शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Solapur: सकाळी बैलांना चारा-पाणी करून बैलगाडी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ

By विठ्ठल खेळगी | Updated: March 15, 2023 12:04 IST

Solapur News: आमच्या उताऱ्यावरून एमआयडीसीची नोंद काढा..अशी विनवणी करीत शेतकरी मुंबईची वाट धरली आहे. बुधवारी सकाळी सोलापुरातून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला.

- विठ्ठल खेळगीसोलापूर : आमच्या उताऱ्यावरून एमआयडीसीची नोंद काढा..अशी विनवणी करीत शेतकरी मुंबईची वाट धरली आहे. बुधवारी सकाळी सोलापुरातून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. सकाळी बैलांना चारा-पाणी करून शेतकरी आता पुढे निघाले आहेत. या बैलगाडी मोर्चामध्ये १२ महिला आहेत. सात आठ लहान मुले आहेत. सुमारे ८० शेतकरी शेतकऱ्यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे महादेव कुंभार यांची नात आठ महिन्यांची तान्हुली अन्वी रविकांत कुंभार हिचा देखील त्यात समावेश आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी मागील १७५ दिवसांपासून शेतकरी मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल न घेतल्याने वैतागलेले शेतकरी आता मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडकणार आहेत. बैलगाडी मोर्चा घेऊन हे शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

मंगळवारी मंद्रूपहून निघालेले शेतकरी पहिल्या दिवशी सोलापूरजवळील ए.जी. पाटील कॉलेजसमोरील मैदानावर विसावले होते. बुधवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. रात्री अधिकाऱ्यांनी चर्चा केली.. मात्र तोडगा नाहीमंगळवारी रात्री ए.जी.पाटील कॉलेजजवळ शेतकरी मुक्कामाला थांबले होते. तेव्हा एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी जी.एस. कोळेकर यांनी शेतकर्यांची भेट घेतली. १५ दिवस मुदत द्या, बैठक घेऊन तोडगा काढू, अशी विनंती केली. मात्र, शेतकर्यांनी बैठका नको, आता उतार्यांवरून एमआयडीसीची नोंद हटविल्याशिवाय मोर्चा थांबविणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे तोडगा निघाला नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी