शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
4
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
5
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
6
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
7
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
8
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
9
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
10
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
11
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
12
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
13
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
14
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
15
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
16
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
17
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
18
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
19
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
20
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ११३ कोटींचे कर्ज थकीत, मागील कर्जमाफीचे १७ हजार लाभार्थी पुन्हा थकबाकीदार

By admin | Updated: June 23, 2017 14:26 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : २००७-०८ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यापैकी १७ हजार २३ शेतकरी खातेदार पुन्हा थकबाकीदारांच्या यादीत असून त्यांच्याकडे ११३ कोटी २१ लाख ७३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही माहिती शासनाला सादर केली आहे.राज्याच्या सहकार खात्याने ही विविध प्रकारची माहिती राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना मागितली आहे. यामध्ये २००७-०८ मध्ये कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी किती शेतकरी सध्या थकीत आहेत?, याचीही माहिती मागितली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ती सहकार खात्याला सादर केली आहे. मागील कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी पुन्हा त्याच शेतकऱ्यांची थकबाकी वाढली असल्याचे बँकेच्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. त्याच शेतकऱ्यांची थकबाकी सर्वाधिक बार्शी तालुक्यात वाढली असून, एकट्या बार्शी तालुक्यात २९२५ शेतकऱ्यांकडे २२ कोटी २४ लाख ३ हजार रुपये थकले आहेत. पंढरपूर तालुक्यातील २४४२ शेतकऱ्यांकडे १८ कोटी ६० लाख १९ हजार रुपये पुन्हा थकले आहेत. माढा तालुक्यातील १५७९ शेतकऱ्यांकडे १४ कोटी ६५ लाख ६३ हजार रुपये इतकी रक्कम थकीतमध्ये गेली आहे. अक्कलकोट तालुक्यातील मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले १८२६ शेतकरी १२ कोटी ८१ लाख ६२ हजार रुपये थकवून कर्जमाफीच्या यादीत आले आहेत. माळशिरस तालुक्यातील १७७७ शेतकऱ्यांकडे ९ कोटी ४५ लाख २८ हजार, करमाळा तालुक्यातील १८८७ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६७ लाख २९ हजार, मंगळवेढा तालुक्यातील १३८४ शेतकऱ्यांकडे ७ कोटी एक लाख २७ हजार, सांगोला तालुक्यातील ११४३ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ६६ लाख ७० हजार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६२१ शेतकऱ्यांकडे ५ कोटी एक लाख ७० हजार, मोहोळ तालुक्यातील ८५४ शेतकऱ्यांकडे ४ कोटी ६३ लाख ९७ हजार तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांकडे चार कोटी ४४ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे. -------------------२७० कोटींची कर्जमाफी.........च्२००७-०८ मध्ये शासनाने कर्जमाफी केली होती त्यावेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४ हजार ३०० शेतकऱ्यांचे २७० कोटी ३७ लाख ६६ हजार रुपये इतके कर्ज माफ झाले होते. यामध्ये पंढरपूरच्या ९ हजार ४७० शेतकऱ्यांचे ७० कोटी ९१ लाख, माढ्याच्या ५१२७ शेतकऱ्यांचे ३५ कोटी ७७ लाख, माळशिरसच्या ७३७४ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, बार्शीच्या ५ हजार १८२ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, करमाळ्याच्या ५५२७ शेतकऱ्यांचे २४ कोटी २५ लाख, अक्कलकोटच्या २५३८ शेतकऱ्यांचे १७ कोटी १८ लाख, मोहोळच्या २४७६ शेतकऱ्यांचे १६ कोटी ९६ लाख, मंगळवेढ्याच्या २३३८ शेतकऱ्यांचे १२ कोटी ५८ लाख, सांगोल्याच्या १९९४ शेतकऱ्यांचे १० कोटी ११ लाख, दक्षिणच्या ११९९ शेतकऱ्यांचे ७ कोटी ७९ लाख व उतरच्या १०७५ शेतकऱ्यांचे ८ कोटी ७४ लाख रुपये कर्जमाफ झाले होते.