | Updated: June 25, 2024 19:55 IST

Solapur News: लाड-पागेच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या पाल्यास, नोकर भरती करण्याच्या प्रक्रीयेला देण्यात आलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपालिका संघटना फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

- संताजी शिंदे सोलापूर - लाड-पागेच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या पाल्यास, नोकर भरती करण्याच्या प्रक्रीयेला देण्यात आलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपालिका संघटना फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

औरंगाबाद खंडपीठाने २३ मार्च २०२३ रोजी लाडपागे अंतर्गत पाल्यांच्या नोकर भरतीला स्थगिती दिली होती. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये हजारो कर्मचारी लाडपागे नोकरी पासून वंचित राहिले होते. स्थगितीच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन संघटनेने १० ऑगस्टमध्ये २०२३ रोजी मुंबई युनियन कार्यालय या ठिकाणी बैठक घेतली होती. बैठकीत सुरेश ठाकूर, बबनराव झिंजुर्डे, प्रवक्ते ॲड. गौतम खरात, संतोष पवार, अनिल जाधव, गणेश शिंगे, बापूसाहेब सदाफुले व महाराष्ट्रातील मनपाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास ठराव पास केला होता.

 स्थगिती दिल्यापासून आजतागायत सर्व पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये सातत्याने पाठपुरावा केला. २४ जून २०२४ रोजी लाड-पागे शिफारीनुसार एस.सी. प्रवर्गातील नव बौद्ध महार, मातंग या समाजातील वारसदारांना न्याय मिळवून दिला. न्यायमूर्तींनी अनुसूचित जाती मधील सर्व जातीच्या कामगाराना लाड व पागे कमिटीनुसार असलेल्या वारस  नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे, मात्र उर्वरित खुला प्रवर्गया निकालामुळे अंशतः न्याय मिळालेला आहे परंतु उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील सफाई कामगार यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.या निकालामुळे अंशतः न्याय मिळालेला आहे परंतु उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील सफाई कामगार यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. व इतर मागास प्रवर्गातील कामगार यांना लागू असलेली स्थगिती कायम ठेवलेली आहे.

माझ्या २९० कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला - बापू सदाफुलेमागासवर्गीयांमध्ये सध्या एकच हक्काची नोकरी राहिली आहे. स्थगिती मिळाल्याने मेहतर व भंगी या दोन जाती वगळता इतर जातीमधील वारसाहक्काच्या कर्मचाऱ्यांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यांना मोल मजूरीशिवाय पर्याय राहिला नव्हता, आम्ही सातत्याने औरंगाबाद खंडपिठात पाठ पुरावा केला. अखेर दहा महिन्यानंतर खंडपिठाने नोकरभरतीवरील स्थगिती उठवली आहे. यामुळे महानगरपालिकेतील माझ्या २९० न्याय मिळाला असल्याची भावना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापू सदाफुले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूर