शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Solapur: ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक संपावर ऑनलाइन कारभार ठप्प, नागरिक अडचणीत

By दिपक दुपारगुडे | Updated: November 23, 2023 18:27 IST

Solapur News: ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालक १७ नोहेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

- दीपक दुपारगुडे सोलापूर - ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालक १७ नोहेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे गावगाड्यातील कारभार ठप्प झाला असून नागरिकांना ग्रामपंचायतीकडील दाखले मिळत नसल्याने त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मागील बारा वर्षांपासून ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक यांच्यामार्फत केले जात आहे. संगणकावरील सर्व प्रकारची कामे करावी लागत असतानाही त्यांना केवळ दहा हजार ९३० रुपये एवढेच तुटपुंजे मानधन दिले जात आहे, तेही कधीच वेळेवर मिळत नसल्याची संगणक परिचालकांची तक्रार आहे.

संगणक परिचालक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करताहेत. अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. विशेष म्हणजे शासनाने कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांचे मानधन वाढविले असताना आम्हीच काय पाप केले आहे कळत नाही. त्यामुळे राज्यभरातील संगणक परिचालक बेमुदत संपावर गेले असल्याचे करकंब येथील संगणक परिचालक फिरोज कोरबू यांनी सांगितले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSolapurसोलापूर