शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ११३ कोटींचे कर्ज थकीत, मागील कर्जमाफीचे १७ हजार लाभार्थी पुन्हा थकबाकीदार

By admin | Updated: June 23, 2017 14:26 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : २००७-०८ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यापैकी १७ हजार २३ शेतकरी खातेदार पुन्हा थकबाकीदारांच्या यादीत असून त्यांच्याकडे ११३ कोटी २१ लाख ७३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही माहिती शासनाला सादर केली आहे.राज्याच्या सहकार खात्याने ही विविध प्रकारची माहिती राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना मागितली आहे. यामध्ये २००७-०८ मध्ये कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी किती शेतकरी सध्या थकीत आहेत?, याचीही माहिती मागितली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ती सहकार खात्याला सादर केली आहे. मागील कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी पुन्हा त्याच शेतकऱ्यांची थकबाकी वाढली असल्याचे बँकेच्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. त्याच शेतकऱ्यांची थकबाकी सर्वाधिक बार्शी तालुक्यात वाढली असून, एकट्या बार्शी तालुक्यात २९२५ शेतकऱ्यांकडे २२ कोटी २४ लाख ३ हजार रुपये थकले आहेत. पंढरपूर तालुक्यातील २४४२ शेतकऱ्यांकडे १८ कोटी ६० लाख १९ हजार रुपये पुन्हा थकले आहेत. माढा तालुक्यातील १५७९ शेतकऱ्यांकडे १४ कोटी ६५ लाख ६३ हजार रुपये इतकी रक्कम थकीतमध्ये गेली आहे. अक्कलकोट तालुक्यातील मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले १८२६ शेतकरी १२ कोटी ८१ लाख ६२ हजार रुपये थकवून कर्जमाफीच्या यादीत आले आहेत. माळशिरस तालुक्यातील १७७७ शेतकऱ्यांकडे ९ कोटी ४५ लाख २८ हजार, करमाळा तालुक्यातील १८८७ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६७ लाख २९ हजार, मंगळवेढा तालुक्यातील १३८४ शेतकऱ्यांकडे ७ कोटी एक लाख २७ हजार, सांगोला तालुक्यातील ११४३ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ६६ लाख ७० हजार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६२१ शेतकऱ्यांकडे ५ कोटी एक लाख ७० हजार, मोहोळ तालुक्यातील ८५४ शेतकऱ्यांकडे ४ कोटी ६३ लाख ९७ हजार तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांकडे चार कोटी ४४ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे. -------------------२७० कोटींची कर्जमाफी.........च्२००७-०८ मध्ये शासनाने कर्जमाफी केली होती त्यावेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४ हजार ३०० शेतकऱ्यांचे २७० कोटी ३७ लाख ६६ हजार रुपये इतके कर्ज माफ झाले होते. यामध्ये पंढरपूरच्या ९ हजार ४७० शेतकऱ्यांचे ७० कोटी ९१ लाख, माढ्याच्या ५१२७ शेतकऱ्यांचे ३५ कोटी ७७ लाख, माळशिरसच्या ७३७४ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, बार्शीच्या ५ हजार १८२ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, करमाळ्याच्या ५५२७ शेतकऱ्यांचे २४ कोटी २५ लाख, अक्कलकोटच्या २५३८ शेतकऱ्यांचे १७ कोटी १८ लाख, मोहोळच्या २४७६ शेतकऱ्यांचे १६ कोटी ९६ लाख, मंगळवेढ्याच्या २३३८ शेतकऱ्यांचे १२ कोटी ५८ लाख, सांगोल्याच्या १९९४ शेतकऱ्यांचे १० कोटी ११ लाख, दक्षिणच्या ११९९ शेतकऱ्यांचे ७ कोटी ७९ लाख व उतरच्या १०७५ शेतकऱ्यांचे ८ कोटी ७४ लाख रुपये कर्जमाफ झाले होते.