शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ११३ कोटींचे कर्ज थकीत, मागील कर्जमाफीचे १७ हजार लाभार्थी पुन्हा थकबाकीदार

By admin | Updated: June 23, 2017 14:26 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : २००७-०८ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यापैकी १७ हजार २३ शेतकरी खातेदार पुन्हा थकबाकीदारांच्या यादीत असून त्यांच्याकडे ११३ कोटी २१ लाख ७३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही माहिती शासनाला सादर केली आहे.राज्याच्या सहकार खात्याने ही विविध प्रकारची माहिती राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना मागितली आहे. यामध्ये २००७-०८ मध्ये कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी किती शेतकरी सध्या थकीत आहेत?, याचीही माहिती मागितली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ती सहकार खात्याला सादर केली आहे. मागील कर्जमाफीचा फायदा घेतलेल्यांपैकी पुन्हा त्याच शेतकऱ्यांची थकबाकी वाढली असल्याचे बँकेच्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. त्याच शेतकऱ्यांची थकबाकी सर्वाधिक बार्शी तालुक्यात वाढली असून, एकट्या बार्शी तालुक्यात २९२५ शेतकऱ्यांकडे २२ कोटी २४ लाख ३ हजार रुपये थकले आहेत. पंढरपूर तालुक्यातील २४४२ शेतकऱ्यांकडे १८ कोटी ६० लाख १९ हजार रुपये पुन्हा थकले आहेत. माढा तालुक्यातील १५७९ शेतकऱ्यांकडे १४ कोटी ६५ लाख ६३ हजार रुपये इतकी रक्कम थकीतमध्ये गेली आहे. अक्कलकोट तालुक्यातील मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले १८२६ शेतकरी १२ कोटी ८१ लाख ६२ हजार रुपये थकवून कर्जमाफीच्या यादीत आले आहेत. माळशिरस तालुक्यातील १७७७ शेतकऱ्यांकडे ९ कोटी ४५ लाख २८ हजार, करमाळा तालुक्यातील १८८७ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६७ लाख २९ हजार, मंगळवेढा तालुक्यातील १३८४ शेतकऱ्यांकडे ७ कोटी एक लाख २७ हजार, सांगोला तालुक्यातील ११४३ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ६६ लाख ७० हजार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६२१ शेतकऱ्यांकडे ५ कोटी एक लाख ७० हजार, मोहोळ तालुक्यातील ८५४ शेतकऱ्यांकडे ४ कोटी ६३ लाख ९७ हजार तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांकडे चार कोटी ४४ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे. -------------------२७० कोटींची कर्जमाफी.........च्२००७-०८ मध्ये शासनाने कर्जमाफी केली होती त्यावेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४ हजार ३०० शेतकऱ्यांचे २७० कोटी ३७ लाख ६६ हजार रुपये इतके कर्ज माफ झाले होते. यामध्ये पंढरपूरच्या ९ हजार ४७० शेतकऱ्यांचे ७० कोटी ९१ लाख, माढ्याच्या ५१२७ शेतकऱ्यांचे ३५ कोटी ७७ लाख, माळशिरसच्या ७३७४ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, बार्शीच्या ५ हजार १८२ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ११ लाख, करमाळ्याच्या ५५२७ शेतकऱ्यांचे २४ कोटी २५ लाख, अक्कलकोटच्या २५३८ शेतकऱ्यांचे १७ कोटी १८ लाख, मोहोळच्या २४७६ शेतकऱ्यांचे १६ कोटी ९६ लाख, मंगळवेढ्याच्या २३३८ शेतकऱ्यांचे १२ कोटी ५८ लाख, सांगोल्याच्या १९९४ शेतकऱ्यांचे १० कोटी ११ लाख, दक्षिणच्या ११९९ शेतकऱ्यांचे ७ कोटी ७९ लाख व उतरच्या १०७५ शेतकऱ्यांचे ८ कोटी ७४ लाख रुपये कर्जमाफ झाले होते.