शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

सोलापूर इलेक्शन : पं़ स़ मध्ये आवताडे गटाचे वर्चस्व

By admin | Updated: February 24, 2017 18:47 IST

मंगळवेढा तालुका : ढोबळे यांच्या पत्नीचा पराभव

सोलापूर इलेक्शन : पं़ स़ मध्ये आवताडे गटाचे वर्चस्वविलास मासाळ - आॅनलाईन लोकमत मंगळवेढाजि़ प़ च्या ४ पैकी ३ जागा आणि पं़ स़च्या ८ पैकी ५ जागा संत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या जनहित विकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीवर जनहित विकास आघाडीने वर्चस्व मिळवले असून याच गटाचा सभापती होणार आहे. तसेच आ. भारत भालके गटाला जि़ प़ ची १ व पं़ स़ च्या ३ जागा मिळाल्या आहेत. आ. प्रशांत परिचारक गटाला एकही जागा मिळाली नाही. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नीचा पराभव झाल्यामुळे ढोबळे यांना मोठा धक्का मानला आहे. तालुक्यामध्ये माजी मंत्री ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचा शीला सचिन शिवशरण यांनी पराभव केल्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अगोदरच राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेले प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे आता आणखी मोठी गोची झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे एकेकाळी संपूर्ण तालुक्यात जि. प व पं. स़ निम्म्यापेक्षा जास्त सदस्य हे राष्ट्रवादीचे होते़; मात्र या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आला नाही. आ. भारत भालके गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून संत दामाजी साखर कारखाना पाठोपाठ पंचायत समितीची सत्ता ही सोडावी लागली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.आज सकाळी शासकीय गोदामामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली एकाचवेळी चार गट व आठ गण अशी मतमोजणी सुरु झाली होेती. सुरूवातीलाच हुलजंती गटातील शीला शिवशरण व मरवडे गणातील प्रदीप खांडेकर यांना भालेवाडी, मरवडे गावातून मताधिक्य मिळाल्याचे वृत्त पसरताच तालुका खरेदी-विक्री संघ, आवताडे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी शिट्टी वाजवून आनंद व्यक्त केला. हा आनंद शेवटपर्यंत कायम राहिला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप शेलार, आशिष लोकरे, यांच्या मार्गदर्शनाने निवडणूक निकालाची प्रक्रिया सुरळीत पार पडली़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोनि रवींद्र शेळके, सपोनि नामदेव शिंदे, अभिषेक डाके यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.---------------------------हुलजंती जि़ प़ गटातून कोणतीही तयारी नसताना निवडणुकीला सामोरे जावे लागले. कार्यकर्ते काम करण्यास कमी पडले व कार्यकर्त्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसला नाही. अचानक निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे हा पराभव पत्करावा लागला. निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना विश्वासाने व ठरल्याप्रमाणे ठरवून धोका दिला, परंतु यामध्ये कोणाला दोषी धरून चालणार नाही़ यापुढे जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून ते प्रश्न सोडविण्यासाठी हा पराभव विसरून काम करणार आहे़- प्रा़ लक्ष्मणराव ढोबळे,माजी पालकमंत्री