शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सोलापूर जिल्हा बँकेचे ८४ लाखांचे झाले चार कोटी ६४ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:16 IST

सहकार न्यायालयाच्या आदेशाने बँकेची बाजू भक्कम

ठळक मुद्दे शाखाधिकारी डी.व्ही. बगले यांच्यावर अपहाराची जबाबदारी निश्चितअपहाराची रक्कम वसूल करण्यासाठी सहकार न्यायालयात दावा दाखल

सोलापूर: एकीकडे खत उत्पादक सहकारी संस्था सुरू ठेवायची व दुसरीकडे कर्ज न भरता न्यायालयात आव्हान देणे चांगलेच महागात पडले असून, ८३ लाख ९१ हजार रुपये मुद्दलाचे व्याजासह आता ४ कोटी ६४ लाख भरावे लागणार आहेत. जिल्हा बँकेच्या बाजूने जिल्हा सहकारी न्यायालयाने निर्णय दिल्याने पंढरपूरच्या विठ्ठल खत उत्पादक कारखान्याला हा भार सोसावा लागणार आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडून अनेकांनी कर्ज घेतले, परंतु आज भरण्याची तयारीच नाही. कर्ज तर भरायचे नाहीच, उलट न्यायालयात दावा दाखल करुन बँकेलाच कामालालावण्याचा प्रकार केला जात आहे. असाच प्रकार पंढरपूरच्या विठ्ठल खत उत्पादक संस्थेबाबत झाला आहे.

या खत उत्पादक कारखान्याने २००१ मध्ये जिल्हा बँकेचे कर्ज घेतले होते. २००१ मध्ये घेतलेल्या कर्जाची रक्कम भरली जात नसल्याने बँकेने वसुलीसाठी २०१४ मध्ये सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. दावा दाखल केल्यानंतरही संबंधित कारखान्याने पैसे भरले नाहीत. दावा दाखल करतेवेळी २०१४ मध्ये मुद्दल व व्याज असे एकूण एक कोटी ५८ लाख रुपये येणे होते. सहकार न्यायालयाने दावा दाखल केल्यापासून म्हणजे एक जानेवारी २०१४ पासून १६.५० टक्के व्याजाने रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.

आता या खत कारखान्याला व्याजासह ४ कोटी ६४ लाख रुपये भरावे लागणार आहेत. न्यायालयात खेटे मारण्यासाठी झालेला खर्च वेगळाच आहे. या खत कारखान्याविरोधात वसुलीसाठीचे एकूण तीन दावे बँकेने दाखल केले होते. त्यापैकी दोन दाव्यांचा निकाल झाला आहे. 

यांच्या मालत्तेवर चढविणार बोजा- विठ्ठल खत कारखान्याने पुरेसे तारण न दिल्याने बँकेला सहकार न्यायालयात दावा दाखल करावा लागला. आता न्यायालयाने आदेश दिल्याने नोटीस दिल्यानंतरही पैसे भरले नाही तर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, राजेंद्र शिंदे,श्रीनिवास जगदाळे, रामलिंग देशमुख, हरी मोरे, तानाजी वाघमोडे, उत्तम नागणे, बाबा खिलारे, जनाबाई रामचंद्र गायकवाड आदींच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

वसुलीचा प्रश्न सुटेना?- बँकेच्या केम शाखेत अपहार झाला होता. तत्कालीन शाखाधिकारी डी.व्ही. बगले यांच्यावर अपहाराची जबाबदारी निश्चित झाली. ते मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यासाठी सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. वारसाकडे स्थावर मालमत्ता नसल्याने आता अपहाराची रक्कम वसूल कशी करायची?,असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा विषय संचालक मंडळासमोर ठेवला.

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक