शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेचे ८४ लाखांचे झाले चार कोटी ६४ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:16 IST

सहकार न्यायालयाच्या आदेशाने बँकेची बाजू भक्कम

ठळक मुद्दे शाखाधिकारी डी.व्ही. बगले यांच्यावर अपहाराची जबाबदारी निश्चितअपहाराची रक्कम वसूल करण्यासाठी सहकार न्यायालयात दावा दाखल

सोलापूर: एकीकडे खत उत्पादक सहकारी संस्था सुरू ठेवायची व दुसरीकडे कर्ज न भरता न्यायालयात आव्हान देणे चांगलेच महागात पडले असून, ८३ लाख ९१ हजार रुपये मुद्दलाचे व्याजासह आता ४ कोटी ६४ लाख भरावे लागणार आहेत. जिल्हा बँकेच्या बाजूने जिल्हा सहकारी न्यायालयाने निर्णय दिल्याने पंढरपूरच्या विठ्ठल खत उत्पादक कारखान्याला हा भार सोसावा लागणार आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडून अनेकांनी कर्ज घेतले, परंतु आज भरण्याची तयारीच नाही. कर्ज तर भरायचे नाहीच, उलट न्यायालयात दावा दाखल करुन बँकेलाच कामालालावण्याचा प्रकार केला जात आहे. असाच प्रकार पंढरपूरच्या विठ्ठल खत उत्पादक संस्थेबाबत झाला आहे.

या खत उत्पादक कारखान्याने २००१ मध्ये जिल्हा बँकेचे कर्ज घेतले होते. २००१ मध्ये घेतलेल्या कर्जाची रक्कम भरली जात नसल्याने बँकेने वसुलीसाठी २०१४ मध्ये सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. दावा दाखल केल्यानंतरही संबंधित कारखान्याने पैसे भरले नाहीत. दावा दाखल करतेवेळी २०१४ मध्ये मुद्दल व व्याज असे एकूण एक कोटी ५८ लाख रुपये येणे होते. सहकार न्यायालयाने दावा दाखल केल्यापासून म्हणजे एक जानेवारी २०१४ पासून १६.५० टक्के व्याजाने रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.

आता या खत कारखान्याला व्याजासह ४ कोटी ६४ लाख रुपये भरावे लागणार आहेत. न्यायालयात खेटे मारण्यासाठी झालेला खर्च वेगळाच आहे. या खत कारखान्याविरोधात वसुलीसाठीचे एकूण तीन दावे बँकेने दाखल केले होते. त्यापैकी दोन दाव्यांचा निकाल झाला आहे. 

यांच्या मालत्तेवर चढविणार बोजा- विठ्ठल खत कारखान्याने पुरेसे तारण न दिल्याने बँकेला सहकार न्यायालयात दावा दाखल करावा लागला. आता न्यायालयाने आदेश दिल्याने नोटीस दिल्यानंतरही पैसे भरले नाही तर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, राजेंद्र शिंदे,श्रीनिवास जगदाळे, रामलिंग देशमुख, हरी मोरे, तानाजी वाघमोडे, उत्तम नागणे, बाबा खिलारे, जनाबाई रामचंद्र गायकवाड आदींच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

वसुलीचा प्रश्न सुटेना?- बँकेच्या केम शाखेत अपहार झाला होता. तत्कालीन शाखाधिकारी डी.व्ही. बगले यांच्यावर अपहाराची जबाबदारी निश्चित झाली. ते मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यासाठी सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. वारसाकडे स्थावर मालमत्ता नसल्याने आता अपहाराची रक्कम वसूल कशी करायची?,असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा विषय संचालक मंडळासमोर ठेवला.

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक