शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात थंडी वाढली; जनावरांना वाढला लाळ-खुरकतचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 12:26 IST

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसात वाढलेल्या गारव्याने जनावरांना लाळ-खुरकत साथीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.  गतवर्षी ...

ठळक मुद्देजिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस नाही त्यामुळे हवामानात सतत बदलदिवसा उष्ण व रात्री थंड वारे सुटल्यावर याचे विषाणू वेगाने पसरतातराज्यातील जनावरे बाजारात आल्यामुळे या रोगाचा प्रसार वाढला

सोलापूर: जिल्ह्यात गेल्या चार दिवसात वाढलेल्या गारव्याने जनावरांना लाळ-खुरकत साथीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. 

गतवर्षी माळशिरस व मंगळवेढा तालुक्यात लाळ-खुरकतच्या साथीने जनावरे दगावल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी वेळीच खबरदारी घेण्यात आली. तरीही वाईट हवामानाचा फटका पशुधनाला बसला आहे. मंगळवेढा तालुक्यात लाळ-खुरकत साथीची लागण झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकाºयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर दैवज्ञ यांनी सांगितले. या रोगाची लागण झालेल्या जनावरांना लक्षणानुसार उपचार करावे लागतात.

बरे होण्यासाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. गाभण जनावरांच्या अंगावरील केस वाढतात व उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते. अशा जनावरांनी पिलेले पाणी फेकून द्यावे. या काळात बाजारातील जनावरे खरेदी करून थेट गोठ्यात आणू नयेत, असे आवाहन दैवज्ञ यांनी केले आहे. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे सप्टेंबर अखेर ११ लाख २८ हजार १२० जनावरांना लाळ-खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले होते. यामध्ये ७ लाख ३० हजार ४६१ गाई व ४ लाख ४९ हजार ५६५ म्हशी असे ११ लाख ८० हजार २६ अशा दुभत्या जनावरांना हे लसीकरण करण्यात आले होते. पशुधनाचा लाळ-खुरकत या रोगापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शासनाच्या योजनेतून दरवर्षी दोन फेºयात लसीकरणासाठी निधी उपलब्ध केला जातो. सन २०१७-१८ मध्ये एकाच फेरीसाठी ११ लाख ७६ हजार ८५० लसींचा पुरवठा ९ मार्च २०१८ रोजी करण्यात आला. यामधून ही लस देण्यात आली.

 काय आहेत लक्षणे... - जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे हवामानात सतत बदल होत आहे. दिवसा उष्ण व रात्री थंड वारे सुटल्यावर याचे विषाणू वेगाने पसरतात. यंदा केरळमध्ये अतिवृष्टी झाली. अशा राज्यातील जनावरे बाजारात आल्यामुळे या रोगाचा प्रसार वाढला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदagricultureशेतीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार