शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी ९४ हजारांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:16 IST

मागील वर्षीच्या १ हजार ३४ कोटी थकबाकीत यंदा पडेल भर

ठळक मुद्देपाच वर्षांत थकबाकीदार शेतकºयांची संख्या ९४ हजार ३९ इतकीसोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख कर्जदार शेतकरी सभासद

सोलापूर:  दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफीची होणारी मागणी, नियमित कर्ज भरणाºयांना वाºयावर सोडून कर्ज थकविणाºयांसाठी कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण, शिवाय कर्ज भरण्याची मानसिकता कमी झाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागील वर्षी १ हजार ३४ कोटी ४३ लाखांवर गेलेली थकबाकी यावर्षी काहीअंशी वाढण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत थकबाकीदार शेतकºयांची संख्या वाढत-वाढत ९४ हजार ३९ इतकी झाली आहे.

सोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख कर्जदार शेतकरी सभासद आहेत. यापैकी अनेक शेतकरी दरवर्षी कर्ज  घेतात व भरतातही; मात्र काही शेतकरी घेतलेले कर्ज न भरता कर्जमाफीची वाट बघतात. २००७-०८ मध्ये झालेल्या कर्जमाफीत थकबाकीदारांचे मोठ्या प्रमाणावर कर्ज माफ झाले; मात्र नियमित कर्ज भरणाºयांच्या हाती काहीच पडले नव्हते. त्याचा परिणाम थकबाकी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते.

२००७-८ च्या कर्जमाफीनंतर चार वर्षे कर्ज वसुलीचे प्रमाण चांगले होते; मात्र त्यानंतर थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. कर्ज वाटपाची रक्कम, शेतकरी संख्या जशी वाढली आहे तशीच थकबाकीची रक्कमही दरवर्षी वाढत असल्याने बँक अडचणीत आली आहे. ज्यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्यावेळी वसुलीवर काहीअंशी परिणाम होतो; मात्र पुढच्या वर्षी हीच परिस्थिती राहत नाही, असा आजवरचा अनुभव आहे; मात्र मागील तीन-चार वर्षांत वसुलीची टक्केवारी घसरत असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले.

कारखानदारांच्या थकबाकीचेही कारण...- सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या साखर कारखान्यासाठी घेतलेले कर्ज मागील चार-पाच वर्षांत थकल्याचा परिणामही शेतकºयांच्या कर्ज वसुलीवर झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांकडे अधिकारी वसुलीसाठी गेल्यावर पुढाºयांच्या कारखान्याची पहिली वसुली करा मग आमच्याकडे या, असे शेतकरी अधिकाºयांना बोलतात, त्यामुळे अधिकाºयांची मानसिकता शेतकºयांकडे वसुलीसाठी जाण्याची राहिली नाही, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी